शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Inflation : "देशी क्वार्टर 150 ते 200 रुपये झालीय तरी पितात, कुठं आलीय महागाई"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 21:55 IST

सदाभाऊ खोत यांनी जागर शेतकऱ्यांचा आणि आक्रोश महाराष्ट्राचा नावाने यात्रा सुरू केली आहे

जळगाव - महागाईने जनता अक्षरश: हैराण झाली आहे. केंद्र सरकारने इंधन दरवाढ, खाद्य तेल, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी दरवाढ केली आहे. जीवनावश्यक गॅस सिलिंडरचे दर १०१९ रुपयावर गेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. या महागाईच्या निषेर्धात राज्यात, देशात अनेक ठिकाणी निदर्षणे करण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे राज्यात भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या रयत संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी महागाईसंदर्भात आश्चर्यकारक विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे सोशल मीडियात त्यांना ट्रोल करण्यात येत आहे. 

सदाभाऊ खोत यांनी जागर शेतकऱ्यांचा आणि आक्रोश महाराष्ट्राचा नावाने यात्रा सुरू केली आहे. नाशिकनंतर आता त्यांचं हे अभियान चाळीसगांवला पोहोचलं आहे. शेतकऱ्यांच्या समस्या, अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सदाभाऊंचा राज्यव्यापी दौरा सुरू असून ते आज जळगावात पोहोचली. कोकणापासून निघालेली 'जागर शेतकऱ्याचा आक्रोश महाराष्ट्राचा हा संवाद' आज जळगाव जिल्ह्यात आला. सदाभाऊ खोत यांनी चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आघाडी सरकारचे धोरणांसह पवार कुटुंबीयांवार जोरदार टीका केली.

पत्रकारांनी सदाभाऊंना पेट्रोल-डिझेल यासह जीवानावश्यक वस्तू महागाईवरून प्रश्न विचारला असता त्यांनी महागाईचे समर्थन केले. तसेच, कशाची महागाई आली हो, 20 हजाराचे सोनं 50 हजार तोळा झालं तरी लोक घेतात ना? तेव्हा महागाई दिसत नाही, देशी क्वार्टर आता 150 ते 200 रुपयांना मिळायला लागली आहे. मग, महागाई नाही वाढली का? महागाई झाली तरी लोकं दारू पिणं सोडता का? कांदा डाळींच्या किंमती वाढल्यास शेतकरी सुखी होईल. या महागाईचा शेतकऱ्यांना फायदा होईल, असा दावाच सदाभाऊंनी केला. 150 रुपयांची क्वार्टर तुम्ही पिऊ शकता मग आमच्या गायीचं दूध 100 रुपयांने का पिऊ शकत नाही. दारू 80 टक्के लोक पितात, पैशावाले सगळे दारू पितात, असेही खोत यांनी म्हटले. तर, महागाईच्या समर्थनार्थ बोलायचं धाडस कोण करेल का, पण मी महागाईबद्दल बिनधास्त बोलतो, असेही त्यांनी म्हटलं. 

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत FarmerशेतकरीInflationमहागाईPetrolपेट्रोलmilkदूध