शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

जळगाव : पाणीपुरवठा मंत्र्यांच्या जिल्ह्यातच टंचाईच्या झळा, २६ गावात २९ टँकरने पाणीपुरवठा

By अमित महाबळ | Updated: June 13, 2023 11:31 IST

पाणीपुरवठा मंत्र्यांच्या जिल्ह्यातच पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, २६ गावांमध्ये २९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

जळगाव : पाणीपुरवठा मंत्र्यांच्या जिल्ह्यातच पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, २६ गावांमध्ये २९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा मतदार संघ असलेल्या धरणगाव शहरात तब्बल १० ते १२ दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. तर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर शहरात तीन दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे.

पावसाअभावी जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा जिल्हा असला, तरी टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी नाही. दि.१२ जून अखेर २६ गावांमध्ये २९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. ही संख्या वाढत आहे. सात दिवस आधी २५ गावात २८ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. त्यामध्ये प्रत्येकी एकने वाढ झाली आहे. प्रशासनाने गावांसाठी ६३ आणि टँकरसाठी १० विहिरींचे अधिग्रहण केले आहे. पाऊस लांबल्यास मोठी समस्या उभी राहू शकते. त्याला तोंड देण्यासाठी प्रशासनाने ऑगस्ट २०२३ पर्यंतचा संभाव्य विशेष कृती आराखडा तयार करून ठेवला आहे.

पाण्याअभावी त्या-त्या गावातील रहिवाशांचे हाल होत आहेत. मोठ्या शहरांमध्ये परिस्थिती वेगळी नाही. काही ठिकाणी प्रकल्पातील जलसाठा कमी आहे, तर कुठे पाणी असूनही नियोजनाअभावी अथवा सदोष पाणीपुरवठा योजनांमुळे नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा होत नाही. वाघूर धरणात पुरेसा जलसाठा असला तरी अमृत योजनेचे काम पूर्ण न झाल्यामुळे जळगाव महापालिका क्षेत्रात तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. भुसावळ शहरात ९ दिवसांआड, अमळनेर नपा क्षेत्रात चार दिवसाआड, ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर शहरात तीन दिवसाआड, धरणगाव नपा क्षेत्रात १० ते १२ दिवसाआड पाणी, चाळीसगाव न.पा मध्ये ५ दिवसांआड, तर एरंडोल न.पा क्षेत्रात ४ ते ५ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. अंजनी धरणात केवळ २० टक्के जलसाठा आहे.

टँकरने पाणीपुरवठा होत असलेली गावे

तालुका - गावांची संख्या - टँकर

जळगाव - १ - १जामनेर - ६ - ६भुसावळ - २- २बोदवड - १ - १पारोळा - २- २पाचोरा - ३ - ५चाळीसगाव - ९ - १०भडगाव - २- २

टँकर लावण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी यांना प्रदानअल निनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबणार असल्याचा अंदाज आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने जुलै व ऑगस्ट महिन्याचा टंचाई आराखडा तयार केला असून, त्यानुसार कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. टँकर लावण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहे.

टॅग्स :JalgaonजळगावGulabrao Patilगुलाबराव पाटील