शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

धनगर समाजास आरक्षण न मिळाल्यास सरकारला खाली खेचू - गोपीचंद पडळकर यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 21:08 IST

अमळनेर येथे महाएल्गार मेळावा

अमळनेर, जि. जळगाव : धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी घरातील सत्ताधारी आमदारांचे छायाचित्र काढून फेका असे आवाहन करत महिन्याभरात धनगरांना एस.टी. प्रवर्गाचा दाखला मिळाला नाही तर केंद्रातील व राज्यातील सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी अमळनेर येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाचे लोकार्पण आणि समाजाच्या मेळाव्यासाठी आयोजित महाएल्गार मेळाव्यात केलेग. स. हायस्कूलमध्ये रविवारी महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा पुष्पलता पाटील होत्या . दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी गोपीचंद पडळकर, उत्तमराव जानकर, शिवदास बिडकर यांचे हेलिकॉप्टरने प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर आगमन झाले. धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी पिवळे झेंडे बांधलेल्या मोटारसायकल रॅलीने स्वागत केले. तेथून सर्व अतिथींच्या उपस्थितीत बसस्थानकाजवळ न.पा. ने बांधून दिलेल्या अहिल्याबाई होळकर स्मारकाचे लोकार्पण झाले. त्यांनतर ग. स. हायस्कूलमध्ये अहिल्याबाई व थोर पुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून सभेला सुरुवात झाली. व्यासपीठावर गोपीचंद पडळकर, उत्तमराव जानकर, तालुकाध्यक्ष मच्छिंद्र लांडगे, शिवदास बिडकर, माजी उपनगराध्यक्ष मोहन सातपुते, नितीन निळे, डी. ए. धनगर, समाधान धनगर, हरचंद लांडगे, जिभाऊ कंखरे, विलास लांडगे, सदाशिवराव ढेकळे, धनराज कंखरे, विक्रांत पाटील उपस्थित होतेपडळकर पुढे म्हणाले की, घरातील नेत्याचे छायाचित्र गर्भवती महिलेने पाहिला आणि तो नेता भ्रष्टाचारी किंवा चोर असेल तर तुमचा मुलगाही चोर आणि खोटारडा निघू शकतो, अशा शब्दात नेत्यांविषयी नाराजी व्यक्त केली. कार्यकर्त्यांनी राजकारणात प्रगल्भ व्हायचे आहे. सर्व काही राजकारणातून घडते, त्यामुळे राजकारण करा, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. धनगरांच्या जीवावर राजकारण करणारे उपेक्षा करीत असून आता आपल्याला सत्तेत भागीदारी पाहिजे. आपल्या राज्यात जनावरांची संख्या मोजली जाते माणसांची नव्हे, असेही ते म्हणाले. ‘जितनी जिसकी संख्या भारी उसकी उतनी मक्तेदारी’ या तत्वावर आरक्षण मिळाले पाहिजे, असे म्हणत हुजरेगिरी करू नका लढाई लढा, राज्यात २५० घराणी प्रस्थापित असून ती नेस्तनाबूत करायची आहेत, असा मनोदय त्यांनी व्यक्त केला. राज्यकर्ते आमच्या हिताचे बोलले नाहीत तर त्यांच्या वाटेत काटे पेरल्याशिवाय राहणार नाहीत अशा इशारा देत तुम्ही फक्त ७ दिवस द्या महाड ते मुंबई मोर्चात मुले, बाळे कुटुंबासह जनावरे , मेंढ्या घेऊन हजर राहा, तुम्हाला एस. टी. प्रवर्गाचा दाखला मिळवून देतो, अशी ग्वाही त्यांनी दिली.आदिवासींशी आपली लढाई नाहीआदिवासींशी आपली लढाई नाही, आपल्याला भीक मागून नाही तर अधिकार हिसकावून घाययचा आहे, असे आवाहन करून ते म्हणाले की अमळनेरचे स्मारक बहुजनासाठी प्रेरक व आदर्श ठरणार आहे.प्रास्ताविक डी. ए. धनगर यांनी केले. त्यात ते म्हणाले की, या मेळाव्यातून सरकारला २०१९च्या निवडणुकीची जाणीव करून सरकारला इशारा द्यायचा आहे.कार्यक्रमास दशरथ लांडगे, प्रभाकर लांडगे, विलास लांडगे, श्रावण तेले, प्रदीप कंखरे, आधार धनगर, निरंजन पेंढारकर, गोपाळ हडपे, दीपक चौगुले, जिभाऊ कंखरे, प्रा. सुनील निळे, विजय लांडगे, अनिल भालेराव, आदी पदाधिकाऱ्यांसह खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार येथून धनगर समाजाचे कार्यकर्ते, समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन वसुंधरा लांडगे यांनी केले व आभार मानले.अनिल गोटे यांच्या अन्यायाचा वचपा काढूभाजपने अनिल गोटे यांच्यावर अत्याचार करून स्वत:चे थडगे उघडून ठेवले आहे. अनिल गोटे यांच्या अन्यायाचा वचपा राज्यात सर्वत्र मतदानाच्या माध्यमातून काढू, असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी मार्गदर्शन करताना दिला.सरकारने फसवणूक केलीया वेळी मार्गदर्शन करताना उत्तमराव जानकर म्हणाले की, हा अखेरचा लढा आहे, आता निर्णय घेऊनच थांबायचे आहे. राज्यातील भाजप व सहकारी ९१ आमदारांच्या मतदार संघात त्यांना सत्तेतून खाली गाडण्यासाठी या सभा घेतल्या जात आहेत. सरकारने फसवणूक करून अंदाजित लोकसंख्येच्या आधारे एन. टी.चे आरक्षण दिले असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :AmalnerअमळनेरJalgaonजळगाव