शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

चांदीच्या भावात दीड हजारांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात घसरण होत असताना चांदीच्या भावात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात घसरण होत असताना चांदीच्या भावात मात्र वाढ होत आहे. याही अर्थसंकल्पात सुवर्ण व्यावसायिकांच्या पदरी निराशा पडते की काय, या शक्यतेमुळे भाववाढ होत असल्याचे सांगितले जात आहे. या भाववाढीत शनिवारी चांदीच्या भावात एक हजार ५०० रुपयांनी वाढ होऊन ती ७१ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली.

गेल्या १० दिवसांपासून सोने - चांदीच्या भावात फारसा चढ-उतार नव्हता. सोने २०० ते ३०० रुपये, तर चांदीचे भाव साधारण ५०० रुपयांपर्यंत कमी-अधिक होत होते. मात्र, केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याचा दिवस जसजसा जवळ येत आहे तसतसा चांदीचा भाव वाढत आहे. गेल्या अर्थसंकल्पात सुवर्ण व्यवसायासाठी कोणतीच घोषणा नव्हती. याही अर्थसंकल्पात या व्यवसायासाठी काही घोषणा न झाल्यास सोने-चांदीच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आयात शुल्काचा प्रश्न कायम असल्याने हे शुल्क यंदा कमी होण्याची अपेक्षा आहे. मात्र, तसे न झाल्यास हा बोजा कायम राहणार आहे. तसेच या अर्थसंकल्पात उद्योग क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा झाल्यास शेअर बाजारात कंपन्यांचे शेअर वधारून शेअर बाजाराला उसळी मिळू शकते व सोने-चांदीचे भाव कमी होण्याची शक्यता आहे, असे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे. मात्र, यासाठी सुवर्ण व्यवसायासाठी घोषणा होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मात्र, हा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच तीन दिवसांपासून चांदीच्या भावात वाढ होत आहे. यामध्ये २७ जानेवारी रोजी ६७ हजार रुपये प्रतिकिलोवर असलेल्या चांदीच्या भावात २८ रोजी एक हजार रुपयांनी वाढ होऊन ती ६८ हजारांवर पोहोचली. त्यानंतर २९ रोजी पुन्हा एक हजार ५०० रुपयांनी वाढ झाली व चांदी ६९ हजार ५०० रुपयांवर पोहोचली. शनिवार, ३० जानेवारी रोजी पुन्हा एक हजार ५०० रुपयांनी वाढ होऊन चांदी ७० हजारांच्या पुढे जात ७१ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली.

सोन्याच्या भावात शनिवार, ३० रोजी ४०० रुपयांनी घसरण झाली. मात्र, तीन दिवसांपासून त्यातही वाढ होत असल्याचे चित्र होते. २८ रोजी ३०० रुपयांनी वाढ होऊन सोने ५० हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले. त्यानंतर २९ रोजी पुन्हा ३०० रुपयांनी वाढ होऊन ते ५० हजार ५०० रुपयांवर पोहोचले. दोन दिवसांच्या वाढीनंतर मात्र सोन्यात ३० रोजी ४०० रुपयांनी घसरण झाली व ते ५० हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर आले.

————————-

दोन दिवसांवर आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर ही भाववाढ होत आहे. गेल्या वर्षीप्रमाणे याही अर्थसंकल्पात सुवर्ण व्यवसायासाठी काही घोषणा न झाल्यास आणखी भाववाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, शेअर बाजार वधारल्यास सोने-चांदीचे भाव कमी होऊ शकतात.

- स्वरुप लुंकड, सचिव, जळगाव सराफ बाजार असोसिएशन