शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

वृक्ष लागवड टाळली तर होणार फौजदारी!

By admin | Updated: October 5, 2015 00:30 IST

घरासमोर वृक्ष लागवड केलेली नाही, त्यांच्यावर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तरतूदही संबंधित आदेशात आह़े या आदेशाची अंमलबजावणी लवकरच धुळे मनपा करणार आह़े

धुळे : ले-आऊटला परवानगी देण्यापूर्वी अकृषक प्लॉटच्या सर्व बाजूंनी तसेच घराचे बांधकाम करताना घरासमोर आधी वृक्ष लागवड केल्याशिवाय बांधकामाला या पुढे परवानगी देता येणार नाही, असे आदेश राज्य शासनाने नुकतेच काढले आहेत़ शिवाय ज्यांनी घरासमोर वृक्ष लागवड केलेली नाही, त्यांच्यावर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तरतूदही संबंधित आदेशात आह़े या आदेशाची अंमलबजावणी लवकरच धुळे मनपा करणार आह़े

पर्यावरणाचा होणारा :हास थांबविण्यासाठी राज्य शासनाने कडक पावले उचलली आहेत़ शहरी तसेच ग्रामीण भागात ले-आऊटला परवानगी देण्यापूर्वी या अकृषक प्लॉटच्या सर्व बाजूंनी तसेच घराचे बांधकाम करताना समोर वृक्ष लागवड केल्याशिवाय बांधकामाला परवानगी देता येणार नाही, दिल्यास संबंधित अधिका:यांवरही कारवाई होणार आह़े

वर्षाला 1500 परवानगी

महापालिकेकडून वर्षभरात 1 हजार ते 1 हजार 500 बांधकामांना परवानगी दिली जात़े मात्र अनेकांकडून दबावतंत्राचा अवलंब करून परवानगी घेतली जाते, अनेकदा कागदपत्रेदेखील अपूर्ण सादर केली जातात़ मात्र या नवीन निर्णयामुळे या सर्व बाबींना चाप बसणार आह़े घराच्या आजूबाजूला वृक्षलागवड केल्याचे फोटोदेखील बांधकाम परवानगी घेताना सादर करावे लागणार आहेत़

ग्रामीण भागातही वनांची हानी

ग्रामीण भागात एकत्र कुटुंब व्यवस्था संपुष्टात येत असतानाच शेतीचेही तुकडे पडत आहेत़ त्यातून वृक्षतोडीचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढत आह़े त्याचबरोबर ज्यांच्यावर जंगलाच्या संरक्षणाची जबाबदारी आहे तेच जंगलाचे वैरी होत चालल्याचेही दिसून येत आह़े मानवाच्या भौतिक सुखापोटी वाढत्या वस्त्यांमुळे आणि रस्त्यांच्या रुंदीकरणात वृक्षांची सर्रास कत्तल केली जात आह़े अनेक ठिकाणी तर झाडाची कत्तल करण्यासाठी झाडाच्या बुंध्यामध्ये विस्तव टाकून वृक्ष जाळण्याचे प्रमाण वाढले आह़े शिवाय महामार्गाच्या कामातही वृक्षांची बेसुमार कत्तल होत आह़े

मनपाला ‘नो उल्लू बनाविंग’

महापालिका हद्दीत वृक्षतोड करण्यापूर्वी मनपा वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी घेणे आवश्यक असत़े मात्र वृक्ष प्राधिकरण समिती नावालाच असल्याने नागरिकांच्या अर्जावर लवकर कार्यवाही होत नाही़ परिणामी नागरिक परवानगीची वाट न पाहताच वृक्षतोड करतात़ एका वृक्षतोडीसाठी परवानगी घेतली, तरी अनेक वृक्षांची कत्तल करतात़ शिवाय लाकूड तस्करीसाठीदेखील मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड होत़े परंतु शासनाच्या नवीन निर्णयामुळे वृक्ष तोडीसाठी रितसर परवानगी घेणे अनिवार्य असणार आह़े त्याचप्रमाणे एक वृक्ष तोडल्यास दहा वृक्षदेखील लावावे लागणार आहेत़ निसर्ग रक्षणासाठी शासन निर्णयाची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याने कारवाई होणार आह़े

'' शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार अंमलबजावणी करणे बंधनकारकच आह़े तशा सूचनादेखील नगररचना विभागाला दिल्या असून वृक्ष लागवड केल्याशिवाय बांधकाम परवानगी दिली जाणार नाही़''

-डॉ़ नामदेव भोसले, आयुक्त, मनपा, धुळे