शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

दोषींकडे अधिक काळ दुर्लक्ष होणे हीच मोठी चूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 20:18 IST

पाणी योजना कधी मार्गी लागणार

ठळक मुद्देआदेश देवूनही अहवाल आले नाही
हितेंद्र काळुंखेजळगाव: गैरप्रकारांमुळे गेल्या ७ ते ८ वर्षांपासून जिल्ह्यात ४८५ पाणी पुरवठा योजनांचे काम रखडले आहे. ठेकेदार किंवा पाणी पुरवठा योजना समितीचे पदाधिकारी यांनी आपले हात ओले करुन गावकºयांच्या घशाला कोरड आणण्याचे काम केले आहे. अनेक ठिकाणी योजना अपूर्ण अवस्थेत असल्याने ग्रामस्थांना पाणी टंचाईशी सामना करावा लागत आहे. यासंदर्भात वारंवार सूचना देवूनही संबंधितांना काहीच फरक पडत नसल्याने प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. गुन्हा जरी दाखल केला तरी न्यायालयीन प्रक्रियेत बराच वेळ जाणार यामुळे संबंधित गावांचा पाण्याचा प्रश्न जैसे थे च राहणार, याबाबीचा विचार करत शक्यतो तंबी देवून काम झाले तर ठिकच आहे,अशी भूमिका अधिकाºयांची दिसून येते. मात्र सुमारे ८ वर्ष होवूनही जर संबंधित दखल घेत नसतील तर जास्त काळ संधी न देता तातडीने गुन्हे दाखल करण्याची गरज आहे. रखडलेल्या पाणी योजनांचा कारवाईचा विषय सुद्धा क रखडत असल्याने दोषींना अजिबात धाक राहिलेला नाही. यामुळेच नवीन नवीन गैरप्रकाराची प्रकरणे वाढतच असून रखडलेल्या पाणी योजनांच्या संख्येतही भरच पडत आहे. या प्रश्नाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या त्यांच्या जळगाव दौºयात घेतल्यानंतर जिल्हा परिषदेकडूृन संबंधित उपअभियंत्यांकडून या योजनेंच्या कामांबाबत तातडीने अहवाल मागविला आहे. यानंतर जे दोषी आढळतील त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार आहे. असे असले तरी सुमारे २० दिवस उलटले तरी अहवाल आलेले नाही. त्यामुळे कारवाई केव्हा होणार व प्रश्न केव्हा मार्गी लागणार हा प्रश्न आहे. पाणी पुरवठा योजना रखडण्या मागे अनेक ठिकाणी अपहाराचेच कारण अहे. अशा स्थितीत कारवाई होणे आवश्यक असल्याने पाणी योजना मुदतीत पूर्ण नकरणाºया समित्यांना व संबंधित अधिकाºयांना नोटीस देवून गुन्ह दाखल करण्याचा निर्णय जवळपास वर्षभरापूर्वी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनीही घेतला होता. मात्र एकदा संधी देण्याचा निर्णय झाला मात्र त्यानंतर काहीही कार्यवाही झाली नाही. अर्थात ी केवळ इशारा न देता इशाºया प्रमाणे कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.
टॅग्स :zpजिल्हा परिषदJalgaonजळगाव