शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

नव्या वर्षात राहणार कामगिरीला महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 19:50 IST

महाराष्टÑातील राजकीय स्थिती पाहता प्रत्येक राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी यांना काम करुन दाखवावेच लागेल, भाजप जसा मावळत्या वर्षात टीकेचा धनी ठरला तीच टीका महाआघाडीला नव्या वर्षात सहन करावी लागली

मिलिंद कुलकर्णीसत्तेसाठी काहीपण हे राजकीय पक्षांचे धोरण झाले असले तरी जनता आता कामगिरीला महत्त्व देत आहे. अजित पवारांसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न, पहिल्याच दिवसापासून सरकारवर टीकास्त्र यामुळे भाजप टीकेचा धनी ठरला. महाविकास आघाडीलाही सरकार स्थापना, विस्तार, खातेवाटप यासाठी घातलेल्या घोळामुळे टीका सहन करावी लागली. प्रत्येक राजकीय पक्ष, मंत्री, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांना जबाबदारीचे पालन करुन काम दाखवावे लागणार आहे. अटीतटीची स्पर्धा असल्याने जनतेचे त्यांच्या कामगिरीवर लक्ष राहणार आहे.महाविकास आघाडी सरकारचा बहुप्रतिक्षित विस्तार आणि खातेवाटप निर्विघ्नपणे पार पडले. खान्देशात काही असंतोष दिसून आला नाही. अ‍ॅड.के.सी.पाडवी या नंदुरबारच्या सातवेळा आमदार राहिलेल्या लोकप्रतिनिधीला आदिवासी विकास खात्याचे कॅबीनेट मंत्रिपद, खान्देशची मुलूखमैदान तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणीपुरवठा व स्वच्छता या खात्याचे कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. खान्देशात दोनच मंत्रिपदे मिळाली. गेल्यावेळी साडेतीन मंत्रिपदे होती. एकनाथराव खडसे, गिरीश महाजन, जयकुमार रावल हे कॅबिनेट तर गुलाबराव पाटील यांच्याकडे राज्यमंत्रिपद होते. खडसे दीड वर्षात मंत्रिमंडळाबाहेर पडले तर रावल व पाटील यांचा उशिरा प्रवेश झाला. युती सरकारच्या काळात नंदुरबार जिल्हा मंत्रिपदाविना राहिला. यंदा धुळ्याच्या वाटेला ही भूमिका आलेली आहे. पाडवी, पाटील यांच्याकडे पालकमंत्रीपद येईल. धुळ्याचे पालकत्व पुन्हा मालेगावच्या दादा भुसेंकडे राहते काय, हे बघायला हवे. गुलाबरावांना आणखी दमदार खाते हवे होते, अशी अपेक्षा जनसामान्यांची होती. त्यामानाने भुसेंना कृषी खाते मिळाले आहे.विस्तार आणि खातेवाटप झाल्याने आता मंत्र्यांनी कामाला सुरुवात करायला हवी. दोन्ही मंत्र्यांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. खान्देशातील २५ पैकी १० तालुके हे आदिवासी बहुल तालुके आहेत. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. युती सरकारच्या काळात आदिवासी विकास विभागाकडून समाधानकारक कामगिरी झाली नाही. डॉ.विजयकुमार गावीत यांनी या खात्यावर छाप उमटवली होती. तशा कामगिरीची आता पाडवी यांच्याकडून अपेक्षा आहे. खान्देशात काँग्रेसची मोठी पडझड झाली असल्याने पाडवी यांना पक्षाला बळकटी देण्याच्यादृष्टीने प्रयत्न करावे लागतील.गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणीपुरवठा व स्वच्छता हे खाते आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील पाणी योजनांचा अंतर्भाव या विभागात येतो. त्यांच्या मंत्रिपदाचा लाभ खान्देशला मिळू शकतो आणि पाटील यांचा कामाचा झपाटा आणि तडफ पाहता निश्चित त्यांच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.मंत्रिपदासोबत महामंडळांच्या नेमणुका लवकर व्हायला हव्यात. मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने जी थोडीफार नाराजी असेल ती दूर सारण्यासाठी या नियुक्ती महत्त्वाच्या ठरतील. तीन पक्ष आणि आमदार यांना सामावून घेताना मोठी कसरत करावी लागणार आहे. सेना प्रथमच अग्रक्रमाच्या भूमिकेत आली असल्याने नेते व कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. दुसरीकडे पाच वर्षांचा दुष्काळ संपून दोन्ही काँग्रेसला सत्ता पुन्हा मिळाली आहे. पाच वर्षे पक्षासोबत राहण्याचे फळ मिळायला हवे, अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे. त्यातून प्रत्येकाचे समाधान करण्याचे अवघड आव्हान नेतृत्वापुढे आहे.नंदुरबार-धुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतून जनतेचा कल लक्षात येईल. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात होणारी ही निवडणूक सर्वार्थाने महत्त्वपूर्ण आहे. नेते तेच असले तरी पक्ष बदलले आहेत. अमरीशभाई पटेल, राजवर्धन कदमबांडे, दीपक पाटील हे भाजपकडे, चंद्रकांत रघुवंशी हे शिवसेनेकडे तर अभिजित पाटील काँग्रेसकडे आहेत. जनता कोणत्या समीकरणाच्या बाजूने कौल देते, यावर पुढील गणिते अवलंबून राहतील.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव