शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
3
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
4
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
5
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
6
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
7
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
8
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
9
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
10
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
11
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
12
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
13
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
14
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
15
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
16
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
17
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

कृतार्थ मी... यथार्थ मी... सेवार्थ मी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 23:30 IST

अवघ्या वारकरी संप्रदायात श्री संत आदिशक्ती मुक्ताई यांची जी आरती म्हटली जाते त्या आरतीचे रचयिता म्हणून माझी म्हणजेच अ‍ॅड.गोपाल दशरथ चौधरी अशी ओळख असली तरी मुक्ताईरचित अभंगांचा अर्थ सोप्या स्वरूपात सांगण्याचे भाग्यदेखील मला मुक्ताई कृपेने लाभले आहे. तसेच काही लेखन अजूनही अप्रकाशित आहे.

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील मेहुण या गावी दशरथ जीवराम चौधरी व गोदावरीबाई दशरथ चौधरी या दाम्पत्याच्या पोटी गोपाल चौधरी म्हणजे माझा २६ डिसेंबर १९५१ रोजी जन्म झाला. बालपणापासूनच माझ्यावर आध्यात्मिक संस्कारांचा पगडा आहे. पहिली ते सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण तत्कालिन तापी नदीकिनारी असलेल्या जि.प. शाळेत झाले. त्यानंतर आठवी ते अकरावीपर्यंतचे माध्यमिक शिक्षण चांगदेव येथील शाळेत झाले. बारावी ते बीएपर्यंतचे शिक्षण मध्य प्रदेशातील बºहाणपूर येथे घेतले. महाविद्यालयात असताना प्रा.वि.रा. गर्गे यांनी मराठी साहित्याविषयी मला मार्गदर्शन केले. त्यानंतर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात १९९३ मध्ये एलएलबी करून वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुक्ताईनगर, भुसावळ, जळगाव व औरंगाबाद येथील न्यायालयात वकिली केली. हे करत असताना १९९३ ते १९९८ दरम्यान दरवर्षी अ‍ॅटो ग्लान्स अ‍ॅडव्होकेट डायरीचे प्रकाशन केले. १९६८-६९ मध्ये तापी नदीकिनारी असलेल्या श्रीसंत मुक्ताई यांच्या गुप्तस्थळ मंदिरात राहणाऱ्या श्रीराम महाराजांशी माझा संपर्क आला. महाराज मंदिरात नेहमी ज्ञानेश्वरी, श्रीमद् भागवत कथा, संत तुकाराम गाथा, अमृतानुभव, एकनाथी भागवत यांचा सखोल अर्थ समजावून सांगत असत. घरातील आध्यात्मिक वातावरण आणि त्याला संत मुक्ताई मंदिरात होत असलेल्या धार्मिक कार्यक्रमांची जोड मिळाल्याने माझा पिंड धार्मिकतेकडे वळू लागला. त्याचप्रमाणे मंदिरात राहणारे काशीनाथभाऊ यांनी मला श्रीमद् भगवद्गगीतेची संथा दिली. वयाच्या एकविसाव्या वर्षी १९७२ मध्ये संत मुक्ताई यांच्या अभंग व ओव्यांचे संकलन करून मी मुक्ताबाईंची कविता या पुस्तकाचे लेखन करून हे पुस्तक प्रकाशित केले. त्यानंतर १९७३ मध्ये चित्रमय श्रीक्षेत्र मेहुण ही फक्त फोटो असलेली पुस्तिका प्रकाशित करून संत मुक्ताईंचा प्रचार व प्रसार करण्याचे काम सुरू केले. त्याच वर्षी मुक्ता-मेहुण महात्म्य पुस्तिकेचे लेखन करून प्रकाशनही केले. त्याच पुस्तकात संत आदिशक्ती मुक्ताई यांची आरती प्रकाशित केली. याआधी मुक्ताईंची आरती नव्हती. इतर देवीदेवता आणि संतांची आरती मुक्ताईंच्या मंदिरात म्हटली जात असे. तेव्हा श्रीराम महाराज आणि काशीनाथभाऊ महाराज यांनी मुक्ताई आरती लेखन करण्याचे काम बाबूराव महाराज, टी.के. पाटील व माझ्यावर सोपविले. आम्ही तिघांनीही मुक्ताईंची आरती लिहिली. त्यापैकी मी लिहिलेली आरती मंदिरात रोज म्हटली जाऊ लागली. हिच आरती आज संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर अखिल वारकरी संप्रदायात मोठ्या श्रद्धेने म्हटली जात आहे. या आरतीचा रचियता म्हणून मला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यानंतर १९७८ ते १९८० दरम्यान एक साप्ताहिक काढून त्याचे यशस्वी संपादन केले. २००३ मध्ये माझ्या डोळ्यांनी माझी साथ सोडली. जवळ जवळ ९० टक्के मी आंधळा झालो. एवढे होऊनही मी माझ्यातल्या साहित्यिकाच्या पिंडाला कधी दूर लोटले नाही. आतापर्यंत असा ग्रंथ कोणी लिहिला नसल्याने हा ग्रंथ ऐतिहासिक झाला आहे व भाविकांकडून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आजतागायत वयाची ६८ वर्षे पूर्ण झाली आहेत. अनेक ग्रंथांचे लेखन पूर्ण झाले असून ते सध्या अप्रकाशित आहेत. असे सोमेश्वर पुरातन : मेहुण महात्म्य ओवीबद्ध एकूण नऊ अध्याय, निंबाई पुराण ओवीबद्ध एकूण नऊ अध्याय, संत मुक्ताईंच्या ताटीच्या अभंगांचे सार्थ विवरण, मराठी कवितासंग्रह मनोरथांचे मनोरे गीत आध्यात्म प्रमुख, हिंदी कवितासंग्रह गदीर्शे दौर प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगणे, संस्कृत भक्तीवेध एका भागात १९८ श्लोक असे पाच खंड अशी पुस्तके लिहून तयार आहेत. यापुढेही जगलो तर ही लेखन सेवा मरेपर्यंत सुरूच राहील. मुक्ताईनगर तालुक्यातील मेहुण-चिंचोल या गावात मी राहत असून प्रसिद्धीपासून दूर असल्याने अनेकांना माझ्या साहित्याची कल्पनादेखील नसेल. परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे मर्यादा आल्या आहेत. मुक्ताईंचे नामस्मरण हाच एक ध्यास शेवटच्या श्वासापर्यंत माझा राहील. यामुळे माझे जीवन कृतार्थ झाले आहे, असे मी समजतो.(शब्दांकन -डॉ.जगदीश पाटील)

टॅग्स :literatureसाहित्यMuktainagarमुक्ताईनगर