शहरं
Join us  
Trending Stories
1
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
2
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
3
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
4
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
5
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
6
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
7
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
8
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
9
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
10
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
11
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
12
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
13
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
14
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
15
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
16
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
18
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
19
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
20
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास

जळगाव जिल्ह्याला पावसाने पुन्हा झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 12:36 IST

पावसाची सरासरी १०६ टक्क्यांवर

जळगाव : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून बुधवारी पाचोरासह परिसरात झालेल्या जोरदार पावसानंतर गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जिल्ह्याला पुन्हा पावसाने झोडपले. जळगाव शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला.जिल्ह्यात यंदा पावसाने दमदार व सलग हजेरी लावल्याने जिल्ह्याची पावसाची सरासरी १०५.७ टक्क्यांवर पोहोचली आहे. तर जिल्ह्यातील ३ मोठे, १३ मध्यम व ९६ लघुप्रकल्प मिळून एकूण जलसाठा ७९ टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र तरीही भोकरबारी, मन्याड या मध्यम प्रकल्पांमध्ये अद्यापही शून्य टक्के तर अग्नावती धरणात १.६३ टक्केच उपयुक्त साठा झाला आहे.जिल्ह्यात यंदा पावसाने तब्बल २३ दिवस उशीराने हजेरी लावली. मात्र त्यानंतर दोन-चार दिवसांचाच खंड वगळता पावसाने सातत्यपूर्ण व जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे जिल्ह्याने पावसाची शंभरी पार केली असून आतापर्यंत १०५.७ टक्के पाऊस झाला आहे.११ तालुक्यात सरासरी शंभरीपारजिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी ११ तालुक्यांमध्ये पावसाची सरासरी १०० च्या पुढे गेली आहे. तर उर्वरीत ४ तालुक्यांपैकी चाळीसगाव वगळता अन्य तीन तालुक्यांची सरासरीही ९५ टक्क्यांच्या पुढेच असून परतीच्या पावसात या तालुक्यांमध्येही पाऊस शंभरी गाठण्याची शक्यता आहे. त्यात जळगाव ९५.५ टक्के, धरणगाव ९५.४, तर भडगाव ९५.६ टक्के यांचा समावेश आहे.सर्वात कमी चाळीसगावात तर सर्वाधिक रावेर तालुक्यातचाळीसगाव तालुक्यात जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे ८२.६ टक्के पाऊस झाला आहे. तर सर्वाधिक १२८.९ म्हणजेच १२९ टक्के पाऊस रावेर तालुक्यात झाला आहे. जामनेर तालुक्यात १०७.४ टक्के, एरंडोल ११५.४, भुसावळ ११३.४, यावल ११८.१, मुक्ताईनगर १०६.५, बोदवड १०८.७, पाचोरा १०२.८, अमळनेर १०४.४, पारोळा १०४ तर चोपडा तालुक्यात १०६.५ टक्के पाऊस झाला आहे.धरणांमध्ये एकूण ७९ टक्के पाणीसाठाजिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये मिळून एकूण ७८.९२ टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी हाच साठा जेमतेम ५२.३७ टक्के होता.मोठ्या प्रकल्पांसोबत मध्यम प्रकल्पही समाधानकारक पाणीसाठाजिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये ८६.०३ टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी आजच्या दिवसापर्यंत केवळ ६०.२४ टक्के पाणीसाठा झाला होता. यंदा हतनूरमध्ये ६१.१८ टक्के, गिरणात १०० टक्के तर वाघूर धरणात ८२.१० टक्के पाणीसाठा झाला आहे. अद्यापही या धरणांमध्ये पाण्याची आवक सुरूच असल्याने उर्वरीत दोन्ही मोठ्या प्रकल्पांमध्येही १०० टक्के पाणीसाठा होण्याची अपेक्षा आहे.दोन मध्यम प्रकल्पांत शून्य टक्के पाणीसाठाजिल्ह्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावलेली असतानाही भोकरबारी व मन्याड धरणात शून्य टक्के उपयुक्त पाणीसाठा असून अग्नावती धरणात १.६३ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव