शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

"ओवैसीच्या कुत्र्यांना मी विधानसभेत ठणकावलं होतं"; मंत्री गुलाबराव पाटलांची जीभ घसरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 16:20 IST

लव्ह जिहाद, गो हत्या आणि धर्मांतर या मुद्द्यांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी दुपारी जळगावात हिंदू संघटनांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला होता.

प्रशांत भदाणे

जळगाव : "इस देश में रहना होगा तो वंदे मातरम् कहना होगा, हे ओवैसीच्या कुत्र्यांना मी विधानसभेत सांगितलं होतं", असं वादग्रस्त वक्तव्य राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी आज जळगावात केलंय. राज्यात आधीच वादग्रस्त वक्तव्यांवरून राजकारण तापलेलं असताना मंत्री गुलाबराव पाटलांनी एमआयएमच्या आमदारांना उद्देशून केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वाद उफाळण्याचा शक्यता आहे.

लव्ह जिहाद, गो हत्या आणि धर्मांतर या मुद्द्यांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी दुपारी जळगावात हिंदू संघटनांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाच्या समारोपप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ झालेल्या सभेला मंत्री गुलाबराव पाटील यांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलंय.

नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील?

आम्ही कुणाच्या धर्माकडे वाकड्या नजरेने बघत नाही, पण जर कुणी आमच्या धर्माकडे वाकड्या नजरेने बघत असेल तर आम्ही काय गांधीजी नाहीत. या गालावर मारलं म्हणून त्या गालावर मारा. इस देश में रहना होगा तो वंदे मातरम् कहना होगा, हे ओवैसीच्या कुत्र्यांना मी विधानसभेत सांगितले होते. हे आपल्याला माहिती आहे, असं गुलाबराव पाटील म्हणाले होते.

हिंदुत्वासाठी आम्ही चार महिन्यांपूर्वी गाडी बदलली-

आम्ही कुणाच्या धर्माचा अनादर करत नाही, पण याचा अर्थ असा नाही की कुणीही आमच्यावर चालून जावं. हिंदुत्वासाठी आम्ही चार महिन्यांपूर्वी गाडी बदलली. इस मार्ग की सभी लाईन व्यस्त हैं, थोडी देर बाद डायल करे, सीधा गुवाहाटी... बाळासाहेबांचं मूळ हिंदुत्व सुटू नये म्हणून आज मी तुमच्यासोबत आहे. मार्ग बदलल्यानंतर आमच्यावर खूप टीका झाली, आम्हाला ट्रोल केलं गेलं. पण आम्ही सत्तेसाठी मार्ग बदलला नाही तर हिंदुत्व वाचवण्यासाठी बदलला. सत्तेसाठी सतरा शे साठ पण आमच्यासाठी एकच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, असंही गुलाबराव म्हणाले.

संजय राऊत यांच्यावरही टीका...

यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावरही सडकून टीका केली. आमच्यावर खूप टीका होतं आहे, संजय राऊत पण आमच्यावर टीका करताहेत. पण एकनाथ शिंदे यांनी दाढीवर नुसता हात ठेवला असता तर राऊत खासदार झाले नसते, आडवे झाले असते. संजय राऊत यांना जी 41 मते पडली ती एकनाथ शिंदे यांच्यामुळे पडली. आपण पक्ष बीक्ष बाजूला ठेवू, जर धर्मच टिकला नाही तर पक्ष कुठं वाचणार आहे तुमचा, असंही त्यांनी सांगितलं.

टॅग्स :Gulabrao Patilगुलाबराव पाटील