शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
5
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
6
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
7
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
8
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
9
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
10
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
11
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
12
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
13
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
14
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
15
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
16
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
17
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
18
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
19
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
20
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन

जळगावात भाजपाने उमेदवारीबाबत गाफील ठेवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 14:11 IST

आयात उमेदवारांमुळे भाजपात मोठ्या प्रमाणावर नाराजी असून नगरसेविका जयश्री नितीन पाटील व भाजयुमोचे सदस्य संग्रामसिंग सुरेशसिंग सूर्यवंशी यांनी बंडखोरी केली आहे. जयश्री पाटील यांनी मतदारांना आवाहन केलेल्या जाहीर पत्रकात म्हटले आहे की, पक्षाने आपल्याला झुलवत आणि गाफील ठेवले. यामुळेच आपण अपक्ष उमेदवारी कायम ठेवली असून शिवेसनेचे पुरस्कृत म्हणून मान्य केले आहे.

ठळक मुद्देविद्यमान नगरसेविका जयश्री पाटील यांची नाराजीभाजयुमो सदस्य संग्रामसिंग यांचेही बंडअपक्ष उमेदवारी कायम ठेवल्यानंतर शिवसेनेकडून पाठिंबा

जळगाव : आयात उमेदवारांमुळे भाजपात मोठ्या प्रमाणावर नाराजी असून नगरसेविका जयश्री नितीन पाटील व भाजयुमोचे सदस्य संग्रामसिंग सुरेशसिंग सूर्यवंशी यांनी बंडखोरी केली आहे. जयश्री पाटील यांनी मतदारांना आवाहन केलेल्या जाहीर पत्रकात म्हटले आहे की, पक्षाने आपल्याला झुलवत आणि गाफील ठेवले. यामुळेच आपण अपक्ष उमेदवारी कायम ठेवली असून शिवेसनेचे पुरस्कृत म्हणून मान्य केले आहे.भाजपाच्या वाईट दिवसातही उमेदवारी केलीमतदारांना वितरीत केलेल्या पत्रकात जयश्री पाटील यांनी नमूद केले आहे की, त्यांचे पती नितीन पाटील हे १९९५ पासून भाजपाशी एकनिष्ठ आहे. १९९६ ला भाजपाकडून लढण्यास कोणीही तयार नसताना नितीन पाटील यांनी उमेदवारी केली. २००१ ला केवळ ४७ मतांनी पराभूत झाले. २००३ ला निवडून आले. यानंतर जयश्री पाटील या सलग दोनदा भाजपाकडून निवडून आल्या.ज्यांना विरोध केला त्यांनाच भाजपाने जवळ केले - सूर्यवंशीभाजपाने कालपर्यंत ज्या शक्तींना विरोध केला आज त्याच विचाराच्या व्यक्तींना संधी देवून स्वकीयांना डावलले आहे. याविरोधातच अपक्ष म्हणून पक्षाविरोधात पाऊल उचलत प्रभाग १४ ड मध्ये बंडखोरी केल्याचे संग्रामसिंह सुरेशसिंह सूर्यवंशी यांनी सांगितले.संग्रामसिंह हे स्वत: भाजयुमोचे सदस्य असून त्यांचे वडील डॉ. सुरेशसिंह सूर्यवंशी हे भाजपाच्या राष्ट्रीय परिषदेचे सदस्य व पक्षाचे निष्ठावंत आहेत. स्वत: सुरेशसिंह सूर्यवंशी यांचीही एकदा विधानपरिषदेची उमेदवारी पक्षाने ऐनवेळी कापली होती आणि आता डॉ.सूर्यवंशी यांच्या पत्नी मोहिनी सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्याचे निश्चित असताना आयात केलेल्या उमेदवारांमुळे त्यांना उमेदवारी न देता संग्रामसिंह यांना उमेदवारी देण्याचे आश्वासन पक्षाने दिले आणि शेवटपर्यंत झुलवत ठेवले. ज्या ठिकाणाहून त्यांना उमेदवारी देण्यात येणार होती त्या ठिकाणीही आयात उमेदवार दिला. दुसऱ्या ठिकाणी अर्ज दाखल करण्यास सांगून ऐनवेळी तेथेही उमेदवारी दिली नाही, असे संग्रामसिंह यांचे म्हणणे आहे.दरम्यान भाजपाने ज्या शक्तींचा विरोध केला त्या विरुद्ध आपल्या वडिलांनी नेहमीच लढा दिला आहे, आणि आज त्याच शक्तींशी पक्षाने सोबत केल्याने आपण स्वतंत्रपणे लढा देण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.दरम्यान प्रभाग १४ ड मध्ये भाजपाने राजेंद्र पाटील यांना तर ब मध्ये सुरेखा सुदाम सोनवणे यांना उमेदवारी दिली आहे.मॅनेजमेंट गुरुंसह चौघांनी अर्ज भरायला सांगितला अन्....संघटनमंत्री, महानगराध्यक्ष, विधानपरिषदेचे आमदार व पक्षाचे मॅनेजमेंट गुरु यांनी ७ क आणि ड मध्ये अर्ज दाखल करायला सांगितले व नंतर १० रोजी रात्री ७ अ मधून अर्ज भरण्याची सूचना फोनवरुन केली. परंतु नितीन पाटील यांनी सांगितले की आम्हाला महापौर व्हायचे नाही व ओबीसी जात पडताळणीही नाही. यावर पक्षाने सांगितले की, आम्ही तुमच्यासाठी मामींचे तिकिट कापत आहे, तुम्ही ७ अ व ब मध्ये अर्ज भरा. परंतु आमच्यासाठी ज्यांचे तिकिट कापल्याचे सांगितले, त्यांनी आधीच जावून अर्ज भरला, असे आम्हाला गाफील ठेवले व नंतर आमचा फोनही पदाधिकाºयांनी घेतला नाही. यानंतर जयश्री पाटील यांनी ७ ड मधून उमेदवारी केली आहे. यावर आम्ही काय गुन्हा केला? असा सवाल जयश्री पाटील यांनी केला आहे. या ठिकाणी भाजपाने सचिन भिमराव पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

टॅग्स :JalgaonजळगावMuncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूक