शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
Suraj Chavan :'सुरज चव्हाणांना अटक करा, गुंडगिरी खपवून घेणार नाही'; अंजली दमानियांचा हल्लाबोल
3
परस्पर समझोता करून तक्रार मागे, पोलीस हतबल; राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?
4
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
5
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
6
सिद्धार्थ-कियाराच्या लेकीचं घरी जंगी स्वागत, सोशल मीडियावर दिसली झलक
7
श्रावणाची सुरुवात गजलक्ष्मी योगात: ७ मूलांकांचे कल्याण, भरघोस लाभ; सुबत्ता-समृद्धी, शुभ काळ!
8
एपीएमसीच्या १७९ एकर जमिनीवर कोणाचा डोळा? नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट हलणार?
9
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
10
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
11
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
12
सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम
13
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
14
आमचा हात, तुमचा गाल... ही युती किती काळ? मुंबईतील मराठीच्या अस्तित्वाची लढाई
15
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
16
पालिकांच्या मदतीने प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न; मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू!
17
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
18
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
19
हायकोर्टाचे कोल्हापूर खंडपीठ स्थापन होणार ना? चर्चांना उधाण
20
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...

दोषींकडे अधिक काळ दुर्लक्ष होणे हीच मोठी चूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 20:18 IST

पाणी योजना कधी मार्गी लागणार

ठळक मुद्देआदेश देवूनही अहवाल आले नाही
हितेंद्र काळुंखेजळगाव: गैरप्रकारांमुळे गेल्या ७ ते ८ वर्षांपासून जिल्ह्यात ४८५ पाणी पुरवठा योजनांचे काम रखडले आहे. ठेकेदार किंवा पाणी पुरवठा योजना समितीचे पदाधिकारी यांनी आपले हात ओले करुन गावकºयांच्या घशाला कोरड आणण्याचे काम केले आहे. अनेक ठिकाणी योजना अपूर्ण अवस्थेत असल्याने ग्रामस्थांना पाणी टंचाईशी सामना करावा लागत आहे. यासंदर्भात वारंवार सूचना देवूनही संबंधितांना काहीच फरक पडत नसल्याने प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. गुन्हा जरी दाखल केला तरी न्यायालयीन प्रक्रियेत बराच वेळ जाणार यामुळे संबंधित गावांचा पाण्याचा प्रश्न जैसे थे च राहणार, याबाबीचा विचार करत शक्यतो तंबी देवून काम झाले तर ठिकच आहे,अशी भूमिका अधिकाºयांची दिसून येते. मात्र सुमारे ८ वर्ष होवूनही जर संबंधित दखल घेत नसतील तर जास्त काळ संधी न देता तातडीने गुन्हे दाखल करण्याची गरज आहे. रखडलेल्या पाणी योजनांचा कारवाईचा विषय सुद्धा क रखडत असल्याने दोषींना अजिबात धाक राहिलेला नाही. यामुळेच नवीन नवीन गैरप्रकाराची प्रकरणे वाढतच असून रखडलेल्या पाणी योजनांच्या संख्येतही भरच पडत आहे. या प्रश्नाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या त्यांच्या जळगाव दौºयात घेतल्यानंतर जिल्हा परिषदेकडूृन संबंधित उपअभियंत्यांकडून या योजनेंच्या कामांबाबत तातडीने अहवाल मागविला आहे. यानंतर जे दोषी आढळतील त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार आहे. असे असले तरी सुमारे २० दिवस उलटले तरी अहवाल आलेले नाही. त्यामुळे कारवाई केव्हा होणार व प्रश्न केव्हा मार्गी लागणार हा प्रश्न आहे. पाणी पुरवठा योजना रखडण्या मागे अनेक ठिकाणी अपहाराचेच कारण अहे. अशा स्थितीत कारवाई होणे आवश्यक असल्याने पाणी योजना मुदतीत पूर्ण नकरणाºया समित्यांना व संबंधित अधिकाºयांना नोटीस देवून गुन्ह दाखल करण्याचा निर्णय जवळपास वर्षभरापूर्वी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनीही घेतला होता. मात्र एकदा संधी देण्याचा निर्णय झाला मात्र त्यानंतर काहीही कार्यवाही झाली नाही. अर्थात ी केवळ इशारा न देता इशाºया प्रमाणे कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.
टॅग्स :zpजिल्हा परिषदJalgaonजळगाव