शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

‘हास्यधारे’च्या हास्यकल्लोळात ओले चिंब झाले रसिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 01:11 IST

जळगाव येथील व.वा. वाचनालयाच्या १४२व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हास्य धारा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याविषयी ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत सांस्कृतिक या सदरात लिहिताहेत अशफाक पिंजारी...

वात्रटिका म्हणजे काय हो? तर वात्रटिका म्हणजे अशी हास्यकविता ज्यात अतिशयोक्ती असते, विडंबन असते, मिश्किलपणा, थट्टेखोरपणा असतो, मर्मावर बोट ठेवण्याची वृत्ती असते आणि दांभिकतेवर प्रहार केलेला असतो. या वात्रटिकेत शब्दांना जितके महत्व असते तितकेच महत्व त्याच्या सादरीकरणाला असते. आज वात्रटिका म्हटले की जे नाव प्रामुख्याने डोळ्यांसमोर येते, ते म्हणजे रामदास फुटाणे.जळगाव येथील व.वा. वाचनालयाच्या १४२व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हास्य धारा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात रामदास फुटाणे यांनी ‘हवा येते हवा जाते..., बदलतात रंग..., काँग्रेस होती नोकिया आणि भाजप सॅमसंग.. या विडंबन काव्यासह विनोदी कवितांनी रसिक अक्षरश: लोटपोट झाले आणि या ज्येष्ठ कवीच्या कवितांनी जगण्याचा संदेशही दिला.‘कधी कधी माझा देश आहे...’ फेम या वात्रटिकाकाराने विनोदी फटकेबाजी करीत हास्याचा फुलोरा फुलविला. या बहारदार कार्यक्रमाद्वारे रसिकांना एकाहून एक सरस हास्यकविता ऐकण्याची संधी उपलब्ध झाली. जणू काही पावसाळी वातावरणात एकप्रकारे नामवंत कवींच्या हास्य धाराच या वेळी बरसत होत्या.शतकोत्तर व.वा.वाचनालयाचा वर्धापन दिन दरवर्षी वेगवेगळ्या कार्यक्रमांची मेजवाणी घेऊन येत असतो. त्यानुसार यंदाचा वर्धापन दिन पावसाळी वातावरणात पाऊस धारांसह ‘हास्य धारा’ घेऊन आला होता. या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे आपल्या विडंबन काव्याने जळगावकर रसिकांना रामदास फुटाणे यांनी सूत्रसंचालन करून आपल्या खुमासदार आणि मिश्किल शैलीने कार्यक्रमात रंगत आणली.या कार्यक्रमात सादर होणाऱ्या प्रत्येक काव्यपंक्तींना हंशा आणि टाळ्यांचा पाऊस पडत होता. हास्य-विनोद अनुभवण्याची संधी ‘हास्य धारा’च्या माध्यमातून व.वा.वाचनालयाने जळगावकर रसिकांना उपलब्ध करून दिली होती. ही खरे म्हणजे आम्हा रसिकांसाठी पर्वणीच होती.यासोबतच दीर्घकाव्य संग्रहकार तसेच नाट्यलेखक, कवी अनिल दीक्षित (पुणे) यांनी नोटाबंदीवर सैराट चित्रपटातील झिंगाट गाण्याच्या चालीवर कविता सादर केली.ललित लेखक, कवी साहेबराव ठाणे (अहमदनगर) यांनी शेती, माती आणि ग्रामीण जीवनावरील कविता सादर करून खेड्यातले वास्तव मांडले. ज्यांच्या कविता दूरचित्रवाणीवरून राज्यभरात पोहचलेल्या असे कवी भरत दौडकर (शिक्रापूर) यांनी जमिनीच्या गुंठेवारीवरील कविता सादर केली. चित्रपट गीतकार, गझलकार, ‘जळणाराल्या विस्तव कळतो... बघणाºयाला नाही, जगणाºयाला जीवन कळते... पळणाºयाला नाही’ ही मार्मिक कविता कवी नितीन देशमुख (चांदूरबाजार) आणि कवी नारायण पुरी (तुळजापूर) या नामवंत कवींनी ‘प्रेमाचा जांगडगुत्ता’ ही विनोदी कविता सादर करून रसिकांची दाद मिळविली. अशा नामवंत कवींच्या कविता ऐकण्याचा हा आनंददायी सोहळा जळगावकर रसिकांना अनुभवता आला. नव्हे तर तो सोहळा रसिकांच्या कायम स्मृतीत राहणार आहे.-अशफाक पिंजारी, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव