शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणता पक्ष कोणासोबत आणि कुठे मैत्री करतोय, कुठे नुराकुस्ती खेळतोय... २९ महापालिकांचे चित्र एकाच क्लिकवर...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब कारभार! स्वतःला घोषित केलं व्हेनेझुएलाचे 'कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष'
3
नोकरी बदलताना ईपीएफचं काय होतं, पैसे सुरक्षित राहतात का? काय म्हणतो नियम, जाणून घ्या
4
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
5
रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित
6
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
7
Home Loan घेण्याचा विचार करताय? मग थांबा! 'या' सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त होम लोन; जाणून घ्या
8
मुंबई: नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ, चिठ्ठीत लिहिलं होतं की...
9
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
10
प्रचारासाठी यूपी, बिहारमधून १४२ गाड्या मुंबईत दाखल; वाहनांना आरटीओकडून सशर्त परवानगी
11
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
12
देशातील १० पैकी ७ मोठ्या कंपन्यांचे मार्केट कॅप ३.६३ लाख कोटींनी कमी झालं, रिलायन्सला सर्वात जास्त नुकसान
13
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
14
"जो रामाचा नाही, तो कामाचा नाही, ते सत्तेत असताना घरात बसले होते"; देवेंद्र फडणवीस यांची टीका
15
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
16
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
17
बाळासाहेब असते तर.. त्यांना आनंद झाला असता; पहिल्यांदाच राज यांनी बोलून दाखविली मनातील भावना
18
"मुंबईचे पुन्हा बॉम्बे करण्याचा डाव"; शिवाजी पार्कवरील सभेत उद्धव ठाकरेंचा आरोप
19
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
20
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरू न झाल्यास लोकवर्गणीतून निधी उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम गेल्या अडीच वर्षांपासून सुरू आहे. सद्य:स्थितीत सुरू असलेल्या संथ कामामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम गेल्या अडीच वर्षांपासून सुरू आहे. सद्य:स्थितीत सुरू असलेल्या संथ कामामुळे या भागातील नागरिक वैतागले आहेत. आता सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरणने १५ ऑगस्टपर्यंत विद्युत खांबाचा अडथळा दूर करून, कामाला सुरुवात केली नाही. तर प्रत्येक नागरिकाकडे जाऊन पैसे जमा करून, विद्युत खांब हे लोकवर्गणीतून उभारलेल्या निधीतून हटविण्यात येतील, असा इशारा शिवाजीनगर भागातील नगरसेवकांनी दिला आहे.

शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या लांबत जाणाऱ्या कामामुळे आता नागरिकांचा संयम सुटू लागत आहे. तब्बल अडीच वर्षांपासून नागरिक त्रास सहन करत आहेत. तर दुसरीकडे प्रशासकीय यंत्रणा मात्र या कामाकडे लक्ष देताना दिसून येत नाही. त्यामुळे शिवाजीनगर भागातील आठ नगरसेवकांनी शुक्रवारी बैठक घेऊन जर महावितरणने १५ ऑगस्टपर्यंत विद्युत खांब हटविले नाही तसेच बांधकाम विभागानेदेखील उर्वरित कामाला सुरुवात केली नाही तर या कामासाठी सर्व नगरसेवक हे या भागातील नागरिकांकडे जाऊन, या कामासाठी निधी उभारून महावितरणला देतील, अशी भूमिका आता नगरसेवकांनी घेतली असल्याची माहिती नगरसेवक ॲड. दिलीप पोकळे यांनी दिली.

‘तो’ निधी वर्ग करण्यास पुन्हा आले विघ्न

१. विभागीय आयुक्तांनी विद्युत खांब हटविण्यासाठी दीड कोटी रुपयांचा मनपाने पाठविलेला प्रस्ताव फेटाळून लावल्यानंतर हा प्रस्ताव मनपाने आता राज्य शासनाकडे पाठविला आहे. मात्र, या प्रस्तावाला मंजुरी मिळण्यास उशीर होऊ शकतो व त्यामुळे कामालादेखील उशीर होईल. यासाठी मनपा प्रशासनाने महावितरणला आपल्या फंडातून दीड कोटी रुपयांचा निधी देण्याची तयारी दर्शविली होती.

२. हा निधी मनपाने वर्ग केल्यानंतर महावितरणला हे काम लवकर सुरू करण्याचा प्रस्ताव मनपाने दिला होता. तसेच वीज बील किंवा अन्य कामासाठी हा निधी नंतर महावितरणे मनपाकडे वर्ग करावा, अशीही तयारी मनपाने केली होती. मात्र, हा निधी परत देताना अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होतील, असे कारण महावितरणने दिल्यामुळे पुन्हा आता हा प्रस्ताव देखील रेंगाळला आहे. आता विद्युत खांब हटविण्यासाठी शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची वाट पहावी लागणार आहे.

डिसेंबरपर्यंत पुलाचे काम होणे अशक्य ?

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी गेल्या महिन्यात या पुलाच्या कामाची पाहणी केली होती. तसेच पुलाची पाहणी केल्यानंतर मक्तेदाराला डिसेंबरपर्यंत पुलाचे काम करण्याचे आदेश दिले होते. मात्र, सद्य:स्थितीत विद्युत खांब हटविण्याची प्रक्रिया पाहता डिसेंबरपर्यंत पुलाचे काम पूर्ण होणे अशक्य आहे.