शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

जळगावला आले म्हणजे भरीत-भाकरीच्या मेनूचा मोह होणारच...

By विलास.बारी | Updated: November 27, 2017 18:21 IST

जळगाव जिल्ह्यात हिवाळ्यात होते सर्वत्र भरीत पार्टीचे आयोजन

ठळक मुद्देकपाशीच्या काड्यांवर भाजलेल्या वांग्यांची चवच न्यारी...ठेचा, कांद्याची पात यामुळे भरीत होते रुचकरकळण्याची भाकरी व पुरीमुळे भरीताला स्वादभरीताचा मेनू पुण्या-मुंबईपर्यंत

आॅनलाईन लोकमतजळगाव : दि.२७ : सोनं आणि केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यात तुम्ही हिवाळ्यात पर्यटन किंवा कामाच्या निमित्ताने आलात तर कळण्याची भाकरी आणि भरीताचे रुचकर जेवण घेण्याचा मोह तुम्ही आवरू शकणार नाही. नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्यांच्या कालावधीत जळगावात शेतात सर्वत्र भरीत पार्टीची धूम असते. थेट पुणे, मुंबई व इंदूरपर्यंत पोहोचणाºया भरीताच्या वांग्यांमुळे जळगावातील अनेक गावांचे अर्थकारण बदलले आहे.बामणोदची वांगी भरीतासाठी प्रसिद्धजळगावात भरीतासाठी वांगी बामणोदच्या शेतात पिकलेली निवडली जातात. बामणोद हे भुसावळ-यावल रस्त्यावरीले एक छोटेसे गाव आहे. या ठिकाणावरून वांगी मोठ्या प्रमाणात थेट मुंबई-पुण्याला रवाना केली जातात. स्थानिक बाजारात ४० रुपये किलो दराने मिळणारी ही वांगी, मुंबई-पुण्यात ६० ते ८० रुपये किलो दराने विकली जातात. वाग्यांमुळे या लहानशा गावाचे अर्थकारणही बदलत चालले आहे. जळगाव जिल्ह्यातील तापीकाठावरचे सर्वच तालुके ही वांगी पिकवतात. विदर्भातल्या थेट मलकापूरपर्यंत ही वांगी आता सहज उपलब्ध होताना दिसतात.

कपाशीच्या काड्यांवर भाजलेल्या वांग्यांची चवच न्यारी...भरतासाठी वांगी भाजावी लागतात. पण हेच वांगी कापसाच्या काड्यांवर भाजले तर त्या भरीताला खरी चव येते. भाजण्यापूर्वी वांग्यांना स्वच्छ काट्याने छिद्रे पाडून घ्यावे. काड्यांच्या आगीत १५ ते २० मिनिटांत वांगी भाजली जातात. भाजलेली वांगी एका मोठ्या परातीत ठेवून त्यांचे काळे झालेले साल काढायचे. चांगल्या दर्जाच्या वांग्यांना भाजल्यानंतर भरपूर तेल सुटते.

ठेचा, कांद्याची पात यामुळे भरीत होते रुचकरसाल आणि देठ काढलेला वांग्यांचा गर एका लाकडी (बडगी) भांड्यात टाकला जातो. हा गर लाकडाच्याच मुसळासारख्या वस्तूने ठेचला जातो. त्यामुळे तो गर एकजीव होतो. ठेचून एकजीव झालेल्या वांग्याच्या गराला फोडणी दिली जाते. फोडणीत तिखटाऐवजी भाजलेल्या मिरचीचा ठेचा टाकला जातो. त्यासाठी तिखट लवंगी मिरची वापरली जाते. तिखट असलेले भरीत थंडीत रुचकर लागते. कांद्याची पात भरतासाठी अत्यावश्यक असते. हिरवी पात चिरून तिही भरीतात टाकली जाते. त्या पातीचे कांदे जेवतांना खातात. खोबरे, शेंगदाणे हे फोडणीच्या वेळी तर ठेचलेला लसूण फोडणी दिल्यानंतर भरीतात टाकली जाते.

कळण्याची भाकरी व पुरीमुळे भरीताला स्वादखान्देशात भरीताबरोबर कळण्याची भाकरी किंवा पुरी केली जाते. (कळणे म्हणजे ज्वारी आणि उडीद यांचे मिश्रण करून तयार केलेले पीठ). साधारण १ किलो ज्वारीत २०० ते २५० ग्रॅम उडीद टाकल्यानंतर कळणे तयार होते. सोबतीला तळलेल्या हिरव्या मिरच्या आणि कोशिंबीर, मुळा व टोमॅटो या मेणूची लज्जत वाढवितो.

भरीताचा मेणू पुण्या-मुंबईपर्यंतजळगाव तालुक्यातील आसोदा या गावातील आचारी भरीत तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. या गावातील काही तरुणांनी जळगाव शहरात भरीत सेंटर सुरु केले आहेत. या ठिकाणचे भरीत पुणे, मुंबई, इंदौरपर्यंत पोहचविले जाते.

भरीताची वांगी केवळ जळगावातचजळगाव जिल्ह्यात पिकणाºया या वांग्यांची लागवड अन्य ठिकाणी होत नाही. त्याची लागवड करण्याचा प्रयत्न केला तर जळगावच्या भरीतचा चव देखील येत नाही. या जातीवर संकर करण्याचा प्रयत्नही झाला आहे; पण संकरित वांग्यांमध्ये ती चव आली नाही.

टॅग्स :Jalgaonजळगावfoodअन्न