शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरू न झाल्यास लोकवर्गणीतून निधी उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम गेल्या अडीच वर्षांपासून सुरू आहे. सद्य:स्थितीत सुरू असलेल्या संथ कामामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम गेल्या अडीच वर्षांपासून सुरू आहे. सद्य:स्थितीत सुरू असलेल्या संथ कामामुळे या भागातील नागरिक वैतागले आहेत. आता सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरणने १५ ऑगस्टपर्यंत विद्युत खांबाचा अडथळा दूर करून, कामाला सुरुवात केली नाही. तर प्रत्येक नागरिकाकडे जाऊन पैसे जमा करून, विद्युत खांब हे लोकवर्गणीतून उभारलेल्या निधीतून हटविण्यात येतील, असा इशारा शिवाजीनगर भागातील नगरसेवकांनी दिला आहे.

शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या लांबत जाणाऱ्या कामामुळे आता नागरिकांचा संयम सुटू लागत आहे. तब्बल अडीच वर्षांपासून नागरिक त्रास सहन करत आहेत. तर दुसरीकडे प्रशासकीय यंत्रणा मात्र या कामाकडे लक्ष देताना दिसून येत नाही. त्यामुळे शिवाजीनगर भागातील आठ नगरसेवकांनी शुक्रवारी बैठक घेऊन जर महावितरणने १५ ऑगस्टपर्यंत विद्युत खांब हटविले नाही तसेच बांधकाम विभागानेदेखील उर्वरित कामाला सुरुवात केली नाही तर या कामासाठी सर्व नगरसेवक हे या भागातील नागरिकांकडे जाऊन, या कामासाठी निधी उभारून महावितरणला देतील, अशी भूमिका आता नगरसेवकांनी घेतली असल्याची माहिती नगरसेवक ॲड. दिलीप पोकळे यांनी दिली.

‘तो’ निधी वर्ग करण्यास पुन्हा आले विघ्न

१. विभागीय आयुक्तांनी विद्युत खांब हटविण्यासाठी दीड कोटी रुपयांचा मनपाने पाठविलेला प्रस्ताव फेटाळून लावल्यानंतर हा प्रस्ताव मनपाने आता राज्य शासनाकडे पाठविला आहे. मात्र, या प्रस्तावाला मंजुरी मिळण्यास उशीर होऊ शकतो व त्यामुळे कामालादेखील उशीर होईल. यासाठी मनपा प्रशासनाने महावितरणला आपल्या फंडातून दीड कोटी रुपयांचा निधी देण्याची तयारी दर्शविली होती.

२. हा निधी मनपाने वर्ग केल्यानंतर महावितरणला हे काम लवकर सुरू करण्याचा प्रस्ताव मनपाने दिला होता. तसेच वीज बील किंवा अन्य कामासाठी हा निधी नंतर महावितरणे मनपाकडे वर्ग करावा, अशीही तयारी मनपाने केली होती. मात्र, हा निधी परत देताना अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होतील, असे कारण महावितरणने दिल्यामुळे पुन्हा आता हा प्रस्ताव देखील रेंगाळला आहे. आता विद्युत खांब हटविण्यासाठी शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची वाट पहावी लागणार आहे.

डिसेंबरपर्यंत पुलाचे काम होणे अशक्य ?

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी गेल्या महिन्यात या पुलाच्या कामाची पाहणी केली होती. तसेच पुलाची पाहणी केल्यानंतर मक्तेदाराला डिसेंबरपर्यंत पुलाचे काम करण्याचे आदेश दिले होते. मात्र, सद्य:स्थितीत विद्युत खांब हटविण्याची प्रक्रिया पाहता डिसेंबरपर्यंत पुलाचे काम पूर्ण होणे अशक्य आहे.