शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

जळगावला आले म्हणजे भरीत-भाकरीच्या मेनूचा मोह होणारच...

By विलास.बारी | Updated: November 27, 2017 18:21 IST

जळगाव जिल्ह्यात हिवाळ्यात होते सर्वत्र भरीत पार्टीचे आयोजन

ठळक मुद्देकपाशीच्या काड्यांवर भाजलेल्या वांग्यांची चवच न्यारी...ठेचा, कांद्याची पात यामुळे भरीत होते रुचकरकळण्याची भाकरी व पुरीमुळे भरीताला स्वादभरीताचा मेनू पुण्या-मुंबईपर्यंत

आॅनलाईन लोकमतजळगाव : दि.२७ : सोनं आणि केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यात तुम्ही हिवाळ्यात पर्यटन किंवा कामाच्या निमित्ताने आलात तर कळण्याची भाकरी आणि भरीताचे रुचकर जेवण घेण्याचा मोह तुम्ही आवरू शकणार नाही. नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्यांच्या कालावधीत जळगावात शेतात सर्वत्र भरीत पार्टीची धूम असते. थेट पुणे, मुंबई व इंदूरपर्यंत पोहोचणाºया भरीताच्या वांग्यांमुळे जळगावातील अनेक गावांचे अर्थकारण बदलले आहे.बामणोदची वांगी भरीतासाठी प्रसिद्धजळगावात भरीतासाठी वांगी बामणोदच्या शेतात पिकलेली निवडली जातात. बामणोद हे भुसावळ-यावल रस्त्यावरीले एक छोटेसे गाव आहे. या ठिकाणावरून वांगी मोठ्या प्रमाणात थेट मुंबई-पुण्याला रवाना केली जातात. स्थानिक बाजारात ४० रुपये किलो दराने मिळणारी ही वांगी, मुंबई-पुण्यात ६० ते ८० रुपये किलो दराने विकली जातात. वाग्यांमुळे या लहानशा गावाचे अर्थकारणही बदलत चालले आहे. जळगाव जिल्ह्यातील तापीकाठावरचे सर्वच तालुके ही वांगी पिकवतात. विदर्भातल्या थेट मलकापूरपर्यंत ही वांगी आता सहज उपलब्ध होताना दिसतात.

कपाशीच्या काड्यांवर भाजलेल्या वांग्यांची चवच न्यारी...भरतासाठी वांगी भाजावी लागतात. पण हेच वांगी कापसाच्या काड्यांवर भाजले तर त्या भरीताला खरी चव येते. भाजण्यापूर्वी वांग्यांना स्वच्छ काट्याने छिद्रे पाडून घ्यावे. काड्यांच्या आगीत १५ ते २० मिनिटांत वांगी भाजली जातात. भाजलेली वांगी एका मोठ्या परातीत ठेवून त्यांचे काळे झालेले साल काढायचे. चांगल्या दर्जाच्या वांग्यांना भाजल्यानंतर भरपूर तेल सुटते.

ठेचा, कांद्याची पात यामुळे भरीत होते रुचकरसाल आणि देठ काढलेला वांग्यांचा गर एका लाकडी (बडगी) भांड्यात टाकला जातो. हा गर लाकडाच्याच मुसळासारख्या वस्तूने ठेचला जातो. त्यामुळे तो गर एकजीव होतो. ठेचून एकजीव झालेल्या वांग्याच्या गराला फोडणी दिली जाते. फोडणीत तिखटाऐवजी भाजलेल्या मिरचीचा ठेचा टाकला जातो. त्यासाठी तिखट लवंगी मिरची वापरली जाते. तिखट असलेले भरीत थंडीत रुचकर लागते. कांद्याची पात भरतासाठी अत्यावश्यक असते. हिरवी पात चिरून तिही भरीतात टाकली जाते. त्या पातीचे कांदे जेवतांना खातात. खोबरे, शेंगदाणे हे फोडणीच्या वेळी तर ठेचलेला लसूण फोडणी दिल्यानंतर भरीतात टाकली जाते.

कळण्याची भाकरी व पुरीमुळे भरीताला स्वादखान्देशात भरीताबरोबर कळण्याची भाकरी किंवा पुरी केली जाते. (कळणे म्हणजे ज्वारी आणि उडीद यांचे मिश्रण करून तयार केलेले पीठ). साधारण १ किलो ज्वारीत २०० ते २५० ग्रॅम उडीद टाकल्यानंतर कळणे तयार होते. सोबतीला तळलेल्या हिरव्या मिरच्या आणि कोशिंबीर, मुळा व टोमॅटो या मेणूची लज्जत वाढवितो.

भरीताचा मेणू पुण्या-मुंबईपर्यंतजळगाव तालुक्यातील आसोदा या गावातील आचारी भरीत तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. या गावातील काही तरुणांनी जळगाव शहरात भरीत सेंटर सुरु केले आहेत. या ठिकाणचे भरीत पुणे, मुंबई, इंदौरपर्यंत पोहचविले जाते.

भरीताची वांगी केवळ जळगावातचजळगाव जिल्ह्यात पिकणाºया या वांग्यांची लागवड अन्य ठिकाणी होत नाही. त्याची लागवड करण्याचा प्रयत्न केला तर जळगावच्या भरीतचा चव देखील येत नाही. या जातीवर संकर करण्याचा प्रयत्नही झाला आहे; पण संकरित वांग्यांमध्ये ती चव आली नाही.

टॅग्स :Jalgaonजळगावfoodअन्न