शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
4
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
5
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
6
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
7
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
8
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
9
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
10
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
11
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
12
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
13
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
14
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
15
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
16
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
17
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
19
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
20
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 

जळगाव जिल्ह्यातील मोठ्या गुन्ह्यांचा तपासच लागेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 12:22 IST

:जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेले भादली हत्याकांड, दीड वर्षापूर्वी ५५ लाखाची बॅग लंपास व आताची २० लाखाची बॅग लांबविण्याची घटना असो की जिल्ह्यातील एटीएम फोडण्याच्या घटना, त्यांचा तपास अद्यापही लागलेला नाही. अनेक लहान मोठ्या चोºया, जबरी चोºया व घरफोडीची गुन्हे उघडकीस येत असताना या मोठ्या गुन्ह्यांचा तपास का लागत नाही. यंत्रणा नेमकी कुठे कमी पडते. मोठे गुन्हे उघडकीस आणणे हे यंत्रणेसमोर एक आव्हान असते. 

ठळक मुद्देक्राईम वार्तापत्र यंत्रणा ठरतेय कुचकामीतंत्रज्ञानावर आधारीत तपासावर भर

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२६ :जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेले भादली हत्याकांड, दीड वर्षापूर्वी ५५ लाखाची बॅग लंपास व आताची २० लाखाची बॅग लांबविण्याची घटना असो की जिल्ह्यातील एटीएम फोडण्याच्या घटना, त्यांचा तपास अद्यापही लागलेला नाही. अनेक लहान मोठ्या चोºया, जबरी चोºया व घरफोडीची गुन्हे उघडकीस येत असताना या मोठ्या गुन्ह्यांचा तपास का लागत नाही. यंत्रणा नेमकी कुठे कमी पडते. मोठे गुन्हे उघडकीस आणणे हे यंत्रणेसमोर एक आव्हान असते. दीड वर्षापूर्वी जामनेर येथील एका व्यापाºयाने काव्यरत्नावली चौकातून ५५ लाख रुपये काढले होते. ही रक्कम कारमध्ये घेऊन जात असताना टायर पंक्चर झाल्याचे सांगून चोरट्यांनी चालकाचे लक्ष विचलित केले होते. त्यानंतर अजिंठा चौक परिसरात गॅरेजवर कार थांबली असता तेथून काच फोडून ही बॅग लांबविण्यात आली होती. या गुन्ह्याच्या तपासासाठी एमआयडीसी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक परराज्यात जाऊन आले, मात्र चोरटे हाती लागले नाही. काही दिवसापूर्वीच धनाजी नाना चौधरी आदिवासी मंडळ संचलित सत्रासेन आश्रमशाळेच्या (ता.चोपडा) कामाचे २० लाख रुपये संस्थेचे संचालक रवींद्र रायसिंग भादले यांनी स्टेट बँकेतून काढले. रस्त्यात नोटा टाकून चालकाचे तर बॅँकेत साहेबांनी बोलावल्याचे सांगून मालकाचे लक्ष विचलित करुन ही रक्कम लांबविण्यात आली. या घटनेतील चोरटे देखील परप्रांतीय असल्याचे निष्पन्न झाले. या दोन्ही घटनेतील चोरटे सीसीटीव्ही कॅमेºयात स्पष्टपणे दिसत असतानाही ते पोलिसांच्या हाती लागू शकत नाही, ही खेदाची बाब आहे.    नाही. दोन महिन्यापूर्वी जिल्ह्यात एटीएम फोडणारी टोळी सक्रीय झाली होती. या टोळीने जिल्ह्यातील अनेक एटीएमधून लाखो रुपये लांबविले. या सर्व घटनांची पोलीस ठाण्यांमध्ये नोंद झाली, तपासाचा भाग म्हणून ती प्रक्रियाही झाली, मात्र आजतायगत कोणत्याच गुन्ह्यातील आरोपी मिळून आलेला नाही. काही वर्षापूर्वी नूतन मराठा महाविद्यालयसमोर एटीएम फोडून ९२ लाखाची रोकड लांबविण्यात आली होती. या घटनेचाही तपास लागलेला नाही. जेव्हा मोठी घटना घडते, तेव्हा मागील घटनांच्या आठवणी आपोआप ताज्या होतात. पूर्वीच्या काळी तंत्रज्ञान नव्हते, खबºया व पोलिसांचे संपर्काचे जाळे यावरच गुन्ह्यांचा तपास लागत होता. आता मोबाईल सीडीआर असो की सीसीटीव्ही कॅमेरे यासारखे तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यावरही  तपास लागत नाही. या तंत्रज्ञानामुळे मनापासून काम करण्याची मानसिकता कोणाचीच राहिलेली नाही. तंत्रज्ञानाच्या आधारावर जी माहिती मिळेल त्यावरच तपास अवलंबून राहू लागला आहे. त्यामुळे तंत्रज्ञान देशासाठी फायद्याचे ठरु लागले आहे, तितकेच काही प्रकरणात घातकही ठरु लागल्याचे वास्तव आहे. तपासी यंत्रणांनी अंतर्मुख होऊन प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावले तर नक्कीच त्यात त्यांना यश येईल. हे अनेक प्रकरणातून सिध्दही झालेले आहे.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा