शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
4
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
5
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
6
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
7
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
8
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
9
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
10
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
11
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
12
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
13
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
14
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
15
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
16
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
17
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
18
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
19
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
20
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला

वाढते अपघात चिंताजनक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 13:03 IST

सुनील पाटीलअपघात कमी होण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना, जनजागृती होत असली तरी अपघातांची संख्या कमी व्हायला तयार नाही. सरकारी आकडेवारीनुसार दर वर्षी पाच लाख अपघात होतात व त्यात दीड ते दोन लाख लोकांचाजीव जातो. त्यात चिंताजनक बाब अशी आहे की, १८ ते ४५ या वयोगटातील तरुण ठार होण्याचे प्रमाण ६९ टक्के ...

सुनील पाटीलअपघात कमी होण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना, जनजागृती होत असली तरी अपघातांची संख्या कमी व्हायला तयार नाही. सरकारी आकडेवारीनुसार दर वर्षी पाच लाख अपघात होतात व त्यात दीड ते दोन लाख लोकांचाजीव जातो. त्यात चिंताजनक बाब अशी आहे की, १८ ते ४५ या वयोगटातील तरुण ठार होण्याचे प्रमाण ६९ टक्के आहे. एकट्या महाराष्टÑाची आकडेवारी ८ टक्के आहे. सर्वाधिक अपघात अति वेग व त्यानंतर मद्य प्राशन केल्याने झालेले आहेत.अपघातात जीव जाणारे तरुण व पुरुष हे घरातील प्रमुख तसेच कर्तेच आहेत. त्यामुळे संपूर्ण कुटुंबच उघड्यावर पडते. दरवर्षी राज्य शासनातर्फे रस्ता सुरक्षा अभियान राबविले जाते. या अभियानावर लाखो रुपये खर्च होतात. अपघात कमी होऊन लोकांचे जीव वाचावे हाच त्यामागचा उद्देश आहे. एका सर्वेक्षणात चालकाच्या चुकीमुळेच जास्त अपघात झालेले आहेत. शासन उपाययोजना करेल, त्यावर लाखो, कोट्यवधीचा खर्च होईल. शासकीय सोपस्कार पार पडले या सर्व बाबी होतील, मात्र नागरिक व वाहनधारक म्हणून प्रत्येकाचीही काही जबाबदारी आहेत. आपल्या चुकीमुळे स्वत:चा किंवा दुसऱ्या जीव जाईल किंवा कायमचे अपंगत्व येवू शकतो,याचे भान ठेवणे गरजेचे आहे. कोणी सांगेल तेव्हाच ऐकण्यापेक्षा स्वत:ला शिस्त लावली तरी अपघाताचे प्रमाण कमी होईल व त्यातून अनेकांचे जीव वाचतील. जळगाव जिल्ह्यात पाच वर्षात ४ हजाराच्यावर अपघात झाले आहेत. त्यात अडीच हजार जणांचा मृत्यू झाला आहे तर सहा हजाराच्यावर तरुण व महिला जखमी झाल्या आहेत.गेल्या वर्षीच साडे चारशे जणांचा मृत्यू झाल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. ही शासकीय आकडेवारी आहे. प्रत्यक्षात असे अनेक अपघात आहेत की त्याची पोलीस दप्तरी नोंद नाही. मंगळवारचाच दिवस घेतला तर जिल्ह्यात पाच मोठे अपघात झाले. त्यात तीन जण ठार तर २० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. या सर्व अपघातात चालकाच्याच चुका असल्याचे निदर्शनास आले. त्यात निष्पाप लोकांचा जीव गेला आहे. त्यामुळे प्रत्येक वाहन चालकाने स्वत: लाच शिस्त लावली तर अनेक संकटे टळतील. त्याशिवाय वाहतूक पोलीस दंड करतील व तेव्हाच आपण शिस्त लावू ही मानसिकता घातक आहे. पोलिसांना पैसे देऊन शिस्त लावण्याची आवश्यकता का वाटते? मानव जन्म व मृत्यू इतका सोपा आहे का? याचाही विचार व्हायला हवा.

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव