शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ३०० खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
3
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
4
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
5
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
6
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
7
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
8
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
9
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
10
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
11
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
12
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
13
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
14
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
15
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
16
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
17
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
18
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
19
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
20
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य

नव्या वर्षात राहणार कामगिरीला महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 19:50 IST

महाराष्टÑातील राजकीय स्थिती पाहता प्रत्येक राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी यांना काम करुन दाखवावेच लागेल, भाजप जसा मावळत्या वर्षात टीकेचा धनी ठरला तीच टीका महाआघाडीला नव्या वर्षात सहन करावी लागली

मिलिंद कुलकर्णीसत्तेसाठी काहीपण हे राजकीय पक्षांचे धोरण झाले असले तरी जनता आता कामगिरीला महत्त्व देत आहे. अजित पवारांसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न, पहिल्याच दिवसापासून सरकारवर टीकास्त्र यामुळे भाजप टीकेचा धनी ठरला. महाविकास आघाडीलाही सरकार स्थापना, विस्तार, खातेवाटप यासाठी घातलेल्या घोळामुळे टीका सहन करावी लागली. प्रत्येक राजकीय पक्ष, मंत्री, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांना जबाबदारीचे पालन करुन काम दाखवावे लागणार आहे. अटीतटीची स्पर्धा असल्याने जनतेचे त्यांच्या कामगिरीवर लक्ष राहणार आहे.महाविकास आघाडी सरकारचा बहुप्रतिक्षित विस्तार आणि खातेवाटप निर्विघ्नपणे पार पडले. खान्देशात काही असंतोष दिसून आला नाही. अ‍ॅड.के.सी.पाडवी या नंदुरबारच्या सातवेळा आमदार राहिलेल्या लोकप्रतिनिधीला आदिवासी विकास खात्याचे कॅबीनेट मंत्रिपद, खान्देशची मुलूखमैदान तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणीपुरवठा व स्वच्छता या खात्याचे कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. खान्देशात दोनच मंत्रिपदे मिळाली. गेल्यावेळी साडेतीन मंत्रिपदे होती. एकनाथराव खडसे, गिरीश महाजन, जयकुमार रावल हे कॅबिनेट तर गुलाबराव पाटील यांच्याकडे राज्यमंत्रिपद होते. खडसे दीड वर्षात मंत्रिमंडळाबाहेर पडले तर रावल व पाटील यांचा उशिरा प्रवेश झाला. युती सरकारच्या काळात नंदुरबार जिल्हा मंत्रिपदाविना राहिला. यंदा धुळ्याच्या वाटेला ही भूमिका आलेली आहे. पाडवी, पाटील यांच्याकडे पालकमंत्रीपद येईल. धुळ्याचे पालकत्व पुन्हा मालेगावच्या दादा भुसेंकडे राहते काय, हे बघायला हवे. गुलाबरावांना आणखी दमदार खाते हवे होते, अशी अपेक्षा जनसामान्यांची होती. त्यामानाने भुसेंना कृषी खाते मिळाले आहे.विस्तार आणि खातेवाटप झाल्याने आता मंत्र्यांनी कामाला सुरुवात करायला हवी. दोन्ही मंत्र्यांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. खान्देशातील २५ पैकी १० तालुके हे आदिवासी बहुल तालुके आहेत. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. युती सरकारच्या काळात आदिवासी विकास विभागाकडून समाधानकारक कामगिरी झाली नाही. डॉ.विजयकुमार गावीत यांनी या खात्यावर छाप उमटवली होती. तशा कामगिरीची आता पाडवी यांच्याकडून अपेक्षा आहे. खान्देशात काँग्रेसची मोठी पडझड झाली असल्याने पाडवी यांना पक्षाला बळकटी देण्याच्यादृष्टीने प्रयत्न करावे लागतील.गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणीपुरवठा व स्वच्छता हे खाते आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील पाणी योजनांचा अंतर्भाव या विभागात येतो. त्यांच्या मंत्रिपदाचा लाभ खान्देशला मिळू शकतो आणि पाटील यांचा कामाचा झपाटा आणि तडफ पाहता निश्चित त्यांच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.मंत्रिपदासोबत महामंडळांच्या नेमणुका लवकर व्हायला हव्यात. मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने जी थोडीफार नाराजी असेल ती दूर सारण्यासाठी या नियुक्ती महत्त्वाच्या ठरतील. तीन पक्ष आणि आमदार यांना सामावून घेताना मोठी कसरत करावी लागणार आहे. सेना प्रथमच अग्रक्रमाच्या भूमिकेत आली असल्याने नेते व कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. दुसरीकडे पाच वर्षांचा दुष्काळ संपून दोन्ही काँग्रेसला सत्ता पुन्हा मिळाली आहे. पाच वर्षे पक्षासोबत राहण्याचे फळ मिळायला हवे, अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे. त्यातून प्रत्येकाचे समाधान करण्याचे अवघड आव्हान नेतृत्वापुढे आहे.नंदुरबार-धुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतून जनतेचा कल लक्षात येईल. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात होणारी ही निवडणूक सर्वार्थाने महत्त्वपूर्ण आहे. नेते तेच असले तरी पक्ष बदलले आहेत. अमरीशभाई पटेल, राजवर्धन कदमबांडे, दीपक पाटील हे भाजपकडे, चंद्रकांत रघुवंशी हे शिवसेनेकडे तर अभिजित पाटील काँग्रेसकडे आहेत. जनता कोणत्या समीकरणाच्या बाजूने कौल देते, यावर पुढील गणिते अवलंबून राहतील.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव