शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
2
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
3
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
4
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
5
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
6
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
7
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
8
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
9
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
10
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
11
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
12
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
13
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
14
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
15
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
16
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
17
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
18
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
19
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
20
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
Daily Top 2Weekly Top 5

मी जग सोडतोय, मुलगा, मित्रांना सांगितले, अन् शेतात जाऊन जीवन संपविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मुलगा, पत्नी व घरातील सर्व मंडळी झोपल्यानंतर मध्यरात्री दीड वाजता घर सोडले. त्यानंतर पावणेतीन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मुलगा, पत्नी व घरातील सर्व मंडळी झोपल्यानंतर मध्यरात्री दीड वाजता घर सोडले. त्यानंतर पावणेतीन वाजता मुलासह चार जणांना फोन करून मी जग सोडतोय, असे कळविले आणि काही क्षणातच कैलास धनसिंग पाटील (वय ५५) यांनी निबांच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बोरखेडा, ता. धरणगाव येथे घडली. शेतात राब राब राबून खर्चही निघत नाही. त्यात कर्ज व व्याजाचा डोंगर वाढतच चालल्याने नैराश्यात येऊन पाटील यांनी आत्महत्या केली आहे.

जिल्हा रुग्णालयात आलेल्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास पाटील यांच्याकडे १५ बिघे शेतजमीन आहे. शेतात संपूर्ण कुटुंब राबते. पण नफा तर सोडाच पेरणी, बियाणे, खते व मजुरी याचाही खर्च निघत नाही. शेतीसाठी दरवर्षी बँक, विकास सेवा सोसायटी तसेच खासगी लोकांकडून कर्ज घ्यावे लागते. या कर्जाचे व्याजाचे मीटर सुरूच असतात. उत्पन्नात घट, कर्ज फेडणे नाकीनाऊ आले. कुटुंबाचा गाडा चालविणेही अवघड झाल्याने पाटील यांनी थेट आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी संजूबाई, मुलगा सोपान, गजानन, आई सीताबाई, वडील धनसिंग पौलाद पाटील व भाऊ असा परिवार आहे. मंगळवारी सकाळी विच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

बॅटरी चमकताच घेतला गळफास

कैलास पाटील यांनी मंगळवारी पहाटे तीन वाजता गळफास घेतला. तत्पूर्वी त्यांनी सर्व जण झोपलेले असताना घर सोडले. दोरी घेऊन त्याचा फास तयार केला व निंबाच्या झाडावर बसून राहिले. तेथून त्यांनी मुलगा, नातेवाईक व मित्र अशा चार जणांना फोन करून मी जगाचा निरोप घेत असल्याचे सांगितले. घाबरलेल्या या चौघांनी तातडीने शेताकडे धाव घेतली. रात्रीच्या अंधारात बॅटरी चमकल्याचे दिसताच त्यांनी गळफास घेतला, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.