शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

घरात लग्नाची बोलणी अन् बाहेर दोन मुले बेपत्ता झाल्याची जामनेरात घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 18:06 IST

तीन तासांच्या शोधानंतर झाली बेपत्ता मुलांची व पालकांची भेट

ठळक मुद्देतीन तासांच्या शोधानंतर आढळली बेपत्ता मुलेगारखेडा येथे ही मुले रडत असताना नागरिकांनी चौकशी करीत पोलीस स्टेशनला आणले.दोन महिलांनी चॉकलेट देऊन सोबत नेल्याचा सहा वर्षीय मुलाने केला दावा

आॅनलाईन लोकमतजामनेर, दि.१७ : जळगाव तालुक्यातील रायपूर कंडारी येथील कुटुंबिय बुधवारी सकाळी दोन लहान मुलांसह जामनेर शहरातील घरकुल भागात लग्नाची बोलणी करण्यासाठी आले. घरात लग्नाची बोलणी सुरु असताना सोबत आलेले दोन लहान मुले बेपत्ता झाली. तीन तासांच्या शोधानंतर बेपत्ता मुले आढळून आल्याने मुलांची व पालकांची भेट झाली.शेख भिकन शेख मन्सूर (रा.रायपूर कंडारी, ता.जळगाव) हे बुधवारी सकाळी नातेवाईक व दोघा लहान मुलांसोबत जामनेर शहरातील मुस्लीम वसाहतीतील घरकूलात राहणाºया एका व्यक्तीकडे लग्नाच्या बोलणीसाठी आले होते. घरात बोलणी सुरु असताना सोबत आलेले दोन्ही मुले घराबाहेर खेळण्यासाठी गेली. बराच वेळ झाल्यानंतरही ते दोन्ही घरात न आल्याने कुटुंबियांनी स्थानिक रहिवाशांसोबत मदनी नगर, बिस्मिल्ला नगर, जुना बोदवड रोड भागात शोध सुरु केला.दोन्ही मुले गारखेडे येथील असल्याची माहिती काही वेळेनंतर मिळाली. याठिकाणी ही मुले एकटीच गावात फिरताना दिसल्याने त्यांना जामनेर पोलीस स्टेशनला आणले. बेपत्ता मुलांच्या कुटुंबियांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. दोघा मुलांना पाहून पालकांनी त्यांना मिठी मारली. दोघांनाही अश्रू अनावर झाले होते.गारखेडा येथील गुलाब शहा, अरुण मिस्तरी, मिठाराम मोरे, संजय कोतवाल, शेख हरूण यांनी या मुलांची विचारपूस करून त्यांना जामनेरला आणले. शेख यांनी या सर्वांचे आभार मानले.दरम्यान, या दोन्ही मुलांना दोन बुरखेधारी महिलांनी चॉकलेट देऊन नेण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सहा वर्षीय मुलाने ‘लोकमत’ प्रतिनिधीजवळ दिली. गारखेडे येथे सोडून दोन्ही महिला एका मोटारसायकलस्वारासोबत गेल्याचे त्याने सांगितले.

टॅग्स :JalgaonजळगावJamnerजामनेर