शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

जळगाव जिल्ह्यात कर्जमाफी यादीतील २०५ पैकी ११३ शेतकऱ्यांनी पहिल्याच दिवशी केली आधार पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 12:59 IST

लगेचच खात्यावर जमा होणार रक्कम, मागील कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या ४० टक्के शेतकऱ्यांना पुन्हा लाभ

जळगाव : महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत शेतकºयांना कर्जमाफीचा लवकरात लवकर लाभ देण्याचे आदेश शासनाने दिले असल्याने जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील कराडी व यावल तालुक्यातील हिंगोणे या दोन गावातील एकूण २०५ पात्र शेतकºयांची यादी सोमवार, २४ फेब्रुवारी रोजी प्रायोगिक तत्वावर प्रसिद्ध करण्यात आली. त्यापैकी ११३ शेतकºयांनी पहिल्याच दिवशी तातडीने आधार पडताळणीही पूर्ण केली. त्यामुळे त्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्यातील उर्वरीत १ लाख ८० हजार ४२५ पात्र लाभार्र्थींच्या याद्याही टप्प्याटप्प्याने जाहीर होणार आहेत.महाविकास आघाडी सरकारने शेतकºयांसाठी महात्मा फुले कर्ज मुक्ती योजना राबविण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार सहकार विभागाकडून माहिती मागविण्यात आली होती. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.७१४२ शेतकºयांची माहिती अपलोड करणे बाकीजिल्हा बँकेच्या पात्र ठरलेल्या १ लाख ५१ हजार २०१ खातेदार शेतकºयांपैकी १४८१ शेतकºयांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करणे बाकी आहे. तर राष्टÑीयकृत बँकांच्या २९ हजार ४२९ पात्र खातेधारकांपैकी २३ हजार ७६८ खातेधारक शेतकºयांचीच माहिती अपलोड झाली असून अद्यापही ५६६१ शेतकºयांची माहिती अपलोड करणे बाकी आहे. एकूण ७१४२ शेतकºयांची माहिती अपलोड करणे बाकी आहे.१ लाख ८० हजार ६३० शेतकरी ११०४ कोटींच्या कर्जमाफीसाठी पात्रमहात्मा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ८० हजार ६३० शेतकरी ११०४ कोटी ४७ लाखांच्या कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. यापैकी राष्टÑीयकृत बँकेचे २९ हजार ४२९ शेतकरी ३२१ कोटींच्या कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून जल्हिा बँकेचे १ लाख ५१ हजार २०१ शेतकरी ७८३ कोटी ४७ लाखांच्या कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत.दोन गावांमधील २४५ शेतकरीपारोळा तालुक्यातील कराडी येथील ८२ व यावल तालुक्यातील हिंगोणे येथील १२३ अशा २०५ शेतकºयांची यादी प्रातिनिधीकस्तरावर सोमवारी प्रसिद्ध झाली. त्यात कराडी येथे जिल्हा बँकेचे सभासद ७८ शेतकरी व राष्टÑीयकृत बँकेचे ४ सभासद शेतकºयांचा समावेश आहे. तर हिंगोणे येथील १२३ शेतकºयांमध्ये जिल्हा बँकेचे सभासद १२० शेतकरी व राष्टÑीयकृत बँकेचे सभासद ३ शेतकºयांचा समावेश आहे. त्या यादीत दिलेल्या कर्जरक्कमेवर संबंधीत शेतकºयांचा आक्षेप नसल्याने आधार प्रमाणीकरण झाले. ११३ शेतकºयांची आधार पडताळणी झाली.४० टक्के शेतकºयांना पुन्हा कर्जमाफीचा लाभसतत चार वर्षांच्या नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात सापडून थकबाकीदार झालेल्या शेतकºयांना पीककर्जही मिळणे अशक्य झाल्याने दिलासा देण्यासाठी मागील युती शासनाने २८ जून २०१७ रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७’ या नावाने कर्जमाफी योजनेची घोषणा केली. मात्र नियमांमधील सततच्या बदलांमुळे ही कर्जमाफी योजना पाच वर्ष रखडली. जिल्ह्यातील या योजनेसाठी पात्र ठरलेले २० हजार शेतकरी अद्यापही या कर्जमाफीच्या प्रत्यक्ष लाभापासून वंचितच राहिले आहेत. त्याबाबत महाविकास आघाडी सरकारकडून काहीही निर्देश आलेले नाहीत. तर मागील कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकºयांपैकी ४० टक्के शेतकरी आता पुन्हा महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले आहेत.कर्जमाफी ऐवजी समस्या सोडवामहाविकास आघाडी सरकारने सरसकट कर्जमाफी करायला हवी होती. त्यांना यापूर्वीही लाभ मिळाला आहे. त्यांना पुन्हा कर्जमाफीचा लाभ मिळाला. मात्र नियमित कर्जफेड करणाºयांना काहीच लाभ न मिळाल्याने भविष्यात नियमित कर्जफेड करणारेही थकबाकीदार होतील. तसेच कर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी आहे. स्वत: शासन हे मान्य करते. मात्र कायमस्वरूपी उपाययोजना का होत नाहीत. शेतकºयांंना बाजारभाव, २४ तास वीज, पाणी, चांगले शेतरस्ते आदी सुविधा द्या, त्यांना कर्जमाफीची गरज भासणार नाही. तरीही काही प्रमाणात का होईना शेतकºयांना या कर्जमाफीने दिलासा मिळाला. त्याचे स्वागत आहे.-डॉ.सत्वशील जाधव, शेतकरी प्रतिनिधी.उत्पादन खर्चावर हमीभाव द्यापरत-परत लाभार्थ्यांना कर्जमाफी होत आहे. त्यांनाच या योजनेत पुन्हा कर्जमाफी झाली का? हे बघावे लागेल. ज्यांचे २ लाखांच्या वर कर्ज थकीत आहे. त्यांनाही लाभ द्यायला हवा होता. तसेच जे नियमित कर्जफेड करताहेत त्यांनाही काही लाभ द्यायला हवा होता. तरीही काही शेतकºयांना लाभ मिळाला त्याचा आनंद आहे. मात्र शासनाने उत्पादन खर्चावर आधारीत हमीभाव देण्याची गरज आहे. त्यासाठी शासनाने भावांतर योजनेसारख्या योजना राबवाव्यात. कर्जमाफीऐवजी या योजनांवर पैसा खर्च करावा. -एस.बी.पाटील,समन्वयक, शेतकरी सुकाणू समिती.

टॅग्स :Jalgaonजळगाव