शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

जळगावात भाजपाने उमेदवारीबाबत गाफील ठेवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 14:11 IST

आयात उमेदवारांमुळे भाजपात मोठ्या प्रमाणावर नाराजी असून नगरसेविका जयश्री नितीन पाटील व भाजयुमोचे सदस्य संग्रामसिंग सुरेशसिंग सूर्यवंशी यांनी बंडखोरी केली आहे. जयश्री पाटील यांनी मतदारांना आवाहन केलेल्या जाहीर पत्रकात म्हटले आहे की, पक्षाने आपल्याला झुलवत आणि गाफील ठेवले. यामुळेच आपण अपक्ष उमेदवारी कायम ठेवली असून शिवेसनेचे पुरस्कृत म्हणून मान्य केले आहे.

ठळक मुद्देविद्यमान नगरसेविका जयश्री पाटील यांची नाराजीभाजयुमो सदस्य संग्रामसिंग यांचेही बंडअपक्ष उमेदवारी कायम ठेवल्यानंतर शिवसेनेकडून पाठिंबा

जळगाव : आयात उमेदवारांमुळे भाजपात मोठ्या प्रमाणावर नाराजी असून नगरसेविका जयश्री नितीन पाटील व भाजयुमोचे सदस्य संग्रामसिंग सुरेशसिंग सूर्यवंशी यांनी बंडखोरी केली आहे. जयश्री पाटील यांनी मतदारांना आवाहन केलेल्या जाहीर पत्रकात म्हटले आहे की, पक्षाने आपल्याला झुलवत आणि गाफील ठेवले. यामुळेच आपण अपक्ष उमेदवारी कायम ठेवली असून शिवेसनेचे पुरस्कृत म्हणून मान्य केले आहे.भाजपाच्या वाईट दिवसातही उमेदवारी केलीमतदारांना वितरीत केलेल्या पत्रकात जयश्री पाटील यांनी नमूद केले आहे की, त्यांचे पती नितीन पाटील हे १९९५ पासून भाजपाशी एकनिष्ठ आहे. १९९६ ला भाजपाकडून लढण्यास कोणीही तयार नसताना नितीन पाटील यांनी उमेदवारी केली. २००१ ला केवळ ४७ मतांनी पराभूत झाले. २००३ ला निवडून आले. यानंतर जयश्री पाटील या सलग दोनदा भाजपाकडून निवडून आल्या.ज्यांना विरोध केला त्यांनाच भाजपाने जवळ केले - सूर्यवंशीभाजपाने कालपर्यंत ज्या शक्तींना विरोध केला आज त्याच विचाराच्या व्यक्तींना संधी देवून स्वकीयांना डावलले आहे. याविरोधातच अपक्ष म्हणून पक्षाविरोधात पाऊल उचलत प्रभाग १४ ड मध्ये बंडखोरी केल्याचे संग्रामसिंह सुरेशसिंह सूर्यवंशी यांनी सांगितले.संग्रामसिंह हे स्वत: भाजयुमोचे सदस्य असून त्यांचे वडील डॉ. सुरेशसिंह सूर्यवंशी हे भाजपाच्या राष्ट्रीय परिषदेचे सदस्य व पक्षाचे निष्ठावंत आहेत. स्वत: सुरेशसिंह सूर्यवंशी यांचीही एकदा विधानपरिषदेची उमेदवारी पक्षाने ऐनवेळी कापली होती आणि आता डॉ.सूर्यवंशी यांच्या पत्नी मोहिनी सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्याचे निश्चित असताना आयात केलेल्या उमेदवारांमुळे त्यांना उमेदवारी न देता संग्रामसिंह यांना उमेदवारी देण्याचे आश्वासन पक्षाने दिले आणि शेवटपर्यंत झुलवत ठेवले. ज्या ठिकाणाहून त्यांना उमेदवारी देण्यात येणार होती त्या ठिकाणीही आयात उमेदवार दिला. दुसऱ्या ठिकाणी अर्ज दाखल करण्यास सांगून ऐनवेळी तेथेही उमेदवारी दिली नाही, असे संग्रामसिंह यांचे म्हणणे आहे.दरम्यान भाजपाने ज्या शक्तींचा विरोध केला त्या विरुद्ध आपल्या वडिलांनी नेहमीच लढा दिला आहे, आणि आज त्याच शक्तींशी पक्षाने सोबत केल्याने आपण स्वतंत्रपणे लढा देण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.दरम्यान प्रभाग १४ ड मध्ये भाजपाने राजेंद्र पाटील यांना तर ब मध्ये सुरेखा सुदाम सोनवणे यांना उमेदवारी दिली आहे.मॅनेजमेंट गुरुंसह चौघांनी अर्ज भरायला सांगितला अन्....संघटनमंत्री, महानगराध्यक्ष, विधानपरिषदेचे आमदार व पक्षाचे मॅनेजमेंट गुरु यांनी ७ क आणि ड मध्ये अर्ज दाखल करायला सांगितले व नंतर १० रोजी रात्री ७ अ मधून अर्ज भरण्याची सूचना फोनवरुन केली. परंतु नितीन पाटील यांनी सांगितले की आम्हाला महापौर व्हायचे नाही व ओबीसी जात पडताळणीही नाही. यावर पक्षाने सांगितले की, आम्ही तुमच्यासाठी मामींचे तिकिट कापत आहे, तुम्ही ७ अ व ब मध्ये अर्ज भरा. परंतु आमच्यासाठी ज्यांचे तिकिट कापल्याचे सांगितले, त्यांनी आधीच जावून अर्ज भरला, असे आम्हाला गाफील ठेवले व नंतर आमचा फोनही पदाधिकाºयांनी घेतला नाही. यानंतर जयश्री पाटील यांनी ७ ड मधून उमेदवारी केली आहे. यावर आम्ही काय गुन्हा केला? असा सवाल जयश्री पाटील यांनी केला आहे. या ठिकाणी भाजपाने सचिन भिमराव पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

टॅग्स :JalgaonजळगावMuncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूक