शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

जळगाव जिल्ह्यात १८ दिवसांपासून पावसाने मारली दडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 11:42 IST

पावसाळा संपण्यास उरले २० दिवस

ठळक मुद्देगिरणा व वाघूर धरणातही गतवर्षीपेक्षा कमी साठा१७ गावांना १३ टँकर सुरूच

जळगाव : पावसाळा संपण्यास जेमतेम २० दिवसांचा कालावधी उरलेला असताना जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ६२.७ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या १८ दिवसापासून जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहे.जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण ५१.१४ टक्के पाणीसाठा झाला आहे. तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये ६०.२१ टक्के पाणीसाठा झाला आहे. मात्र ५ मध्यम प्रकल्पांमध्ये शून्य टक्के तर एका प्रकल्पात जेमतेम ४ .९३ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे राहिलेल्या दिवसांमध्ये जोरदार पावसाची गरज आहे.२.५ मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला असेल तरच पाऊस झाल्याचे मानले जाते. त्यानुसार जिल्ह्यात २३ आॅगस्टपासून पावसाने दडी मारली आहे. १ सप्टेंबरपासून तर एक थेंबही पाऊस झालेला नाही. तब्बल १८ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. आॅगस्ट महिन्यातही पावसाने दडी मारल्याने मूग, उडीद पिकांच्या वाढीवर विपरित परिणाम होऊन उत्पन्नात १० ते २० टक्के घट आली होती. आता पुन्हा १८ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीन, ज्वारी, बाजरी, कपाशी आदी पिकांना फटका बसला आहे. सोयाबीन फुलोऱ्याच्या व दाणे भरण्याच्या अवस्थेत असल्याने उत्पन्नात घट घेणार आहे. तर ज्वारी, बाजरी ही पिकेही दाणे भरण्याच्या अवस्थेत असल्याने त्यांच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला आहे. उत्पन्नात किमान २५-३० टक्के घट येण्याची शक्यता आहे. कापूस बोंड फुटण्याच्या अवस्थेत आहे. त्याच्या पोषणासाठी पावसाची गरज होती. मात्र पावसाने दडी मारल्याने कपाशीवर रस शोषण किडीचा, फुलकिडे, तुडतुडे, मावा यांचा प्रादुर्भाव झाला आहे. हा प्रादुभार्व कपाशीच्या सर्वच क्षेत्रावर आर्थिक नुकसानीच्या पातळीवर आहे.दरवर्षी पोळ्याला पावसाची हजेरी असते. मात्र यंदा पोळाही कोरडा गेला. त्यामुळे गणरायासोबत तरी पावसाचे आगमन व्हावे, अशी आस बळीराजाला लागली आहे.१७ गावांना १३ टँकर सुरूचजिल्ह्यात अजूनही १७ गावांना १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्यात जळगाव तालुक्यातील १, चाळीसगाव तालुक्यातील ५ व अमळनेर तालुक्यातील ९ गावांचा समावेश आहे. याखेरीज २७ गावांना अधिग्रहित केलेल्या ३३ विहिरींवरून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.धरणांमध्ये एकूण ५१.१४ टक्के पाणीसाठाजिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये मिळून एकूण ५१.१४ टक्के पाणीसाठा झाला आहे, हतनूर, वाघूर व गिरणा या तीन मोठ्या धरणांमध्ये एकूण ६०.२१ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यात हतनूर ९७.०२ टक्के भरले असून गिरणा धरणात ४८.६७ टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला गिरणा धरणात ६१.६१ टक्के पाणीसाठा झाला होता. त्या तुलनेत हा पाणीसाठा फारच कमी आहे. तर जळगाव शहराची पाणी पुरवठा योजना अवलंबून असलेल्या वाघूर धरणात जेमतेम ४६.७३ टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला ६५.०८ टक्के पाणीसाठा झाला होता. त्यामुळे या धरणांमधील पाणीसाठा वाढण्यासाठी आणखी जोरदार पावसाची आवश्यकता आहे.५ मध्यम प्रकल्पांमध्ये शून्य टक्के साठा१३ मध्यम प्रकल्पांपैकी अभोरा, मंगरूळ, सुकी या तीन प्रकल्पांमध्ये १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. तर बहुळा, अंजनी, भोकरबारी, बोरी व मन्याड या पाच प्रकल्पांमध्ये शून्य टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यामुळे या मध्यम प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या गावांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची भिती आहे.खान्देशात १६ सप्टेंबरपर्यंत कुठेही पावसाची शक्यता दिसत नाही. पडला तर हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यापासून मात्र खान्देशात पावसाला सुरुवात होईल.-के.एस.होसाळीकर, उपसंचालक, प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई.

टॅग्स :RainपाऊसJalgaonजळगाव