शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

सत्ताधाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच उद्भवली जळगाव-औरंगाबाद रस्त्याची बिकट समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 12:41 IST

जळगाव : गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सत्ता भाजपच्या ताब्यात असतानाही तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या मतदारसंघातूनच जाणाºया ...

जळगाव : गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सत्ता भाजपच्या ताब्यात असतानाही तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या मतदारसंघातूनच जाणाºया जळगाव-औरंगाबाद महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी मक्तेदाराने एकाच वेळी १४९ किमीचा रस्ता दोन्ही बाजूंनी खणून ठेवला आहे. काँक्रीटीकरणाचे काम मात्र दीड-दोन वर्षांपासून रखडवल्याने गंभीर समस्या निर्माण झाली आहे. जळगावचा औरंगाबादशी या मार्गाने असलेला संपर्क तुटल्यात जमा आहे.पावसाळा सुरू होण्यापूर्वी धूळ उडवित वाहने या खराब रस्त्यावरूनच ये-जा करीत होती. साडेतीन तासांच्या प्रवासासाठी तब्बल ६ तास लागत होते. मात्र पर्याय नसल्याने नागरिकांना हा त्रास सहन करावाच लागत होता. कारण जळगावहून औरंगाबादला अनेक रूग्ण घाटी रूग्णालयात अथवा अन्य रूग्णालयात उपचारासाठी नेले जातात. तर जळगाव सोयगावपासून अनेक रूग्ण जळगाव शहरात उपचारासाठी येतात. दिल्ली अथवा अन्य ठिकाणी विमानाने जाणाºया प्रवाशांना औरंगाबादला जाऊन तेथून फ्लाईट मिळत होती. मात्र त्या प्रवाशांना आता मुंबईला जाण्याची वेळ आली आहे. जळगावहून पुण्याला जाणारा रस्ता हा औरंगाबादमार्गेच जातो. पुण्याला जळगावहून दररोज किमान ५० खाजगी लक्झरी बसेस जात असतात. मात्र त्यांनाही या रस्त्याने जाणे अशक्य झाल्याने धुळे-मनमाडमार्गे पुण्याला जाण्याचा लांबचा फेरा पडत आहे. तर आता आता ४० किमीचा फेरा मारून चाळीसगावमार्गे औरंगाबादला जाण्याची वेळ ओढावली आहे. एस.टी.बसेसनेही याच रस्त्याचा वापर सुरू केला आहे. त्यातच पावसाळा सुरू झाला. यंदा पावसाने जोरदार हजेरी लावल्याने या खोदून ठेवलेल्या राष्टÑीय महामार्गाचे अक्षरश: तळे होऊन गेले. तरीही याच रस्त्याने वाहनांची ये-जा सुरू होती. चिखलात, पाण्यात वाहने रूतून कोंडी होत असल्याचे फोटो व्हायरल होत होते, मात्र तरीही त्याकडे सत्ताधाऱ्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष झाले.आमदार-खासदारांनी काय केले?जळगाव-औरंगाबाद रस्ता जळगावचे पालकमंत्री, राज्याचे जलसंपदामंत्री तथा मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघातूनच जातो. त्याखेरीज औरंगाबाद जिल्ह्यात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या मतदारसंघातूनच हा महामार्ग जातो. खूपच ओरड झाल्यावर विधानसभा अध्यक्ष बागडे यांनी याबाबत मुंबईत सुमारे वर्षभरापूर्वी बैठक बोलविली होती. जलसंपदामंत्री महाजन हे देखील त्यावेळी उपस्थित होते. रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत निम्म्या रस्त्याची किंवा कच्च्या रस्त्याची डागडुजी करण्याचे आदेशही दिले होते. मात्र त्या बैठकीत दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी देखील झाली नाही. मात्र या नेत्यांकडून या गंभीर विषयाचा पाठपुरावा झाला नाही. तसेच या परिसरातील खासदारांनीही दिल्लीत या विषयाचा पाठपुरावा करणे अपेक्षित होते. मात्र तसे न झाल्याने आजची परिस्थिती उद्भवली आहे.अधिका-यांवर कारवाई का नाही?४मक्तेदाराने जळगाव-औरंगाबाद हा १४९ किमी लांबीचा रस्ता काँक्रीटीकरणासाठी एकाच वेळी दोन्ही बाजूंनी खोदून टाकला. मात्र हे होत असताना या कामावर देखरेखीची जबाबदारी असलेले अधिकारी काय करत होते? त्यांनी या कामाचे नियोजन कसे आहे? लोकांची गैरसोय होणार नाही ना? याची माहिती घेतली नाही का? संबंधीत अधिकाºयांवर कारवाई का झाली नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.दीड वर्षापासून रखडलेले काम कसे होणारअजिंठ्याला जगभरातून येणाºया पर्यटकांना या खराब रस्त्यामुळे किंबहुना रस्ताच उरलेला नसल्याने आपला बेत रद्द करण्याची वेळ आली. जगभरात जळगाव-औरंगाबादची व पर्यायाने देशाची बदनामी झाल्यानंतर आता केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आठ दिवसांत या १४० किमी रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्याचे अवास्तव आदेश दिले आहेत. मात्र जे काम दीड वर्षांपासून रखडले आहे. त्याची दुरूस्ती किमान वाहने जातील अशी करणे देखील काही महिन्यांचे काम आहे. ते करण्यासाठी आठ दिवसांची दिलेली मुदत ही अवास्तव असून केवळ वेळ मारून नेण्यासाठीच अशी आश्वासने व इशारे दिले जात आहेत का? असा सवाल संतप्त प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.गडकरी यांचे ते आश्वासनमार्च २०१४ मध्ये जळगावात नितीन गडकरी यांची सभा झाली होती.यात त्यांनी जळगाव - धुळे चौपदरीकरणाचे कामाचे भूमिपूजन केले होते. त्यावेळी पुढील म्हणजे मार्च २०१५ मध्ये जळगाव- धुळे महामार्ग चौपदरीकरणाचे काम झालेले असेल, हे लागल्यास आपल्याकडून लिहून घ्यावे, असे भाषणात सांगितले होते. त्यामुळे आता जळगाव- औरंगाबाद मार्गाचे आठ दिवसात किती काम होईल, हे गडकरीच सांगू शकतात....

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव