शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

"ओवैसीच्या कुत्र्यांना मी विधानसभेत ठणकावलं होतं"; मंत्री गुलाबराव पाटलांची जीभ घसरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 16:20 IST

लव्ह जिहाद, गो हत्या आणि धर्मांतर या मुद्द्यांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी दुपारी जळगावात हिंदू संघटनांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला होता.

प्रशांत भदाणे

जळगाव : "इस देश में रहना होगा तो वंदे मातरम् कहना होगा, हे ओवैसीच्या कुत्र्यांना मी विधानसभेत सांगितलं होतं", असं वादग्रस्त वक्तव्य राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी आज जळगावात केलंय. राज्यात आधीच वादग्रस्त वक्तव्यांवरून राजकारण तापलेलं असताना मंत्री गुलाबराव पाटलांनी एमआयएमच्या आमदारांना उद्देशून केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वाद उफाळण्याचा शक्यता आहे.

लव्ह जिहाद, गो हत्या आणि धर्मांतर या मुद्द्यांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी दुपारी जळगावात हिंदू संघटनांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाच्या समारोपप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ झालेल्या सभेला मंत्री गुलाबराव पाटील यांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलंय.

नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील?

आम्ही कुणाच्या धर्माकडे वाकड्या नजरेने बघत नाही, पण जर कुणी आमच्या धर्माकडे वाकड्या नजरेने बघत असेल तर आम्ही काय गांधीजी नाहीत. या गालावर मारलं म्हणून त्या गालावर मारा. इस देश में रहना होगा तो वंदे मातरम् कहना होगा, हे ओवैसीच्या कुत्र्यांना मी विधानसभेत सांगितले होते. हे आपल्याला माहिती आहे, असं गुलाबराव पाटील म्हणाले होते.

हिंदुत्वासाठी आम्ही चार महिन्यांपूर्वी गाडी बदलली-

आम्ही कुणाच्या धर्माचा अनादर करत नाही, पण याचा अर्थ असा नाही की कुणीही आमच्यावर चालून जावं. हिंदुत्वासाठी आम्ही चार महिन्यांपूर्वी गाडी बदलली. इस मार्ग की सभी लाईन व्यस्त हैं, थोडी देर बाद डायल करे, सीधा गुवाहाटी... बाळासाहेबांचं मूळ हिंदुत्व सुटू नये म्हणून आज मी तुमच्यासोबत आहे. मार्ग बदलल्यानंतर आमच्यावर खूप टीका झाली, आम्हाला ट्रोल केलं गेलं. पण आम्ही सत्तेसाठी मार्ग बदलला नाही तर हिंदुत्व वाचवण्यासाठी बदलला. सत्तेसाठी सतरा शे साठ पण आमच्यासाठी एकच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, असंही गुलाबराव म्हणाले.

संजय राऊत यांच्यावरही टीका...

यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावरही सडकून टीका केली. आमच्यावर खूप टीका होतं आहे, संजय राऊत पण आमच्यावर टीका करताहेत. पण एकनाथ शिंदे यांनी दाढीवर नुसता हात ठेवला असता तर राऊत खासदार झाले नसते, आडवे झाले असते. संजय राऊत यांना जी 41 मते पडली ती एकनाथ शिंदे यांच्यामुळे पडली. आपण पक्ष बीक्ष बाजूला ठेवू, जर धर्मच टिकला नाही तर पक्ष कुठं वाचणार आहे तुमचा, असंही त्यांनी सांगितलं.

टॅग्स :Gulabrao Patilगुलाबराव पाटील