शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

अमळनेर, चाळीसगाव तालुक्यात तब्बल महिनाभरानंतर पावसाचं ‘कमबॅक’, खरीप पिकांना मिळाली संजीवनी

By ajay.patil | Updated: September 7, 2023 18:52 IST

गेल्या महिनाभरापासून पाठ फिरवलेल्या पावसाचे बुधवारी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये जोरदार ‘कमबॅक’ झाले.

जळगाव : गेल्या महिनाभरापासून पाठ फिरवलेल्या पावसाचे बुधवारी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये जोरदार ‘कमबॅक’ झाले. बुधवारी रात्री व गुरुवारी पहाटेपर्यंत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पावसाने हजेरी लावली. अमळनेर व चाळीसगाव तालुक्यात तब्बल महिन्याभरानंतर वरुणराजा बरसल्याने, पावसाअभावी जीव तोडत असलेल्या खरीपच्या पिकांना नवसंजीवनी या पावसामुळे मिळाली आहे.

दरम्यान, आगामी चार ते पाच दिवस जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. बुधवारी जिल्ह्यात एकूण १२ मिमी पाऊस झाला आहे. त्यात सर्वाधिक ३१ मिमी पाऊस जामनेर तालुक्यात, तर त्या खालोखाल मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यात २५ मिमी पाऊस झाला आहे. चाळीसगाव व अमळनेर तालुक्यातील जवळ-जवळ सर्वच महसूल मंडळांमध्ये गेल्या महिनाभरापासून पाऊस झाला नव्हता. त्यात काही महसूल मंडळांमध्ये तर ४० दिवसांपासून पाऊस नव्हता. मात्र, बुधवारी या दोन्ही तालुक्यांमधील सर्वच महसूल मंडळांमध्ये पाऊस झाल्यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. चाळीसगाव तालुक्यात १३ मिमी तर अमळनेर तालुक्यात ६ मिमी पावसाची नोंद झाली.

कोणत्या पिकांना काय फायदा...

  • - सद्य:स्थितीत कापसाला कैऱ्या लागल्या आहेत. मात्र, पाण्याअभावी कैऱ्यांची वाढ थांबली होती. आता पावसामुळे कैऱ्या भरण्यास मदत मिळणार आहे.
  • - सोयाबीनचे दाणे तयार होण्याच्या स्थितीत आहे. पावसामुळे सोयाबीनचे दाणे मोठे व होण्यास मदत मिळेल.
  • - पाऊस नसल्याने तापमानात वाढ झाल्यामुळे केळीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला होता. पावसामुळे तापमानात घट होऊन, लाल्याचा प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता आहे.
  • - कोरडवाहू जमिनीवरील उडीद, ज्वारी, मका या पिकांना पावसामुळे फायदा मिळणार आहे.
टॅग्स :JalgaonजळगावRainपाऊस