शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
4
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
5
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
6
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
7
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
8
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
9
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
10
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
11
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
12
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
13
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
14
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
15
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
16
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
17
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
18
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
19
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
20
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली

प्लॅस्टिकबंदीपेक्षा जनजागृती करून पुनर्वापर वाढवा, जळगावात प्लॅस्टिक असोसिएशनची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 12:02 IST

बंदी अन्यायकारक असल्याचा सूर

ठळक मुद्दे३० रोजी मुख्यमंत्र्यांना देणार निवेदनप्लॅस्टिकविषयी चुकीची माहिती

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २८ - राज्य सरकारने प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेऊन त्याची तत्काळ अंमलबजावणी करणे हा उद्योगासह व्यापाऱ्यांसाठी अन्यायकारक निर्णय असून याचा सरकारने सामंजस्याने विचार करावा, प्लॅस्टिक हे पूर्णपणे पुननिर्मित होणारे असून सरकारने त्यावर बंदीपेक्षा त्याचा पुनर्वापर वाढवावा आणि या विषयी जनजागृती करावी, अशी मागणी पत्रकार परिषदेदरम्यान जळगाव जिल्हा प्लॅस्टिक असोसिएशनच्यावतीने किरण राणे यांनी केली. दरम्यान, ३० रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगावात येत असल्याने त्यांना या संदर्भात निवेदन देण्यात येणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आले.राज्य सरकारने प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतल्याने याचा जळगावात मोठा परिणाम होणार आहे. या संदर्भात मंगळवारी दुपारी रोटरी भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी किरण राणे यांच्यासह नितीन रेदासनी, अमित भुतडा, सुभाष तोतला, रमेश माधवानी उपस्थित होते.प्लॅस्टिकविषयी चुकीची माहितीप्लॅस्टिक नष्ट होत नाही, यामुळे पर्यावरणास धोका निर्णाण झाल्याचा चुकीचा प्रचार केला जात असल्याचे या वेळी सांगण्यात आले. उलट प्लॅस्टिक पूर्णपणे पुर्ननिर्मित होते, असे सांगून याचा रस्ते करण्यासाठीही मोठ्या प्रमाणात वापर होऊन लागल्याने खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्लॅस्टिकचा ‘गोल्डन मटेरिअल’ म्हणून गौरव केला आहे, तरीदेखील राज्य सरकार यावर बंदी आणत असल्याच्या धोरणावर या वेळी टीका करण्यात आली.उद्योजक, व्यापारी देशोधडीला लागतीलप्लॅस्टिक उद्योग, व्यापार सुरू करताना त्यांनी सरकारचीच परवानगी घेतली व अब्जावधी रुपये गुंतवून उद्योग उभे केले. सरकार एका दिवसात निर्णय घेऊन ते बंद करण्याचे म्हणत असल्याने उद्योजक, व्यापारी देशोधडीला लागतील, अशी भीती या वेळी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे सरकारने याचा सामंजस्याने विचार करावा, अशी मागणी राणे यांनी केली....तर एकही झाड शिल्लक राहणार नाहीदैनंदिन जीवनातील वापराच्या चहा वस्तूंसाठी ९० टक्के प्लॅस्टिकचा वापर होतो. प्लॅस्टिकला पेपर बॅगचा पर्याय शिल्लक राहतो, मात्र दररोज एवढ्या मोठ्या प्रमाणात पेपर बॅगचा वापर वाढला तर भारतात एकही झाड शिल्लक राहणार आहे, असे या वेळी सांगण्यात आले. या सोबतच पेपर बॅग तयार करण्यासाठी पाण्याचाही मोठा वापर होईल, त्यामुळे भविष्यात पाणी टंचाईची शक्यता नाकारता येत नाही, असाही मुद्दा या वेळी मांडण्यात आला.अपले अपयश लपविण्यासाठी तुघलकी निर्णयप्लॅस्टिकमुळे पर्यावरणाचा -हास होत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. मात्र राज्यात सर्वत्र आढळणारा प्लॅस्टिक कचरा यास शासनाचे घनकचरा व्यवस्थापनातील अपयश कारण असून आपले अपयश लपविण्यासाठी सरकारने असा तुघलकी निर्णय घेतलाआहे.गुजरातमध्ये जावून उद्योग उभारावा का?जळगाव शहरात उद्योग उभारणीस पूरक वातावरण नाही, त्यात जे उद्योक आहे ते आता बंद होऊन बेरोजगारीही वाढेल व उद्योजक, व्यापाºयांना करोडोंचा फटका सहन करावा लागेल. अशा परिस्थितीत गुजरातमध्ये जाऊन उद्योग उभारावा का? असा संतप्त सवाल सुभाष तोतला यांनी उपस्थित केला.जळगाव हे प्लॅस्टिक पुनर्वापराचे उत्तम उदाहरणप्लॅस्टिक हे वाईट नाही ते वाईट बनविले गेले. त्याचा पुनर्वापर शक्य आहे. जळगावातच प्लॅस्टिकचा पुनर्वापर करून चटई तयार करणारे २५० उद्योग असल्याचे किरण राणे यांनी सांगून पुनर्वापराचे हे उत्तम उदाहरण असल्याचेही त्यांनी लक्षात आणून दिले.मुख्यमंत्र्यांना देणार निवेदनप्लॅस्टिक बंदीचा निर्णय अन्यायकारण असून याबाबत सहानुभूतीपूर्वीक विचार करावा, अशा मागणीचे निवेदन ३० रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवील हे जळगावात येत असल्याने त्यांना देण्यात येणार असल्याचे राणे यांनी सांगितले.

टॅग्स :JalgaonजळगावPlastic banप्लॅस्टिक बंदी