शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव-औरंगाबाद महामार्ग ठरतोय प्रवाशांसाठी जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 12:18 IST

संपूर्ण रस्ता खोदल्याचा आरोप फेटाळला

जळगाव : चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम महामार्गाच्या दोन्ही बाजू मक्तेदाराने खोदून टाकल्याने हा जळगाव-औरंगाबाद महामार्ग प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे. विशेष म्हणजे काम पूर्ण करण्यासाठी दिलेल्या २ वर्षांच्या मुदतीपैकी सुमारे सव्वा वर्षांचा कालावधी संपत आला असतानाही जेमतेम २०-२५ किमी रस्त्याचे एकाच बाजूचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. मात्र तरीही या कामावर देखरेख असलेल्या औरंगाबाद सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे एका बाजूचे जळगाव-औरंगाबाद रस्त्याचे काँक्रीटीकरण जुलै अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असा दावा करण्यात येत आहे. तसेच मक्तेदाराने संपूर्ण १४० किमी लांबीचा रस्ता खोदून टाकल्याचा आरोप फेटाळून लावत केवळ ३०-३२ किमी लांबीचाच रस्ता खोदला असल्याचा दावा करीत मक्तेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्नही चालविला आहे.जुलैपर्यंत एक बाजू पूर्ण करणार...मुंबई येथे विधानसभा विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली व गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत या १४७ किमी लांबीच्या रस्त्याची एक बाजू जुलैपर्यंत काँक्रीटीकरण करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र जून महिना उजाडला तरीही या १४० किमी लांबीच्या महामार्गाच्या एका बाजूचे केवळ २०-२५ किमी लांबीचेच काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मात्र जुलैअखेर एक बाजू पूर्ण करण्यात येईल, असा दावा करीत आहेत.तीन टप्प्यात मक्ताऔरंगाबाद- सिल्लोड-जळगाव हा रस्ता राष्टÑीय महामार्ग म्हणून (एनएच ७५३एफ) घोषित झाला आहे. त्यात औरंगाबाद ते सिल्लोड व सिल्लोड ते जळगाव जिल्ह्याच्याहद्दीपर्यंत असे दोन टप्पे व जळगाव जिल्ह्याच्या हद्दीपासून ते अजिंठा चौफुली (१०० ते १४६ कि.मी.) हा तिसरा टप्पा, असे तीन टप्पे करून मक्ता देण्यात आला आहे.संपूर्ण रस्ता खोदल्याचा आरोप फेटाळलामक्तेदाराने संपूर्ण जळगाव-औरंगाबाद रस्ता खोदल्याचा आरोप औरंगाबाद सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एल.एस. जोशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना फेटाळून लावला. मक्तेदाराने केवळ ३०-३५ किमी लांबीचा रस्ताच खोदला होता. त्यातही एका बाजूचे काँक्रीटीकरण जवळपास पूर्ण होत आले आहे. दररोज ५०० ते ७०० मीटरचा पॅच करण्यात येत आहे. तो वाहतुकीस तयार होताच त्यावरून वाहतुक वळवली जात आहे. त्यामुळे लोकांचा त्रास लवकरच थांबेल. तसेच मक्तेदाराचे खोदकामही थांबविण्यात आले असल्याचेही सांगितले. जळगाव हद्दीतील कामाला मात्र पाण्यामुळे अडचण येत असल्याचे सांगितले. मध्यंतरी निधीची अडचण होती. मात्र ती अडचण दूर झाल्याने जुलै अखेरपर्यंत एक बाजू पूर्ण करण्यात येईल, असे सांगितले.कारवाईऐवजी मक्तेदाराची मनधरणी...मक्तेदाराने या महामार्गाचे काम हाती घेतल्यावर निधीची जरी अडचण असली तरी उपलब्ध निधीतून कामाचे नियोजन करूनच ते सुरू करणे आवश्यक असताना तसेच प्रवाशांचा, वाहतुकीचाही विचार करणे आवश्यक असताना तसे न करता सरसकट संपूर्ण रस्ताच जेसीबीने खोदून टाकला. त्यामुळे पूर्वी जळगाव ते औरंगाबाद प्रवासासाठी लागणारा साडेतीन तासांचा कालावधी वाढून तब्बल ६ तासांवर पोहोचला आहे. धुळीच्या रस्त्यांवरून धक्के खात प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. मात्र निवडणुकांमध्ये व्यस्त असलेल्या राजकारण्यांना या प्रश्नाकडे लक्ष देण्यास वेळ नाही. तर अधिकारी मात्र मक्तेदाराने एकाचवेळी दोन्ही बाजूचा सगळा रस्ता का खोदला? याचा जाब न विचारता तसेच या मक्तेदारावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई न करता मक्तेदार काम सोडून निघून जाईल, या भितीने मक्तेदाराचीच मनधरणी करीत असल्याचे चित्र आहे.दोषींवर गुन्हा दाखल करण्यासाठी चाचपणीकोणताच अनुभवी मक्तेदार दोन्ही बाजूंचा रस्ता एकाचवेळी खोदत नाही. त्यामुळे या मक्तेदाराने कोणावर तरी सूड उगवण्यासाठीच हा खोदकामाचा उद्योग केल्याचा आरोप जाणकारांकडून होत आहे. याप्रकरणी कुठल्या कायद्यानुसार दोषींवर गुन्हा दाखल करता येईल? याचीही चाचपणी सुरू झाली असल्याची माहिती एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकाºयाने ‘लोकमत’शी बोलताना दिली.

टॅग्स :Jalgaonजळगाव