शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
4
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
5
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
6
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
7
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
8
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
9
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
10
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
12
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
13
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
14
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
15
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
16
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
17
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
18
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
19
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

जळगाव जिल्ह्यात १८ दिवसांपासून पावसाने मारली दडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 11:42 IST

पावसाळा संपण्यास उरले २० दिवस

ठळक मुद्देगिरणा व वाघूर धरणातही गतवर्षीपेक्षा कमी साठा१७ गावांना १३ टँकर सुरूच

जळगाव : पावसाळा संपण्यास जेमतेम २० दिवसांचा कालावधी उरलेला असताना जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ६२.७ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या १८ दिवसापासून जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहे.जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण ५१.१४ टक्के पाणीसाठा झाला आहे. तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये ६०.२१ टक्के पाणीसाठा झाला आहे. मात्र ५ मध्यम प्रकल्पांमध्ये शून्य टक्के तर एका प्रकल्पात जेमतेम ४ .९३ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे राहिलेल्या दिवसांमध्ये जोरदार पावसाची गरज आहे.२.५ मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला असेल तरच पाऊस झाल्याचे मानले जाते. त्यानुसार जिल्ह्यात २३ आॅगस्टपासून पावसाने दडी मारली आहे. १ सप्टेंबरपासून तर एक थेंबही पाऊस झालेला नाही. तब्बल १८ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. आॅगस्ट महिन्यातही पावसाने दडी मारल्याने मूग, उडीद पिकांच्या वाढीवर विपरित परिणाम होऊन उत्पन्नात १० ते २० टक्के घट आली होती. आता पुन्हा १८ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीन, ज्वारी, बाजरी, कपाशी आदी पिकांना फटका बसला आहे. सोयाबीन फुलोऱ्याच्या व दाणे भरण्याच्या अवस्थेत असल्याने उत्पन्नात घट घेणार आहे. तर ज्वारी, बाजरी ही पिकेही दाणे भरण्याच्या अवस्थेत असल्याने त्यांच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला आहे. उत्पन्नात किमान २५-३० टक्के घट येण्याची शक्यता आहे. कापूस बोंड फुटण्याच्या अवस्थेत आहे. त्याच्या पोषणासाठी पावसाची गरज होती. मात्र पावसाने दडी मारल्याने कपाशीवर रस शोषण किडीचा, फुलकिडे, तुडतुडे, मावा यांचा प्रादुर्भाव झाला आहे. हा प्रादुभार्व कपाशीच्या सर्वच क्षेत्रावर आर्थिक नुकसानीच्या पातळीवर आहे.दरवर्षी पोळ्याला पावसाची हजेरी असते. मात्र यंदा पोळाही कोरडा गेला. त्यामुळे गणरायासोबत तरी पावसाचे आगमन व्हावे, अशी आस बळीराजाला लागली आहे.१७ गावांना १३ टँकर सुरूचजिल्ह्यात अजूनही १७ गावांना १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्यात जळगाव तालुक्यातील १, चाळीसगाव तालुक्यातील ५ व अमळनेर तालुक्यातील ९ गावांचा समावेश आहे. याखेरीज २७ गावांना अधिग्रहित केलेल्या ३३ विहिरींवरून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.धरणांमध्ये एकूण ५१.१४ टक्के पाणीसाठाजिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये मिळून एकूण ५१.१४ टक्के पाणीसाठा झाला आहे, हतनूर, वाघूर व गिरणा या तीन मोठ्या धरणांमध्ये एकूण ६०.२१ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यात हतनूर ९७.०२ टक्के भरले असून गिरणा धरणात ४८.६७ टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला गिरणा धरणात ६१.६१ टक्के पाणीसाठा झाला होता. त्या तुलनेत हा पाणीसाठा फारच कमी आहे. तर जळगाव शहराची पाणी पुरवठा योजना अवलंबून असलेल्या वाघूर धरणात जेमतेम ४६.७३ टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला ६५.०८ टक्के पाणीसाठा झाला होता. त्यामुळे या धरणांमधील पाणीसाठा वाढण्यासाठी आणखी जोरदार पावसाची आवश्यकता आहे.५ मध्यम प्रकल्पांमध्ये शून्य टक्के साठा१३ मध्यम प्रकल्पांपैकी अभोरा, मंगरूळ, सुकी या तीन प्रकल्पांमध्ये १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. तर बहुळा, अंजनी, भोकरबारी, बोरी व मन्याड या पाच प्रकल्पांमध्ये शून्य टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यामुळे या मध्यम प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या गावांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची भिती आहे.खान्देशात १६ सप्टेंबरपर्यंत कुठेही पावसाची शक्यता दिसत नाही. पडला तर हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यापासून मात्र खान्देशात पावसाला सुरुवात होईल.-के.एस.होसाळीकर, उपसंचालक, प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई.

टॅग्स :RainपाऊसJalgaonजळगाव