शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
3
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
4
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
5
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
6
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
7
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
8
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
9
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
10
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
11
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
12
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
13
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
14
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
15
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
16
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
17
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
18
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
19
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
20
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन

जळगाव जिल्ह्यात १८ दिवसांपासून पावसाने मारली दडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 11:42 IST

पावसाळा संपण्यास उरले २० दिवस

ठळक मुद्देगिरणा व वाघूर धरणातही गतवर्षीपेक्षा कमी साठा१७ गावांना १३ टँकर सुरूच

जळगाव : पावसाळा संपण्यास जेमतेम २० दिवसांचा कालावधी उरलेला असताना जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ६२.७ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या १८ दिवसापासून जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहे.जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण ५१.१४ टक्के पाणीसाठा झाला आहे. तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये ६०.२१ टक्के पाणीसाठा झाला आहे. मात्र ५ मध्यम प्रकल्पांमध्ये शून्य टक्के तर एका प्रकल्पात जेमतेम ४ .९३ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे राहिलेल्या दिवसांमध्ये जोरदार पावसाची गरज आहे.२.५ मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला असेल तरच पाऊस झाल्याचे मानले जाते. त्यानुसार जिल्ह्यात २३ आॅगस्टपासून पावसाने दडी मारली आहे. १ सप्टेंबरपासून तर एक थेंबही पाऊस झालेला नाही. तब्बल १८ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. आॅगस्ट महिन्यातही पावसाने दडी मारल्याने मूग, उडीद पिकांच्या वाढीवर विपरित परिणाम होऊन उत्पन्नात १० ते २० टक्के घट आली होती. आता पुन्हा १८ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीन, ज्वारी, बाजरी, कपाशी आदी पिकांना फटका बसला आहे. सोयाबीन फुलोऱ्याच्या व दाणे भरण्याच्या अवस्थेत असल्याने उत्पन्नात घट घेणार आहे. तर ज्वारी, बाजरी ही पिकेही दाणे भरण्याच्या अवस्थेत असल्याने त्यांच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला आहे. उत्पन्नात किमान २५-३० टक्के घट येण्याची शक्यता आहे. कापूस बोंड फुटण्याच्या अवस्थेत आहे. त्याच्या पोषणासाठी पावसाची गरज होती. मात्र पावसाने दडी मारल्याने कपाशीवर रस शोषण किडीचा, फुलकिडे, तुडतुडे, मावा यांचा प्रादुर्भाव झाला आहे. हा प्रादुभार्व कपाशीच्या सर्वच क्षेत्रावर आर्थिक नुकसानीच्या पातळीवर आहे.दरवर्षी पोळ्याला पावसाची हजेरी असते. मात्र यंदा पोळाही कोरडा गेला. त्यामुळे गणरायासोबत तरी पावसाचे आगमन व्हावे, अशी आस बळीराजाला लागली आहे.१७ गावांना १३ टँकर सुरूचजिल्ह्यात अजूनही १७ गावांना १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्यात जळगाव तालुक्यातील १, चाळीसगाव तालुक्यातील ५ व अमळनेर तालुक्यातील ९ गावांचा समावेश आहे. याखेरीज २७ गावांना अधिग्रहित केलेल्या ३३ विहिरींवरून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.धरणांमध्ये एकूण ५१.१४ टक्के पाणीसाठाजिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये मिळून एकूण ५१.१४ टक्के पाणीसाठा झाला आहे, हतनूर, वाघूर व गिरणा या तीन मोठ्या धरणांमध्ये एकूण ६०.२१ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यात हतनूर ९७.०२ टक्के भरले असून गिरणा धरणात ४८.६७ टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला गिरणा धरणात ६१.६१ टक्के पाणीसाठा झाला होता. त्या तुलनेत हा पाणीसाठा फारच कमी आहे. तर जळगाव शहराची पाणी पुरवठा योजना अवलंबून असलेल्या वाघूर धरणात जेमतेम ४६.७३ टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला ६५.०८ टक्के पाणीसाठा झाला होता. त्यामुळे या धरणांमधील पाणीसाठा वाढण्यासाठी आणखी जोरदार पावसाची आवश्यकता आहे.५ मध्यम प्रकल्पांमध्ये शून्य टक्के साठा१३ मध्यम प्रकल्पांपैकी अभोरा, मंगरूळ, सुकी या तीन प्रकल्पांमध्ये १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. तर बहुळा, अंजनी, भोकरबारी, बोरी व मन्याड या पाच प्रकल्पांमध्ये शून्य टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यामुळे या मध्यम प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या गावांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची भिती आहे.खान्देशात १६ सप्टेंबरपर्यंत कुठेही पावसाची शक्यता दिसत नाही. पडला तर हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यापासून मात्र खान्देशात पावसाला सुरुवात होईल.-के.एस.होसाळीकर, उपसंचालक, प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई.

टॅग्स :RainपाऊसJalgaonजळगाव