शहरं
Join us  
Trending Stories
1
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
2
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
3
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
4
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
5
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
6
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
7
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
9
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
10
पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
11
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
12
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
13
वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
14
अरुणाचल प्रदेश हा भारताचा भूभाग नाही, हा आमचा झांगनान; चीनची दर्पोक्ती, भारतावर निशाणा
15
२६/११ अतिरेकी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण; सीएसएमटी स्टेशनवर एकही बॉडी स्कॅनर नाही, सुरक्षा धोक्यात
16
कुजबुज! एकनाथ शिंदेंसमोरच 'उद्धवसाहेब आगे बढो' जयघोष; प्रचारसभेत कार्यकर्तेही पडले गोंधळात
17
१८८९ ते १९४९ - राज्यघटनेच्या जन्माची ६० वर्षे! 'असा' भारतीय घटनेच्या निर्मितीचा इतिहास
18
‘काँग्रेस’चे शशी थरूर भाजपमध्ये (कधी) जातील?; केरळच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतील
19
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
20
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
Daily Top 2Weekly Top 5

वाढते अपघात चिंताजनक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 13:03 IST

सुनील पाटीलअपघात कमी होण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना, जनजागृती होत असली तरी अपघातांची संख्या कमी व्हायला तयार नाही. सरकारी आकडेवारीनुसार दर वर्षी पाच लाख अपघात होतात व त्यात दीड ते दोन लाख लोकांचाजीव जातो. त्यात चिंताजनक बाब अशी आहे की, १८ ते ४५ या वयोगटातील तरुण ठार होण्याचे प्रमाण ६९ टक्के ...

सुनील पाटीलअपघात कमी होण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना, जनजागृती होत असली तरी अपघातांची संख्या कमी व्हायला तयार नाही. सरकारी आकडेवारीनुसार दर वर्षी पाच लाख अपघात होतात व त्यात दीड ते दोन लाख लोकांचाजीव जातो. त्यात चिंताजनक बाब अशी आहे की, १८ ते ४५ या वयोगटातील तरुण ठार होण्याचे प्रमाण ६९ टक्के आहे. एकट्या महाराष्टÑाची आकडेवारी ८ टक्के आहे. सर्वाधिक अपघात अति वेग व त्यानंतर मद्य प्राशन केल्याने झालेले आहेत.अपघातात जीव जाणारे तरुण व पुरुष हे घरातील प्रमुख तसेच कर्तेच आहेत. त्यामुळे संपूर्ण कुटुंबच उघड्यावर पडते. दरवर्षी राज्य शासनातर्फे रस्ता सुरक्षा अभियान राबविले जाते. या अभियानावर लाखो रुपये खर्च होतात. अपघात कमी होऊन लोकांचे जीव वाचावे हाच त्यामागचा उद्देश आहे. एका सर्वेक्षणात चालकाच्या चुकीमुळेच जास्त अपघात झालेले आहेत. शासन उपाययोजना करेल, त्यावर लाखो, कोट्यवधीचा खर्च होईल. शासकीय सोपस्कार पार पडले या सर्व बाबी होतील, मात्र नागरिक व वाहनधारक म्हणून प्रत्येकाचीही काही जबाबदारी आहेत. आपल्या चुकीमुळे स्वत:चा किंवा दुसऱ्या जीव जाईल किंवा कायमचे अपंगत्व येवू शकतो,याचे भान ठेवणे गरजेचे आहे. कोणी सांगेल तेव्हाच ऐकण्यापेक्षा स्वत:ला शिस्त लावली तरी अपघाताचे प्रमाण कमी होईल व त्यातून अनेकांचे जीव वाचतील. जळगाव जिल्ह्यात पाच वर्षात ४ हजाराच्यावर अपघात झाले आहेत. त्यात अडीच हजार जणांचा मृत्यू झाला आहे तर सहा हजाराच्यावर तरुण व महिला जखमी झाल्या आहेत.गेल्या वर्षीच साडे चारशे जणांचा मृत्यू झाल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. ही शासकीय आकडेवारी आहे. प्रत्यक्षात असे अनेक अपघात आहेत की त्याची पोलीस दप्तरी नोंद नाही. मंगळवारचाच दिवस घेतला तर जिल्ह्यात पाच मोठे अपघात झाले. त्यात तीन जण ठार तर २० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. या सर्व अपघातात चालकाच्याच चुका असल्याचे निदर्शनास आले. त्यात निष्पाप लोकांचा जीव गेला आहे. त्यामुळे प्रत्येक वाहन चालकाने स्वत: लाच शिस्त लावली तर अनेक संकटे टळतील. त्याशिवाय वाहतूक पोलीस दंड करतील व तेव्हाच आपण शिस्त लावू ही मानसिकता घातक आहे. पोलिसांना पैसे देऊन शिस्त लावण्याची आवश्यकता का वाटते? मानव जन्म व मृत्यू इतका सोपा आहे का? याचाही विचार व्हायला हवा.

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव