शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली?
2
मीरारोडमध्ये भाजपाकडून हळदीकुंकूच्या आड भेटवस्तूंचे वाटप; काँग्रेसची गुन्हा दाखल करण्याची मागणी 
3
कुलदीप सेंगर पुन्हा तुरुंगात जाणार? स्थगित शिक्षेविरुद्धच्या याचिकेवर सुनावणी करणार सर्वोच्च न्यायालय
4
'ऑपरेशन सिंदूर'यशस्वी! पाकिस्तानने सात महिन्यानंतर कबूल केले; ब्रह्मोसचा जबरदस्त निशाणा, नूर खान एअरबेसवर विध्वंस
5
सावधान! मोबाईलवर येणारा एक मेसेज तुमचं बँक खातं रिकामं करू शकतो; काय आहे हा नवा 'SIM Box Scam'?
6
राज-उद्धव एकत्र; भाजप-शिंदेसेना तह आणि युद्ध..!
7
'मला वाटलं पुढचा स्टीव्ह जॉब्स मीच आहे..;' सर्गेई ब्रिन यांनी गुगलच्या 'या' अपयशाबद्दल व्यक्त केली खंत
8
"त्यांनी कधीच मला सुनेसारखं वागवलं नाही...", सासूबाईंच्या निधनानंतर अमृता देशमुखची डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट
9
निसर्गाचा अजब चमत्कार! पृथ्वीवर एक असे ठिकाण जिथे कधीच पडत नाही थंडी; शास्त्रज्ञही थक्क
10
"ते हात मिळवणार नसतील, तर आम्हालाही गरज नाही!" पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ओकले भारताविरुद्ध विष
11
BMC Election 2026: नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
12
टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पना धक्का! भारताची निर्यात विक्रमी शिखरावर! २०२६ मध्येही निर्यातीचा 'वारू' सुसाट राहणार
13
५०० वर्षांनी ५ दुर्मिळ योगात २०२६ प्रारंभ: ८ राशींना लक्षणीय लाभ, अकल्पनीय पद-पैसा; शुभ घडेल!
14
Akola Municipal Election 2026: इच्छुकांची धाकधूक वाढली, भाजपची यादी शेवटच्या क्षणी; कारण...
15
सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान' अन् आलियाचा 'अल्फा' यांच्यात क्लॅश! 'हा' सिनेमा होणार पोस्टपोन?
16
"जयपूरमध्ये बॉम्बस्फोट होणार!", मध्यरात्री फोन करून धमकी दिली; पोलिसांनी पकडल्यावर वेटर जे म्हणाला... 
17
ठाण्यात शिंदेसेनेपुढे भाजपने नांगी टाकली? शिंदेसेना ८१ ऐवजी ९१ जागा लढणार
18
Astro Tips: तुमच्या हाताच्या मधल्या बोटात लोखंडी अंगठी आहे का? नसेल तर 'हे' नक्की वाचा!
19
मुंबईत उमेदवार भाजपचा अन् चिन्ह मात्र शिंदेसेनेचे? आता उच्च पातळीवर होणार चर्चा
20
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात १८ दिवसांपासून पावसाने मारली दडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 11:42 IST

