शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

महिला सबलीकरण करण्यातूनच देशाचा विकास शक्य- बोदवड येथे चर्चासत्रात मान्यवरांचे विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 19:40 IST

राज्य महिला आयोग आणि बोदवड येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आयोजित राज्यस्तरीय चर्चासत्र घेण्यात आले. महिला सबलीकरण करण्यातूनच देशाचा विकास शक्य असल्याचे मान्यवरांनी या चर्चासत्रात सांगितले.

ठळक मुद्देमहिलाविषयक विविध कायद्यांचा आढावा प्रा.डॉ.रुपाली तायडे यांनी घेतला. सत्राध्यक्ष म्हणून नाहटा महाविद्यालयातील डॉ.स्मिता चौधरी या होत्या.प्राचार्य डॉ.अरविंद चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत दिवसभर झालेल्या विविध व्याख्यानांच्या संदर्भात व महिलांच्या समस्यांसंदर्भात खुले चर्चासत्र घेण्यात आले.चर्चासत्राचा समारोप समारंभ सायंकाळी विकास कोटेचा, प्राचार्य डॉ.अरविंद चौधरी उपप्राचार्य डी.एस.पाटील, चर्चासत्र सचिव डॉ.गीता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

बोदवड, जि.जळगाव : राज्य महिला आयोग आणि बोदवड येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आयोजित राज्यस्तरीय चर्चासत्र घेण्यात आले. महिला सबलीकरण करण्यातूनच देशाचा विकास शक्य असल्याचे मान्यवरांनी या चर्चासत्रात सांगितले.‘ग्रामीण महिला : आरोग्य आणि सुरक्षा जनजागृती’ हा चर्चासत्राचा विषय होता. जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांनी उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी राज्य महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती रजनी चव्हाण, राज्य महिला आयोगाचे जिल्हा सचिव अ‍ॅड.पीयूष गढे, बोदवडच्या नगराध्यक्षा मुमताज बी.सईद बागवान आणि बोदवड सार्वजनिक को.आॅप.सोसायटीचे अध्यक्ष मिठूलाल अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यास संस्थेचे उपाध्यक्ष अजय जैन, सचिव विकास कोटेचा यांच्यासह संस्थेचे संचालक, विविध शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.चर्चासत्रात अंगणवाडी सेविका व आशा संस्थेच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.ग्रामीण भागतील महिलांचे जीवनमान उंचावणे व त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी राज्य महिला आयोगाचे कार्य अभिनंदनीय आहे, असे नगराध्यक्षा साधना महाजन यांनी सांगितले. महिलांची कहानी मुलीच्या जन्मापासून सुरु होते आणि मृत्यूच्या शय्येवर संपते.ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य व त्यांची सुरक्षा याबाबत जिल्हा न्यायालयाच्या अ‍ॅड.मंजू वाणी यांचे ‘हिंदू वारसा हक्क व कायदा १९५४’ या विषयावर व्याख्यान झाले.‘महिला शारीरिक आजार’ या विषयावर बोदवड डॉ.वृषाली चौधरी यांनी मार्गदर्शन केले. पाचोरा येथील डॉ.अनुजा देशमुख सत्राच्या अध्यक्षस्थानी होत्या.‘महिलांचे मानसिक आजार, लक्षणे आणि उपाय योजना’ या विषयावर जळगाव येथील कीर्ती देशमुख यानी मार्गदर्शन केले. सत्राध्यक्ष म्हणून अशा संस्थेच्या पर्यवेक्षक दमयंती इंगळे होत्या.चर्चासत्रासाठी प्रा.रत्ना जवरास, डॉ.अपर्णा चंद्रस, डॉ.कामिनी तिवारी, प्रा.हेमलता कोटेचा, प्रा. राजश्री चौधरी, प्रा.प्रतीक्षा धनगर प्रा.ज्योत्स्ना शिंदे, डॉ.रुपेश मोरे, डॉ.अनिल बारी, डॉ.मधू खराटे, डॉ.मनोज निकाळजे, बाबूराव हिवराळे, डॉ.व्ही.पी. चौधरी, डॉ. चेतन शर्मा, प्रा.नरेंद्र जोशी, प्रा.ईश्वर म्हसलेकर यांच्यासह शिक्षकांनी परिश्रम घेतले. 

टॅग्स :Educationशिक्षणBodwadबोदवड