शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
3
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
4
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
5
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
6
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
7
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
8
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
9
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
10
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
11
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
12
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
14
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
15
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
16
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
17
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
18
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
19
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
20
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू

जळगाव : पाणीपुरवठा मंत्र्यांच्या जिल्ह्यातच टंचाईच्या झळा, २६ गावात २९ टँकरने पाणीपुरवठा

By अमित महाबळ | Updated: June 13, 2023 11:31 IST

पाणीपुरवठा मंत्र्यांच्या जिल्ह्यातच पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, २६ गावांमध्ये २९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

जळगाव : पाणीपुरवठा मंत्र्यांच्या जिल्ह्यातच पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, २६ गावांमध्ये २९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा मतदार संघ असलेल्या धरणगाव शहरात तब्बल १० ते १२ दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. तर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर शहरात तीन दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे.

पावसाअभावी जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा जिल्हा असला, तरी टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी नाही. दि.१२ जून अखेर २६ गावांमध्ये २९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. ही संख्या वाढत आहे. सात दिवस आधी २५ गावात २८ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. त्यामध्ये प्रत्येकी एकने वाढ झाली आहे. प्रशासनाने गावांसाठी ६३ आणि टँकरसाठी १० विहिरींचे अधिग्रहण केले आहे. पाऊस लांबल्यास मोठी समस्या उभी राहू शकते. त्याला तोंड देण्यासाठी प्रशासनाने ऑगस्ट २०२३ पर्यंतचा संभाव्य विशेष कृती आराखडा तयार करून ठेवला आहे.

पाण्याअभावी त्या-त्या गावातील रहिवाशांचे हाल होत आहेत. मोठ्या शहरांमध्ये परिस्थिती वेगळी नाही. काही ठिकाणी प्रकल्पातील जलसाठा कमी आहे, तर कुठे पाणी असूनही नियोजनाअभावी अथवा सदोष पाणीपुरवठा योजनांमुळे नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा होत नाही. वाघूर धरणात पुरेसा जलसाठा असला तरी अमृत योजनेचे काम पूर्ण न झाल्यामुळे जळगाव महापालिका क्षेत्रात तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. भुसावळ शहरात ९ दिवसांआड, अमळनेर नपा क्षेत्रात चार दिवसाआड, ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर शहरात तीन दिवसाआड, धरणगाव नपा क्षेत्रात १० ते १२ दिवसाआड पाणी, चाळीसगाव न.पा मध्ये ५ दिवसांआड, तर एरंडोल न.पा क्षेत्रात ४ ते ५ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. अंजनी धरणात केवळ २० टक्के जलसाठा आहे.

टँकरने पाणीपुरवठा होत असलेली गावे

तालुका - गावांची संख्या - टँकर

जळगाव - १ - १जामनेर - ६ - ६भुसावळ - २- २बोदवड - १ - १पारोळा - २- २पाचोरा - ३ - ५चाळीसगाव - ९ - १०भडगाव - २- २

टँकर लावण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी यांना प्रदानअल निनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबणार असल्याचा अंदाज आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने जुलै व ऑगस्ट महिन्याचा टंचाई आराखडा तयार केला असून, त्यानुसार कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. टँकर लावण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहे.

टॅग्स :JalgaonजळगावGulabrao Patilगुलाबराव पाटील