शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

जळगाव जिल्ह्यात पाऊस कमी असतानाही सर्व गावांची नजर पैसेवारी ५० पैशांच्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 12:29 IST

दुष्काळी योजनांच्या लाभावर साशंकता

जळगाव : जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यातील १५०२ गावांची नजर पैसेवारी जिल्हा प्रशासनाने शनिवारी जाहीर केली आहे. जिल्ह्यात ६२.८ टक्केच पाऊस झाला असताना जिल्ह्यातील एकाही गावाची नजर पैसेवारी ५० पैशांच्या आत नसून सर्व गावांची नजर पैसेवारी ५० पैशांच्या वर असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.यंदा झालेल्या पावसापैकी पूर यावा असा पाऊस मोजक्याच वेळा झाला. जमिनीत जिरणारा पाऊस जास्त प्रमाणात झाला. त्यामुळे पावसाची टक्केवारी कमी असली तरीही पिकांना वेळेवर पाणी मिळाल्याने पिकांची स्थिती चांगली असल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे.दुष्काळी योजनांच्या लाभावर साशंकतापैसेवारी ५० पैशांच्यावर असल्याने दुष्काळी योजनांचा जो लाभ मिळतो, तो मिळण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. एरंडोल तालुक्यात सर्वाधिक ८३.८ टक्के पाऊस आतापर्यंत झाला आहे. मात्र भुसावळ तालुक्यात ५० टक्केही पाऊस नसताना (४९.७ टक्के) या तालुक्यातील सर्व गावांची पैसेवारी ५० टक्क्यांच्यावर घोषित करण्यात आली आहे. अशाच प्रकारे मुक्ताईनगर तालुक्यात ५२.७, यावल तालुक्यात ५२.८, भडगाव तालुक्यात ५७.४ टक्के पाऊस असताना तेथेही अशीच पैसेवारी जाहीर केली आहे.तालुका व कंसात पावसाची टक्केवारी - जळगाव (५९.२), जामनेर (५९.६), एरंडोल (८३.८), धरणगाव (७९.८), भुसावळ (४९.७), यावल (५२.८), रावेर (६४.९), मुक्ताईनगर (५२.७), बोदवड (६४.९), पाचोरा (६१.२), चाळीसगाव (६२.२), भडगाव (५७.४), अमळनेर (५५.९), पारोळा (७५.७), चोपडा (६२.२).

टॅग्स :RainपाऊसJalgaonजळगाव