शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
6
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
7
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
8
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
9
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
10
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
11
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
12
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
13
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
14
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
15
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
16
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
17
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
18
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
19
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
20
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र

कॉपीचा प्रकार घडल्यास स्वत: गुन्हा दाखल करणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 12:16 IST

जळगाव : बारावीच्या परिक्षेत कोळगावला ‘कॉप्यांचे’अक्षरश: आभाळ फाटले. या केंद्रावरील सामूहिक कॉपीचा प्रकार राज्यभरात गाजत आहे. या पुढे कुठल्याही ...

जळगाव : बारावीच्या परिक्षेत कोळगावला ‘कॉप्यांचे’अक्षरश: आभाळ फाटले. या केंद्रावरील सामूहिक कॉपीचा प्रकार राज्यभरात गाजत आहे. या पुढे कुठल्याही केंद्रावर पुन्हा असा प्रकार घडल्यास आपण स्वत: येऊन केंद्रसंचालक आणि पर्यवेक्षकांवर गुन्हा दाखल करु, अशी तंबी महाराष्ट्र राज्य माध्यामिक व उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाचे सचिव नितीन उपासनी यांनी रविवारी केंद्र संचालकांच्या बैठकीत दिली.दहावीच्या परीक्षांना उद्यापासून सुुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी दुपारी डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महाविद्यालयात केंद्र संचालकांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर माध्यामिक शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी किशोर वायकोळे उपस्थित होते. बैठकीत उपासनी यांनी इयत्ता १२ वीच्या पहिल्याच पेपरपासून, जिल्ह्यात सुरु असलेल्या कॉपीच्या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यात १२ वीच्या चार पेपरांमध्ये आतापर्यंत कॉपीच्या १३ केसेस घडल्या आहेत. कॉपीच्या प्रकारामुळे नियमित अभ्यास करुन, परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम होत असून, या प्रकाराला आळा घालण्यासाठी शिक्षकांनी यांची गंभीरदखल घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.तर कॉपीच्या प्रकाराला केंद्र संचालकच जबाबदार-परिक्षा सुरु होण्याच्या आधी विद्यार्थ्यांची तपासणी करुनच परीक्षा केंद्रावर सोडावे. तपासणी वेळी जी कॉपी आढळेल, ती कॉपी लगेच बाहेरचं जाळून टाकावी. असे असतानांही भरारी पथकाला एखादी विद्यार्थी कॉपी करतांना आढळल्यास, या प्रकाराला केंद्र संचालकच जबाबदार असल्याची माहिती नितीन उपासनी यांनी यावेळी दिली.-परिक्षा काळात संबंधित केंद्रांची जबाबदारी ही केंद्र संचालकाचींच असते. जर केंद्र संचालकांनी ठरवले, तर एकही विद्यार्थ्याला कॉपी करता येणार नसून, १० वीची परिक्षा १०० टक्के कॉपीमुक्त करता येणार असल्याचे सांगितले.कुणालाही फोन करा, कारवाई होणारचकोळगावच्या केंद्रावर मोठ्या प्रमाणावर मास कॉपीचा प्रकार घडणे, ही गंभीर बाब आहे. इथल्या कॉपीचा प्रकार राज्यभरात गाजत आहे. बºयाचदां संस्थेच्या राजकीय दडपशाहीखाली केंद्रसंचालक काम करत असल्यामुळे असे प्रकार घडतात. मात्र, या गैरप्रकाराला आळा घालणे गरजेचे आहे.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव