शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

जळगाव : पाणीपुरवठा मंत्र्यांच्या जिल्ह्यातच टंचाईच्या झळा, २६ गावात २९ टँकरने पाणीपुरवठा

By अमित महाबळ | Updated: June 13, 2023 11:31 IST

पाणीपुरवठा मंत्र्यांच्या जिल्ह्यातच पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, २६ गावांमध्ये २९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

जळगाव : पाणीपुरवठा मंत्र्यांच्या जिल्ह्यातच पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, २६ गावांमध्ये २९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा मतदार संघ असलेल्या धरणगाव शहरात तब्बल १० ते १२ दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. तर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर शहरात तीन दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे.

पावसाअभावी जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा जिल्हा असला, तरी टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी नाही. दि.१२ जून अखेर २६ गावांमध्ये २९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. ही संख्या वाढत आहे. सात दिवस आधी २५ गावात २८ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. त्यामध्ये प्रत्येकी एकने वाढ झाली आहे. प्रशासनाने गावांसाठी ६३ आणि टँकरसाठी १० विहिरींचे अधिग्रहण केले आहे. पाऊस लांबल्यास मोठी समस्या उभी राहू शकते. त्याला तोंड देण्यासाठी प्रशासनाने ऑगस्ट २०२३ पर्यंतचा संभाव्य विशेष कृती आराखडा तयार करून ठेवला आहे.

पाण्याअभावी त्या-त्या गावातील रहिवाशांचे हाल होत आहेत. मोठ्या शहरांमध्ये परिस्थिती वेगळी नाही. काही ठिकाणी प्रकल्पातील जलसाठा कमी आहे, तर कुठे पाणी असूनही नियोजनाअभावी अथवा सदोष पाणीपुरवठा योजनांमुळे नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा होत नाही. वाघूर धरणात पुरेसा जलसाठा असला तरी अमृत योजनेचे काम पूर्ण न झाल्यामुळे जळगाव महापालिका क्षेत्रात तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. भुसावळ शहरात ९ दिवसांआड, अमळनेर नपा क्षेत्रात चार दिवसाआड, ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर शहरात तीन दिवसाआड, धरणगाव नपा क्षेत्रात १० ते १२ दिवसाआड पाणी, चाळीसगाव न.पा मध्ये ५ दिवसांआड, तर एरंडोल न.पा क्षेत्रात ४ ते ५ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. अंजनी धरणात केवळ २० टक्के जलसाठा आहे.

टँकरने पाणीपुरवठा होत असलेली गावे

तालुका - गावांची संख्या - टँकर

जळगाव - १ - १जामनेर - ६ - ६भुसावळ - २- २बोदवड - १ - १पारोळा - २- २पाचोरा - ३ - ५चाळीसगाव - ९ - १०भडगाव - २- २

टँकर लावण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी यांना प्रदानअल निनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबणार असल्याचा अंदाज आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने जुलै व ऑगस्ट महिन्याचा टंचाई आराखडा तयार केला असून, त्यानुसार कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. टँकर लावण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहे.

टॅग्स :JalgaonजळगावGulabrao Patilगुलाबराव पाटील