शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
2
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
3
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
4
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
5
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल चामखीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
8
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
9
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
10
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
11
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
12
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
13
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
14
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
15
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
16
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
17
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
18
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
19
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
20
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...

‘हास्यधारे’च्या हास्यकल्लोळात ओले चिंब झाले रसिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 01:11 IST

जळगाव येथील व.वा. वाचनालयाच्या १४२व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हास्य धारा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याविषयी ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत सांस्कृतिक या सदरात लिहिताहेत अशफाक पिंजारी...

वात्रटिका म्हणजे काय हो? तर वात्रटिका म्हणजे अशी हास्यकविता ज्यात अतिशयोक्ती असते, विडंबन असते, मिश्किलपणा, थट्टेखोरपणा असतो, मर्मावर बोट ठेवण्याची वृत्ती असते आणि दांभिकतेवर प्रहार केलेला असतो. या वात्रटिकेत शब्दांना जितके महत्व असते तितकेच महत्व त्याच्या सादरीकरणाला असते. आज वात्रटिका म्हटले की जे नाव प्रामुख्याने डोळ्यांसमोर येते, ते म्हणजे रामदास फुटाणे.जळगाव येथील व.वा. वाचनालयाच्या १४२व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हास्य धारा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात रामदास फुटाणे यांनी ‘हवा येते हवा जाते..., बदलतात रंग..., काँग्रेस होती नोकिया आणि भाजप सॅमसंग.. या विडंबन काव्यासह विनोदी कवितांनी रसिक अक्षरश: लोटपोट झाले आणि या ज्येष्ठ कवीच्या कवितांनी जगण्याचा संदेशही दिला.‘कधी कधी माझा देश आहे...’ फेम या वात्रटिकाकाराने विनोदी फटकेबाजी करीत हास्याचा फुलोरा फुलविला. या बहारदार कार्यक्रमाद्वारे रसिकांना एकाहून एक सरस हास्यकविता ऐकण्याची संधी उपलब्ध झाली. जणू काही पावसाळी वातावरणात एकप्रकारे नामवंत कवींच्या हास्य धाराच या वेळी बरसत होत्या.शतकोत्तर व.वा.वाचनालयाचा वर्धापन दिन दरवर्षी वेगवेगळ्या कार्यक्रमांची मेजवाणी घेऊन येत असतो. त्यानुसार यंदाचा वर्धापन दिन पावसाळी वातावरणात पाऊस धारांसह ‘हास्य धारा’ घेऊन आला होता. या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे आपल्या विडंबन काव्याने जळगावकर रसिकांना रामदास फुटाणे यांनी सूत्रसंचालन करून आपल्या खुमासदार आणि मिश्किल शैलीने कार्यक्रमात रंगत आणली.या कार्यक्रमात सादर होणाऱ्या प्रत्येक काव्यपंक्तींना हंशा आणि टाळ्यांचा पाऊस पडत होता. हास्य-विनोद अनुभवण्याची संधी ‘हास्य धारा’च्या माध्यमातून व.वा.वाचनालयाने जळगावकर रसिकांना उपलब्ध करून दिली होती. ही खरे म्हणजे आम्हा रसिकांसाठी पर्वणीच होती.यासोबतच दीर्घकाव्य संग्रहकार तसेच नाट्यलेखक, कवी अनिल दीक्षित (पुणे) यांनी नोटाबंदीवर सैराट चित्रपटातील झिंगाट गाण्याच्या चालीवर कविता सादर केली.ललित लेखक, कवी साहेबराव ठाणे (अहमदनगर) यांनी शेती, माती आणि ग्रामीण जीवनावरील कविता सादर करून खेड्यातले वास्तव मांडले. ज्यांच्या कविता दूरचित्रवाणीवरून राज्यभरात पोहचलेल्या असे कवी भरत दौडकर (शिक्रापूर) यांनी जमिनीच्या गुंठेवारीवरील कविता सादर केली. चित्रपट गीतकार, गझलकार, ‘जळणाराल्या विस्तव कळतो... बघणाºयाला नाही, जगणाºयाला जीवन कळते... पळणाºयाला नाही’ ही मार्मिक कविता कवी नितीन देशमुख (चांदूरबाजार) आणि कवी नारायण पुरी (तुळजापूर) या नामवंत कवींनी ‘प्रेमाचा जांगडगुत्ता’ ही विनोदी कविता सादर करून रसिकांची दाद मिळविली. अशा नामवंत कवींच्या कविता ऐकण्याचा हा आनंददायी सोहळा जळगावकर रसिकांना अनुभवता आला. नव्हे तर तो सोहळा रसिकांच्या कायम स्मृतीत राहणार आहे.-अशफाक पिंजारी, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव