शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

१९९०मध्ये शरयूने अस्वस्थ केले; गोळीबारात जखमी कारसेवक भेटले, आज मंदिर झाल्याचे समाधान!

By अमित महाबळ | Updated: January 21, 2024 10:20 IST

कारसेविका ऋता मेलग यांनी सांगितल्या विशेष आठवणी

अमित महाबळ, जळगाव: सन १९९० चा तो दिवस आजही स्मरणात आहे. भाऊबीज झालेली. दुसऱ्याच दिवशी आदेश आले, की कारसेवेसाठी अयोध्येला कूच करा. अयोध्येत गेल्यावर दिसलेले दृश्य, श्रीरामलल्ला व रामभक्त हनुमान यांचे घेतलेले दर्शन हे सर्व प्रसंग आजही आठवणीत आहेत, असे कारसेविका ऋता मेलग यांनी सांगितले.

ऋता मेलग यांनी सांगितले, की १९९० मधील कारसेवेसाठी जळगाव जिल्ह्यातून त्या स्वत: व काकी अग्रवाल या दोनच महिला होत्या. कारसेवा समितीने सांगताच अनेक कारसेवक ताप्ती गंगा एक्स्प्रेसने अयोध्येला निघाले. आमच्यात काही शिवसैनिकही होते. सर्वांना दुसऱ्या दिवशी दुपारी अडीच वाजता नैनीला उतरविण्यात आले. पोलिस मागावर होते. पुढचा पायी प्रवास जंगलातून सुरू झाला. अयोध्येच्या गाडीत बसलो; पण, पोलिसांनी मध्येच अटक केली. त्यावेळी कारसेवकांच्या गर्दीने कारागृहे भरलेली होती, त्यामुळे पोलिसांनी दोन रात्र बसमध्येच सर्वांना फिरवत ठेवले. अखेर फरीदाबादच्या कारागृहात नेण्यात आले. नंतर महिलांची व्यवस्था स्वतंत्र ठिकाणी केली गेली. यादरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींच्या अटकेच्या निषेधार्थ उपोषण केल्याचेही मेलग यांनी सांगितले.

पितृऋण असे फेडले...

वडील प्रा. विष्णू घनश्याम देशपांडे यांनी व महंत अवैद्यनाथ यांनी १९४९ मध्ये श्रीराम व काशी विश्वेश्वर मंदिरासाठी अयोध्येत सत्याग्रह केला होता. वडील नंतर हिंदू महासभेचे देशातील पहिले खासदार झाले. ते ग्वाल्हेर व गुना मतदारसंघातून एकाचवेळी निवडून आले होते. कारसेवेत सहभागी होऊन वडिलांचे ऋण फेडल्याचे ऋता मेलग यांनी सांगितले.

‘ते’ दृश्य आजही आठवते...

कारागृहातून २१ व्या दिवशी सुटका होताच अयोध्या गाठली. प्रभू श्रीराम व मारुतीरायाचे दर्शन घेतले. गोळ्या लागून जखमी झालेले कारसेवक भेटले. शरयू नदीकिनारी कारसेवक, साधूंचे मृतदेह पाहून मन सुन्न झाले. कोठारी बंधूंना गोळ्या लागून भिंतींवर उडालेले रक्तही पाहिले. आज मंदिर झाल्याचे समाधान असल्याचे ऋता मेलग यांनी सांगितले.

राष्ट्रासाठी, मोदींसारख्या नेत्यासाठी हा नित्यनियम

ऋता मेलग २०१४ पासून दररोज सकाळी श्रीरामरक्षा स्तोत्र, मारुती स्तोत्र व चारश्लोकी रामायण म्हणतात. सर्वप्रथम राष्ट्रासाठी, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या कणखर नेत्याच्या रक्षणासाठी ही स्तोत्र म्हणत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दोन्ही मुले लहान, शेजारच्यांनी सांभाळ केला...

अयोध्येत कारसेवेसाठी गेले, त्यावेळी मुले पाच व दहा वर्षांची होती. त्यांना सोबत नेणे शक्य नव्हते. त्यामुळे घरीच ठेवले. शेजारच्यांनी या मुलांचा आपलेपणाने सांभाळ केला. पती सारंग मेलग यांच्या नोकरीमुळे त्यावेळी अमळनेरला राहायला होत्या. अयोध्येला कूच केल्यानंतर २८ व्या दिवशी त्या घरी परतल्या.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याJalgaonजळगावNarendra Modiनरेंद्र मोदी