शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

"ओवैसीच्या कुत्र्यांना मी विधानसभेत ठणकावलं होतं"; मंत्री गुलाबराव पाटलांची जीभ घसरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 16:20 IST

लव्ह जिहाद, गो हत्या आणि धर्मांतर या मुद्द्यांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी दुपारी जळगावात हिंदू संघटनांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला होता.

प्रशांत भदाणे

जळगाव : "इस देश में रहना होगा तो वंदे मातरम् कहना होगा, हे ओवैसीच्या कुत्र्यांना मी विधानसभेत सांगितलं होतं", असं वादग्रस्त वक्तव्य राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी आज जळगावात केलंय. राज्यात आधीच वादग्रस्त वक्तव्यांवरून राजकारण तापलेलं असताना मंत्री गुलाबराव पाटलांनी एमआयएमच्या आमदारांना उद्देशून केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वाद उफाळण्याचा शक्यता आहे.

लव्ह जिहाद, गो हत्या आणि धर्मांतर या मुद्द्यांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी दुपारी जळगावात हिंदू संघटनांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाच्या समारोपप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ झालेल्या सभेला मंत्री गुलाबराव पाटील यांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलंय.

नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील?

आम्ही कुणाच्या धर्माकडे वाकड्या नजरेने बघत नाही, पण जर कुणी आमच्या धर्माकडे वाकड्या नजरेने बघत असेल तर आम्ही काय गांधीजी नाहीत. या गालावर मारलं म्हणून त्या गालावर मारा. इस देश में रहना होगा तो वंदे मातरम् कहना होगा, हे ओवैसीच्या कुत्र्यांना मी विधानसभेत सांगितले होते. हे आपल्याला माहिती आहे, असं गुलाबराव पाटील म्हणाले होते.

हिंदुत्वासाठी आम्ही चार महिन्यांपूर्वी गाडी बदलली-

आम्ही कुणाच्या धर्माचा अनादर करत नाही, पण याचा अर्थ असा नाही की कुणीही आमच्यावर चालून जावं. हिंदुत्वासाठी आम्ही चार महिन्यांपूर्वी गाडी बदलली. इस मार्ग की सभी लाईन व्यस्त हैं, थोडी देर बाद डायल करे, सीधा गुवाहाटी... बाळासाहेबांचं मूळ हिंदुत्व सुटू नये म्हणून आज मी तुमच्यासोबत आहे. मार्ग बदलल्यानंतर आमच्यावर खूप टीका झाली, आम्हाला ट्रोल केलं गेलं. पण आम्ही सत्तेसाठी मार्ग बदलला नाही तर हिंदुत्व वाचवण्यासाठी बदलला. सत्तेसाठी सतरा शे साठ पण आमच्यासाठी एकच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, असंही गुलाबराव म्हणाले.

संजय राऊत यांच्यावरही टीका...

यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावरही सडकून टीका केली. आमच्यावर खूप टीका होतं आहे, संजय राऊत पण आमच्यावर टीका करताहेत. पण एकनाथ शिंदे यांनी दाढीवर नुसता हात ठेवला असता तर राऊत खासदार झाले नसते, आडवे झाले असते. संजय राऊत यांना जी 41 मते पडली ती एकनाथ शिंदे यांच्यामुळे पडली. आपण पक्ष बीक्ष बाजूला ठेवू, जर धर्मच टिकला नाही तर पक्ष कुठं वाचणार आहे तुमचा, असंही त्यांनी सांगितलं.

टॅग्स :Gulabrao Patilगुलाबराव पाटील