शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जयप्रकाश नारायण यांची भाजपा सरकारकडून उपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 12:40 IST

घरचा आहेर: लोकतंत्र सेनानी संघाचे अध्यक्ष पांडे यांची खंत

ठळक मुद्देसन्मानाच्या विषयावर सरकार गंभीर- गिरीश महाजनप्रश्न मार्गी लागेल- एकनाथराव खडसे
जळगाव- लोकनायक जयप्रकाश नारायण यांची भाजपा सरकारकडून उपेक्षा होत आहे, अशी खंत अ. भा. लोकतंत्र सेनानी संघाचे प्रांताध्यक्ष आणि रा. स्व. संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते जयप्रकाश पांडे (नागपूर) यांनी येथे व्यक्त केली. गुरुवारी 23 रोजी सकाळी 11 वाजता येथील आयएमए सभागृहात लोकतंत्र सेनानी संघातर्फे मीसा राजबंदी व सत्याग्रही कार्यकत्र्याचा मेळावा आयोजित केला होता. या उत्तर महाराष्ट्रस्तरीय मेळाव्यात पांडे बोलत होते. स्वागताध्यक्ष आमदार सुरेश भोळे हे होते. व्यापीठावर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री व आमदार एकनाथराव खडसे, सेनानी संघाचे प्रांत संघटक सुरेशराव सायखेडकर, आमदार उदयसिंग पाडवी, आमदार बाळासाहेब सानप (नाशिक) यांची मुख्य उपस्थिती होती. यावेळी पांडे म्हणाले की, जे लोक आणीबाणी विरुद्ध जेल मध्ये गेले. ते जयप्रकाश नारायण यांच्या विचारांनी प्रेरीत झाले होते. हुकूमशाही विरुद्ध लढा देत लोकशाहीसाठी त्यांनी सर्वस्व अर्पण केले. त्या सर्व मीसा राजबंदी सत्याग्रहींना देशातील स्वातंत्र्य लढय़ातील सैनिकांप्रमाणे सन्मान व मानधन दिले जावे अशी मागणी आहे. मात्र आपल्या विचारांचे भाजपाचे सरकार येवून तीन वर्षे उलटली तरी मागणी मार्गी लागेली नाही. यामुळे या सरकारकडून जयप्रकाश नारायण यांची उपेक्षा होत आहे, अशी खंत व्यक्त करीत इतर सात राज्यात मीसा राजबंदी सत्याग्रहींना देशातील स्वातंत्र्य लढय़ातील सैनिकांप्रमाणे सन्मान करुन मानधन दिले जात असल्याचाही उल्लेख केला. तर गिरीश महाजन व एकनाथराव खडसे यांनी हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्याने त्यांचे आभार मानत तातडीने यावर निर्णय चांगला निर्णय होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. याच विषयावर सांगली येथे 26 रोजी महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांच्या उपस्थितीत मेळावा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सन्मानाच्या विषयावर सरकार गंभीर- गिरीश महाजनआणीबाणीच्या काळात अनेकांनी लढा दिला म्हणूनच लोकशाही जिवंत राहिली अन्यथा आज वेगळे चित्र दिसले असते. त्याकाळी जे लोकतंत्र सेनानींनी धाडस दाखवले त्यामुळे हळूहळू विचारांच प्रसार होत आज आपले सरकार आले तसेच छोटे कार्यकर्तेही मंत्री झाले. याची जाणीव सरकारला असून लोकतंत्र सेनानींचा योग्य सन्मान केला जाईल व मानधनही दिले जाईल. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अनुकूल असून आपला पाठपुरावा सुरु असून लवकरच चांगला निर्णय लागलेला दिसेल, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आश्वस्त केले. प्रश्न मार्गी लागेल- एकनाथराव खडसेदेशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अनेक चांगल्य योजना आणल्या व धाडसी निर्णयही घेतले परंतु हळू हळू त्यांच्यात हुकूमशाही वृत्ती येत गेली. याचाच परिपाक आणिबाणीत झाला. याविरुद्ध अनेकांनी मोठय़ा हिमतीने जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली लढा दिला. जेलमध्ये गेल्याने अनेकांच्या नोक:या गेल्या. व्यवसाय ठप्प झाले. असा त्याग करणारे लोकतंत्र सेनानी यांनी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी स्वकीयांविरुद्ध आंदोलन पुकारले. स्वातंत्र सेनानींनी परकीयांविरूद्ध आंदोलन छेडले होते. त्यामुळे लोकतंत्र सेनानी यांचे कार्यदेखील जवळपास त्याच तोडीचे असल्याने आपण मुख्यमंत्र्यांकडे यासर्वाना सवलती मिळाव्या, मानधन मिळावे अशी मागणी केली आहेश अशी माहिती देत आमदार एकनाथराव खडसे यांनी पुन्हा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. व हा प्रश्न मुख्यमंत्री मार्गी लावतील असा विश्वास व्यक्त केला. प्रास्ताविक उदय भालेराव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विश्वास कुलकर्णी यांनी केले. यावेळी माजी आमदार धरमचंद चोरडिया, लखन भतवाल, मदनलाल मिश्र (धुळे) यांच्यासह सर्व सत्याग्रहीचा सत्कार करण्यात आला. दरम्यान जिल्ह्यातील लोकतंत्र सेनानी यांच्या आठवणींवरील पुस्तक काढण्याचे यावेळी ठरले.