पावसाळा संपण्यास उरले २० दिवस

ठळक मुद्देगिरणा व वाघूर धरणातही गतवर्षीपेक्षा कमी साठा१७ गावांना १३ टँकर सुरूच

जळगाव : पावसाळा संपण्यास जेमतेम २० दिवसांचा कालावधी उरलेला असताना जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ६२.७ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या १८ दिवसापासून जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहे.जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण ५१.१४ टक्के पाणीसाठा झाला आहे. तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये ६०.२१ टक्के पाणीसाठा झाला आहे. मात्र ५ मध्यम प्रकल्पांमध्ये शून्य टक्के तर एका प्रकल्पात जेमतेम ४ .९३ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे राहिलेल्या दिवसांमध्ये जोरदार पावसाची गरज आहे.२.५ मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला असेल तरच पाऊस झाल्याचे मानले जाते. त्यानुसार जिल्ह्यात २३ आॅगस्टपासून पावसाने दडी मारली आहे. १ सप्टेंबरपासून तर एक थेंबही पाऊस झालेला नाही. तब्बल १८ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. आॅगस्ट महिन्यातही पावसाने दडी मारल्याने मूग, उडीद पिकांच्या वाढीवर विपरित परिणाम होऊन उत्पन्नात १० ते २० टक्के घट आली होती. आता पुन्हा १८ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीन, ज्वारी, बाजरी, कपाशी आदी पिकांना फटका बसला आहे. सोयाबीन फुलोऱ्याच्या व दाणे भरण्याच्या अवस्थेत असल्याने उत्पन्नात घट घेणार आहे. तर ज्वारी, बाजरी ही पिकेही दाणे भरण्याच्या अवस्थेत असल्याने त्यांच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला आहे. उत्पन्नात किमान २५-३० टक्के घट येण्याची शक्यता आहे. कापूस बोंड फुटण्याच्या अवस्थेत आहे. त्याच्या पोषणासाठी पावसाची गरज होती. मात्र पावसाने दडी मारल्याने कपाशीवर रस शोषण किडीचा, फुलकिडे, तुडतुडे, मावा यांचा प्रादुर्भाव झाला आहे. हा प्रादुभार्व कपाशीच्या सर्वच क्षेत्रावर आर्थिक नुकसानीच्या पातळीवर आहे.दरवर्षी पोळ्याला पावसाची हजेरी असते. मात्र यंदा पोळाही कोरडा गेला. त्यामुळे गणरायासोबत तरी पावसाचे आगमन व्हावे, अशी आस बळीराजाला लागली आहे.१७ गावांना १३ टँकर सुरूचजिल्ह्यात अजूनही १७ गावांना १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्यात जळगाव तालुक्यातील १, चाळीसगाव तालुक्यातील ५ व अमळनेर तालुक्यातील ९ गावांचा समावेश आहे. याखेरीज २७ गावांना अधिग्रहित केलेल्या ३३ विहिरींवरून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.धरणांमध्ये एकूण ५१.१४ टक्के पाणीसाठाजिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये मिळून एकूण ५१.१४ टक्के पाणीसाठा झाला आहे, हतनूर, वाघूर व गिरणा या तीन मोठ्या धरणांमध्ये एकूण ६०.२१ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यात हतनूर ९७.०२ टक्के भरले असून गिरणा धरणात ४८.६७ टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला गिरणा धरणात ६१.६१ टक्के पाणीसाठा झाला होता. त्या तुलनेत हा पाणीसाठा फारच कमी आहे. तर जळगाव शहराची पाणी पुरवठा योजना अवलंबून असलेल्या वाघूर धरणात जेमतेम ४६.७३ टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला ६५.०८ टक्के पाणीसाठा झाला होता. त्यामुळे या धरणांमधील पाणीसाठा वाढण्यासाठी आणखी जोरदार पावसाची आवश्यकता आहे.५ मध्यम प्रकल्पांमध्ये शून्य टक्के साठा१३ मध्यम प्रकल्पांपैकी अभोरा, मंगरूळ, सुकी या तीन प्रकल्पांमध्ये १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. तर बहुळा, अंजनी, भोकरबारी, बोरी व मन्याड या पाच प्रकल्पांमध्ये शून्य टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यामुळे या मध्यम प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या गावांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची भिती आहे.खान्देशात १६ सप्टेंबरपर्यंत कुठेही पावसाची शक्यता दिसत नाही. पडला तर हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यापासून मात्र खान्देशात पावसाला सुरुवात होईल.-के.एस.होसाळीकर, उपसंचालक, प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई.

टॅग्स :RainपाऊसJalgaonजळगाव