शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
3
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
4
अब्जाधीशांच्या यादीत पहिल्यांदाच सामील झाला शाहरुख खान, पाहा किती झाली संपत्ती?
5
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
6
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
7
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
8
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
9
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
10
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
11
Gold Silver Price 1 October: एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
12
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
13
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
14
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
15
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
16
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
17
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
18
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
19
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
20
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

मी म्हणे गोपाळू आला गे माये...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 21:01 IST

वारकरी संताच्या स्फूट अभंगरचना निर्मितीत ‘विरहिणी’ अभंगाची रचना आहे. वारकरी परंपरेच्या सर्व संताच्या अभंग रचनेचा ‘भक्ती’ हा पाया आहे. ...

वारकरी संताच्या स्फूट अभंगरचना निर्मितीत ‘विरहिणी’ अभंगाची रचना आहे. वारकरी परंपरेच्या सर्व संताच्या अभंग रचनेचा ‘भक्ती’ हा पाया आहे. भक्ती ही नवविधा स्वरूपाची असल्याचे भागवत महापुरणात प्रतिपादित आहे.श्रवणं कीर्तनं विष्णो: स्मरणं पादसेवनम्अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्म निवेदनम्।।ही नवविधा भक्ती आचरणारे अनेक महान भक्त होवून गेले. परंतु परमेश्वराशी आत्यंतिक एकता साधणाऱ्यांसाठी स्त्री-पुरूष मिलनातील उत्कटावस्थाच आदर्श मानली जाते आणि त्यातूनच मधुराभक्तीचा उदय झाला आहे. ‘‘मधुराभक्ती’’ म्हणजे श्रृंगारभक्ती, परमेश्वराशी पती-पत्नी किंवा प्रियकर-प्रेयसीचे नातं जोडून जी भक्ती केली जाते, त्याला मधुराभक्ती असे नाव वैष्णवांनी दिले आहे. भगवान श्रीकृष्ण व गोपी यांची भक्ती ही मधुराभक्तीत मोडते. मानवी अनुरागाची व मिलनाची शेवटची पायरी म्हणजे स्त्री-पुरूषाचे, पती-पत्नीचे प्रेम हीच होय. आत्म्याने परम तत्वांशी, जीवाने-शिवाशी असा संबंध स्थापन करण्याचा अनुरागयुक्त प्रयत्न असतो, त्यातून मधुराभक्तीचा उगम झालेला आहे.संत ज्ञानेश्वर महाराजांनी गोप-गोपीची मधुराभक्ती रंगविली आहे. यात कधी श्रृंगार तर कधी वात्सल्य भाव प्रगट होतांना दिसतो. ज्ञानोबांना भक्ती प्रेमाची मातब्बरी कैवल्य प्राप्तीपेक्षाही मोठी वाटते. परब्रह्मांचे निर्गुण रूप श्रीविठ्ठलाच्या रूपाने सगुण साकार झाले आहे. हे खालील विरहिणीत दिसते.पंढपुरीचा निळा लावण्याचा पुतळा । विठो देखियेला डोळां बाईये वो ।।१।।वेधले वो मन तयाचिये गुणी । क्षणभर विठ्ठल रुक्मिणी न विसंबे ।।२।।या विरहिणीतून संत ज्ञानोबांच्या जीवाची श्रीविठ्ठल भेटीसाठी आत्यंतिक ओढ, तळमळ आणि त्याच्या अभावी होणारे असह्य विरह दु:ख दिसून येते.ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ‘माझ्या जीवीची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ।।संत ज्ञानोबांच्या विरहिणी या पांडुरंगाशी एकरूप करतात, श्री विठ्ठलाचे स्वरूप साºया स्थिरचरात भरून राहिल्याचा प्रत्यय येतो, आर्त विरहिणीची अशी अवस्था शारीरिक व मानसिक पातळवीरही अनुभवता येईल इतके हृदयस्पर्शी चित्रण माऊलींनी केले आहे. भक्ती सुखाचा अपूर्व अनुभव या विरहिणीद्वारे येतो. विरहाच्या वेदनेतही एक प्रकारचे गोड सुख प्राप्त होतांना दिसते.ज्ञानेश्वर महाराजांची विरहिणी म्हणजे श्रेष्ठ भक्तीचा अविष्कार आहे. अंतरंग अनुभव विरहिणी भजनाद्वारे त्यांनी प्रगट केला आहे. विरहिणी ही विठ्ठल वल्लभ व जीव कांता असा भाव आहे आणि या नात्याने श्री विठ्ठलाच्या दर्शनाकरिता तळमळणारी ही अवस्था आहे.अवचिता परिमळू झुळकला अळूमाळू ।मी म्हणे गोपाळू आला गे माये ।।या विरहिणीतून भेटीची लागलेली ओढ, उत्सुकता, आर्तता, तगमग, हुरहुर प्रगट होते. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मयातील विरहिणी या अतिश्य मधूर आहेत.- डॉ.कैलास पाटील, पिंपळेसीम ता.धरणगाव.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव