शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
3
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
4
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
5
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
6
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
7
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
8
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
9
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
10
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती
11
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
12
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
13
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
14
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
15
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
16
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
17
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
18
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
19
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
20
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे

'आचार्य अत्रे यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या नावाने पुरस्कार मिळणे हे माझे भाग्य', ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांची भावना

By अमित महाबळ | Updated: August 14, 2022 00:17 IST

jalgaon News: आचार्य अत्रे यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या नावाने मला पुरस्कार मिळणे हे मी माझे भाग्य समजतो, अशा शब्दात ज्येष्ठ कवी व पद्मश्री ना. धों. महानोर यांनी आपली भावना व्यक्त केली.

- अमित महाबळ जळगाव : आचार्य अत्रे यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या नावाने मला पुरस्कार मिळणे हे मी माझे भाग्य समजतो, अशा शब्दात ज्येष्ठ कवी व पद्मश्री ना. धों. महानोर यांनी आपली भावना व्यक्त केली. ‘आत्रेय’तर्फे आयोजित ‘आचार्य अत्रे मानचिन्ह २०२२’ प्रदान समारंभात सन्मानाला उत्तर देताना ते बोलत होते. शनिवारी, गांधी तीर्थ येथील कस्तुरबा सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

व्यासपीठावर जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, आमदार शिरीष चौधरी, ॲड. राजेंद्र पै, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांची प्रमुख उपस्थिती होती. मंचावरील मान्यवर आणि आचार्य अत्रे यांचे पणतू अक्षय पै यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

अशोक जैन यांच्या हस्ते आचार्य अत्रे मानचिन्ह ना. धों. महानोर यांना प्रदान करण्यात आले. या सन्मानाला उत्तर देताना महानोर म्हणाले, की साहित्याच्या वाटचालीत आचार्य अत्रे व बालकवी ठोंबरे यांनी मला मोठे केले. उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या नावाने पुरस्कार मिळणे हे भाग्य समजतो. मी, हा पुरस्कार नम्रतापूर्वक स्वीकारतो आणि अत्रेंच्या सार्वभौम व्यक्तिमत्वाला नमस्कार करतो. आजच्या कार्यक्रमप्रसंगी जिवलग मित्र भवरलाल जैन आपल्यात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

मन स्वच्छ झाले पाहिजे‘श्यामची आई’ चित्रपटाचा संदर्भ देत महानोर यांनी मन स्वच्छ झाले नाही, त्याची आंघोळ झाली नाही, ते शुद्ध झाले नाही तर काय कामाचे या संवादांचा उल्लेख केला.

हा बेजबाबदारपणा१९९० पासून ते आजपर्यंत महात्मा फुले यांच्यावर चित्रपट निघाला नाही. हा चित्रपट निघावा, असे ठरले त्यावेळीच त्यासाठी पैसे बाजूला काढण्यात आले होते. इतक्या वर्षात आठ मुख्यमंत्री झाले. पण फुलेंवर चित्रपट न निघणे हा बेजबाबदारपणा कोणाचा म्हणावा, असा मुद्दाही त्यांनी मांडला. मी कोणाचे नाव घेणार नाही, असेही ते म्हणाले.

अत्रे, महानोर यांच्यात अनेक साम्यस्थळेअशोक जैन यांनी आचार्य अत्रे व ना. धों. महानोर यांच्यात अनेक साम्यस्थळे असल्याचा उल्लेख केला. ना. धों. महानोर म्हणजे विलक्षण शब्द सामर्थ्य असलेला कवी, शेतकऱ्यांचा मार्गदर्शक, गावगाड्यांचा अभ्यासक होय. मराठी भाषा, साहित्य संवर्धनात त्यांचे योगदान मोलाचे असल्याचे सांगितले.

यावेळी आमदार शिरीष चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात ॲड. राजेंद्र पै यांनी जळगावविषयीच्या आठवणींना उजाळा देत ना. धों. महानोर यांच्याकडे शब्दसामर्थ्य आहे. त्यांची कविता दाद मिळवून जाते. त्यांनी शेती, साहित्य यामध्ये केलेले कार्य अतुलनीय आहे. त्याला तोड नाही, असा उल्लेख केला. कार्यक्रमात इंद्रायणी सावरकर यांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यावरील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. व. वा. वाचनालयातर्फे ना. धो. महानोर यांचा सत्कार करण्यात आला. आचार्य अत्रे यांच्या लेखणीतून साकारलेली गीते ‘परिवर्तन’चे अक्षय गजभिये, वैशाली शिरसाळे, सुदीप्ता सरकार यांनी सादर केली. सूत्रसंचालन ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांनी केले. मंजूषा भिडे व हर्षल पाटील यांचे सहकार्य होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव