शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
4
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
5
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
6
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
7
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
8
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
9
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
12
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
13
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
14
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
15
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
16
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
17
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
18
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
19
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
20
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?

सतपंथाचे जगन्नाथ महाराज

By admin | Updated: June 21, 2017 15:41 IST

संत परंपरेने जनतेच्या मनावर खोलवर संस्कार केले आहेत.

जगन्नाथ महाराज यांनी सतपंथीय अपप्रचार मोडून काढला. त्यासाठी प्रचंड पायपीट केली. चर्चा केल्या. महाराजांनी  सतपंथाचा ध्वज डौलाने फडकता ठेवला. महाराज या पंथाला वैदिक परंपरेतीला महत्त्वाचा दुवा सिद्ध करत होते.  महाराजांना हिंदी, संस्कृत, मराठी, इंग्रजी, या भाषा अवगत होत्या. 

प्रसिद्धीपरामुखता आणि एकांत प्रियतेमुळे त्यांचे संशोधन कार्य लोकांर्पयत अपेक्षित प्रमाणात पोहोचू शकले नाही.  महाराजांनी पंथाविषयीचे गढूळ जनमत बदलले. सतपंथाला जनताभिमुख केले. अध्ययन, संशोधन, लेखन आणि अध्यापन या चतु:सूत्रीवर त्यांचे जीवन आधारित होते. 
आज जिथे ‘सतपंथी संस्थान, फैजपूर धर्मशाळा’ अशी पाटी झळकते आहे तेथे चार शतकांपूर्वी असलेल्या देवळात सतपंथीयांचे देवघर होते. फैजपूरचे सतपंथी मंदिर भव्य आहे. दरवाजावर सुरेख कोरीव काम आहे. मंदिरावर दोन वेळा पांढरे निशाण चढवले जाते. गुढीपाडवा आणि 26 जुलै म्हणजे श्री पुरुषोत्तम महाराजांच्या पुण्यतिथीदिनी ते निशाण बदलले जाते. धर्मशाळेच्या वरच्या मजल्यावरचे ग्रंथालय दुर्मिळ ग्रंथांनी समृद्ध आहे. देवळात जिकडे नजर टाकावी तिकडे बोधवचने आणि अक्षरश: शेकडय़ांनी चित्रे आहेत. मंदिरातील चित्रे, त्यासोबतची माहिती आणि बोधवचनांच्या साहाय्याने एका ग्रंथाची निर्मिती होऊ शकेल एवढी सामग्री आहे. गीता तत्त्वज्ञानावर आधारित चित्रे, मोक्षमार्गाचा नकाशा, पंचमहायज्ञ, नवविधा भक्ती, चतुर्विध भक्ती, पंचविषय सेवन, देहाच्या चार अवस्था, मूळ बंधावर आधारित चित्रे, सत्त्व, रज, तम या त्रिगुणांवरील चित्रे अशी नाना विषयांवरील चित्रे इथे आहेत. पुरुषोत्तम महाराज ब्रrालीन झाले.  
 जगन्नाथ महाराजांनी महात्मा सद्गुरू इमामशहा महाराज या शीर्षकाने मौलिक ग्रंथांची रचना केली आहे.  लेखक म्हणून गुरूंच्या सन्मानार्थ  पुरुषोत्तम गुरू धर्मा महाराज असे नाव टाकले आहे. प्रस्तूत ग्रंथाला अकरा पृष्ठांची विवेचक अशी प्रस्तावना लाभली आहे. हे विवेचन जगन्नाथ महाराजांच्या व्यापक धर्मनिष्ठ प्र™ोचे निदर्शक आहे. सध्या हा ग्रंथ दुर्मिळ आहे. 
सर्वानी प्रकाशाच्या मार्गाने म्हणजे तेजस्वी अशा वैदिक सनातन मार्गाने कालक्रमणा करावी. कोणत्याही जाती, पंथ वा धर्माचे लोक का असेनात परमेश्वराला ते सारखेच प्रिय असतात. दु:खिताला मदत करणे हा परमेश्वराच्याच सर्वव्यापी धर्म असल्यामुळे त्याच्या अंमलबजावणीत भेदभाव करू नये. जगाचा परमेश्वर एकच असतो अणि परमेश्वराच्या धर्मही एकच असतो. ऐहिक जीवन सुखाचे करून परमार्थाचाही लाभ करून देणारा तो धर्म. संत परंपरेने जनतेच्या मनावर  खोलवर संस्कार केले आहेत.   
नदीच्या पाण्याने शेते पिकतात. त्याचप्रमाणे संतांच्या वचनाने जनतेच्या मनात सुविचारांचे, सद्भावनांचे, भक्तीचे मळे फुलतात. गुरुभक्ती, दया, क्षमा, शांती, या मानवाला उजळून काढणा:या पवित्र गुणांची शिकवण संतांनी दिली आहे. सर्वाभूती परमेश्वर ही भावना एकदा का आपल्या मनी दृढ झाली की उच्च-निच हा भेदभाव करणे कुणालाही शक्य होणार नाही. सारे जगच त्याला परमेश्वरमय दिसू लागेल.
 अशी मूलतत्त्वे जनतेच्या जीवनाशी तद्रूप होऊन जातात आणि आयुष्याच्या अखेर्पयत सत्य, शांती आणि प्रेम यांचा आचारधर्म सांडत नाहीत. सतपंथाच्या निमित्ताने मानवाला एक नवा उजाळा लाभला होता. आजही तो आपल्या पद्धतीने कार्यरत आहे. - प्रा.डॉ.विश्वास पाटील