शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

१४ महिन्यातच जळगाव शहराच्या मतदानात १२ टक्क्यांची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 13:15 IST

रस्ते, जनजागृतीचा अभाव व चिखलामुळे मतदारांची पाठ

अजय पाटील जळगाव : शहरातील रस्त्यांची समस्या, मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृतीत प्रशासनाला आलेले अपयश व दोन दिवसांपासून शहरात सुरु असलेली पावसाची रिपरिप यामुळे मतदानाच्या टक्केवारीत कमालीची घट झाली आहे. शहरात अंदाजे ४५.१४ टक्के मतदान झाले असून, मनपा निवडणुकीनंतर अवघ्या १४ महिन्यातच शहरातील मतदानाच्या टक्केवारीत १२ टक्क्यांची घट झाली आहे.आॅगस्ट २०१८ मध्ये मनपा निवडणुकीसाठी शहरात ५७ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर एप्रिल २०१९ झालेल्या लोकसभा निवडणुकीत ४९ टक्के मतदान झाले होते. सहा महिन्याच्या अंतरातच शहरातील मतदानाच्या टक्केवारीत ८ टक्के घट झाली होती. विधानसभा निवडणुकीत स्थानिक उमेदवार शहरातील समस्यांच्या प्रश्न असतो त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत वाढ होईल अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी उलट स्थिती दिसून आली. शहरात केवळ ४५.१४ टक्के मतदानाची नोंद झाली असून, लोकसभेच्या निवडणुकीनंतर अवघ्या पाच महिन्यातच ४ टक्के घट झाली आहे. केवळ १४ महिन्यांचा अंतरातच शहराच्या मतदानाच्या टक्केवारीत १२ टक्क्यांची घट का झाली ? याबाबत राजकीय पक्ष व प्रशासनाने विचारमंथन करण्याची गरज आहे.मतदानाच्या टक्केवारीत वाढ न होण्याची ही आहेत कारणेगेल्या दोन दिवसांपासून शहरात पावसाची रिपरिप सुरु होती. त्यामुळे अनेक भागातील रस्त्यांवर पाणी साचले होते तसेच वाढीव भागांमध्ये रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल पसरल्यामुळे पायी चालणेही कठीण होते. त्यामुळे नागरिकांमध्ये निरुत्साह जाणवला. नागरिकांनी मतदान केंद्रापर्यंत जाणे टाळले असावे.अमृत योजनेच्या कामामुळे शहरातील रस्त्यांची अक्षरश वाट लागली आहे. वर्षभरापासून नागरिक शहरातील खड्डयांच्या समस्येमुळे त्रस्त आहे. खड्डयांचा प्रश्नावर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पहायला मिळाली होती. त्यामुळे अनेकांनी मतदानातून बदल न करता मतदानापासून दुर राहणेच पसंत केल्याचे दिसून येत आहे.प्रत्येक नागरिकाला मतदान करता यावे यासाठी प्रशासनाकडून सोमवारी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली होती. काही कंपन्यांनीही कामगारांना सुट्टी दिली होती. मात्र, रविवार व सोमवारची सलग सुट्टी आल्यामुळे अनेक मतदारांनी मतदानाचा हक्क न बजावता सुट्टीचा आनंद घेतला.बीएलओंवर मतदारांपर्यंत मतदान चिठ्ठया पोहचविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र, मतदारांपर्यंत या चिठ्ठया पोहचल्याच नाहीत. तसेच ज्या चिंठ्ठया पोहचल्या त्यात मतदान केंद्राचे नावच नव्हते. त्यामुळे देखील अनेकांनी मतदानकेंद्राकडे पाठ फिरवल्याचे चित्र पहायला मिळाले.मनपा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर झाला होता. त्यामुळे नगरसेवक, पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मतदान काढण्यावर अधिक भर देण्यात आला होता.तसेच प्रशासनाकडूनही जागृतीसाठी चांगले प्रयत्न झाले होते. शहराची निवडणूक हवी तशी प्रतिष्ठेची नव्हती. यावेळी नगरसेवकांनीही फार प्रयत्न केले नाहीत.

टॅग्स :Jalgaonजळगाव