शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक तीन महिने पुढे ढकलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 11:57 IST

विकास सोसयटी संचालकांना दिलासा, शेतकरी कर्जमाफी योजनेस बाधा येऊ नये म्हणून निर्णय

जळगाव : जिल्हा सहकारी बँकेची होऊ घातलेली निवडणूक आता तीन महिने पुढे ढकलली असून त्या संदर्भात शासनाने परिपत्रक काढले आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या कामास विलंब होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, मार्च नंतर शेतकरी कर्जमुक्त होतील आणि त्यामुळे सोसायट्यादेखील निरंक होतील व थकबाकीदार राहणार नाहीत. परिणामी विकासोचे सदस्य जिल्हा बँकेची निवडणूक लढवण्यास पात्र ठरण्याचा मार्गही यामुळे मोकळा झाला असून त्यांना यामुळे एकप्रकारे दिलासाच मिळाला आहे.जिल्हा बँकेची निवड प्रक्रिया सुरू झाली असून जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी ३१ जानेवारी २०२०पर्यंत जिल्ह्यातील विकास सोसायटींचे ठराव मागविण्यात आले आहेत. मात्र ही मुदत पूर्ण होण्यापूर्वीच जिल्हा बँकेची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची राज्य सरकारने घोषणा केली. त्यामुळे पुढील हंगाम सुरु होण्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याची कार्यवाही पूर्ण करावी लागणार असल्याने सहकार विभागाने जिल्हास्तरीय क्षेत्रीय अधिकारी तसेच जिल्हाधिकारी व त्यांचे क्षेत्रीय अधिकारी यांचा सहभाग अपेक्षित आहे. यासाठी बहुतांश अधिकारी योजनेच्या अंमंलबजावणीत व्यस्त राहणाह आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला व तसे परिपत्रक २७ जानेवारी रोजी काढण्यात आले.इच्छुकांचा मार्ग मोकळाजर विकासो थकबाकीदार असेल तर त्या संस्थेच्या संचालकांचा ठराव करता येणार नाही. त्याऐवजी थकबाकीदार नसलेल्या सक्रीय सभासदाच्या नावाचा ठराव करता येणार आहे. त्यामुळे थकबाकी असलेल्या विकासोंच्या अनेक इच्छुक संचालकांचा पत्ता कट झाला होता. मात्र मार्चनंतर कर्जमाफीमुळे अनेक संस्था कर्जमुक्त होऊन ‘अ’ वर्गात जाणार आहेत. अशा संस्थांच्या संचालकांना त्यामुळे निवडणुक लढविणे शक्य होणार आहे. आता निवडणूकच तीन महिने पुढे ढकलल्याने इच्छुकांचा निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

टॅग्स :Jalgaonजळगाव