शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

महिलेच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी सरकारची नाही का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 03:00 IST

जळगाव महिला मृत्युप्रकरण : उच्च न्यायालयाचा सरकारला सवाल

मुंबई : जूनमध्ये जळगावच्या सिव्हिल रुग्णालयातून ८२ वर्षांची कोरोनाग्रस्त महिला गायब झाली आणि आठव्या दिवशी रुग्णालयाच्या शौचालयातच तिचा मृतदेह आढळला. सरकारने कदाचित कारणे-दाखवा नोटीस बजावली असेल, पण याने कुटुंबीयांचे सांत्वन होईल का? कुटुंबाला नुकसानभरपाई देण्याची राज्य सरकारची जबाबदारी नाही का? असा सवाल करत उच्च न्यायालयाने सरकारला या घटनेसंदर्भात उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले. 

महिलेचा शवविच्छेदन अहवाल सादर करण्याचे निर्देशही मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने दिले.कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृतदेहांची विल्हेवाट राज्य व केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. याआधीच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने शेलार यांना त्यांनी सरकारवर केलेल्या निष्काळजीच्या आरोपाचे समर्थन करणाऱ्या राज्यव्यापी घटनांची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, शेलार यांनी उच्च न्यायालयात यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर केले.या प्रतिज्ञापत्रात शेलार यांनी जळगावच्या घटनेचा उल्लेख केला. ही घटना धक्कादायक आहे. महिलेचा मृतदेह सापडण्यापूर्वी ती रुग्णालयातून आठ दिवस गायब होती. आठव्या दिवशी तिचा मृतदेह  रुग्णालयाच्या शौचालयात आढळतो. हे चिंताजनक नाही का? असा सवाल न्यायालयाने केला. महिलेचे शवविच्छेदन केले का? तिचा मृत्यू २ जूनला झाला नाही, पण मृतदेह सापडला त्या दिवशी म्हणजे १० जूनला झाला तर ती आठ दिवस अन्नाशिवाय जगली. हे अमानवी आहे, महिलेच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी सरकारची नाही का? असा सवाल न्यायालयाने केला. यावर राज्य सरकारला उत्तर दाखल करण्याचे निर्देश देत ५ आॅक्टोबर रोजी सुनावणी ठेवली.

टॅग्स :Jalgaonजळगावhospitalहॉस्पिटलHigh Courtउच्च न्यायालय