शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

वाढते अपघात चिंताजनक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 13:03 IST

सुनील पाटीलअपघात कमी होण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना, जनजागृती होत असली तरी अपघातांची संख्या कमी व्हायला तयार नाही. सरकारी आकडेवारीनुसार दर वर्षी पाच लाख अपघात होतात व त्यात दीड ते दोन लाख लोकांचाजीव जातो. त्यात चिंताजनक बाब अशी आहे की, १८ ते ४५ या वयोगटातील तरुण ठार होण्याचे प्रमाण ६९ टक्के ...

सुनील पाटीलअपघात कमी होण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना, जनजागृती होत असली तरी अपघातांची संख्या कमी व्हायला तयार नाही. सरकारी आकडेवारीनुसार दर वर्षी पाच लाख अपघात होतात व त्यात दीड ते दोन लाख लोकांचाजीव जातो. त्यात चिंताजनक बाब अशी आहे की, १८ ते ४५ या वयोगटातील तरुण ठार होण्याचे प्रमाण ६९ टक्के आहे. एकट्या महाराष्टÑाची आकडेवारी ८ टक्के आहे. सर्वाधिक अपघात अति वेग व त्यानंतर मद्य प्राशन केल्याने झालेले आहेत.अपघातात जीव जाणारे तरुण व पुरुष हे घरातील प्रमुख तसेच कर्तेच आहेत. त्यामुळे संपूर्ण कुटुंबच उघड्यावर पडते. दरवर्षी राज्य शासनातर्फे रस्ता सुरक्षा अभियान राबविले जाते. या अभियानावर लाखो रुपये खर्च होतात. अपघात कमी होऊन लोकांचे जीव वाचावे हाच त्यामागचा उद्देश आहे. एका सर्वेक्षणात चालकाच्या चुकीमुळेच जास्त अपघात झालेले आहेत. शासन उपाययोजना करेल, त्यावर लाखो, कोट्यवधीचा खर्च होईल. शासकीय सोपस्कार पार पडले या सर्व बाबी होतील, मात्र नागरिक व वाहनधारक म्हणून प्रत्येकाचीही काही जबाबदारी आहेत. आपल्या चुकीमुळे स्वत:चा किंवा दुसऱ्या जीव जाईल किंवा कायमचे अपंगत्व येवू शकतो,याचे भान ठेवणे गरजेचे आहे. कोणी सांगेल तेव्हाच ऐकण्यापेक्षा स्वत:ला शिस्त लावली तरी अपघाताचे प्रमाण कमी होईल व त्यातून अनेकांचे जीव वाचतील. जळगाव जिल्ह्यात पाच वर्षात ४ हजाराच्यावर अपघात झाले आहेत. त्यात अडीच हजार जणांचा मृत्यू झाला आहे तर सहा हजाराच्यावर तरुण व महिला जखमी झाल्या आहेत.गेल्या वर्षीच साडे चारशे जणांचा मृत्यू झाल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. ही शासकीय आकडेवारी आहे. प्रत्यक्षात असे अनेक अपघात आहेत की त्याची पोलीस दप्तरी नोंद नाही. मंगळवारचाच दिवस घेतला तर जिल्ह्यात पाच मोठे अपघात झाले. त्यात तीन जण ठार तर २० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. या सर्व अपघातात चालकाच्याच चुका असल्याचे निदर्शनास आले. त्यात निष्पाप लोकांचा जीव गेला आहे. त्यामुळे प्रत्येक वाहन चालकाने स्वत: लाच शिस्त लावली तर अनेक संकटे टळतील. त्याशिवाय वाहतूक पोलीस दंड करतील व तेव्हाच आपण शिस्त लावू ही मानसिकता घातक आहे. पोलिसांना पैसे देऊन शिस्त लावण्याची आवश्यकता का वाटते? मानव जन्म व मृत्यू इतका सोपा आहे का? याचाही विचार व्हायला हवा.

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव