शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

‘हास्यधारे’च्या हास्यकल्लोळात ओले चिंब झाले रसिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 01:11 IST

जळगाव येथील व.वा. वाचनालयाच्या १४२व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हास्य धारा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याविषयी ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत सांस्कृतिक या सदरात लिहिताहेत अशफाक पिंजारी...

वात्रटिका म्हणजे काय हो? तर वात्रटिका म्हणजे अशी हास्यकविता ज्यात अतिशयोक्ती असते, विडंबन असते, मिश्किलपणा, थट्टेखोरपणा असतो, मर्मावर बोट ठेवण्याची वृत्ती असते आणि दांभिकतेवर प्रहार केलेला असतो. या वात्रटिकेत शब्दांना जितके महत्व असते तितकेच महत्व त्याच्या सादरीकरणाला असते. आज वात्रटिका म्हटले की जे नाव प्रामुख्याने डोळ्यांसमोर येते, ते म्हणजे रामदास फुटाणे.जळगाव येथील व.वा. वाचनालयाच्या १४२व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हास्य धारा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात रामदास फुटाणे यांनी ‘हवा येते हवा जाते..., बदलतात रंग..., काँग्रेस होती नोकिया आणि भाजप सॅमसंग.. या विडंबन काव्यासह विनोदी कवितांनी रसिक अक्षरश: लोटपोट झाले आणि या ज्येष्ठ कवीच्या कवितांनी जगण्याचा संदेशही दिला.‘कधी कधी माझा देश आहे...’ फेम या वात्रटिकाकाराने विनोदी फटकेबाजी करीत हास्याचा फुलोरा फुलविला. या बहारदार कार्यक्रमाद्वारे रसिकांना एकाहून एक सरस हास्यकविता ऐकण्याची संधी उपलब्ध झाली. जणू काही पावसाळी वातावरणात एकप्रकारे नामवंत कवींच्या हास्य धाराच या वेळी बरसत होत्या.शतकोत्तर व.वा.वाचनालयाचा वर्धापन दिन दरवर्षी वेगवेगळ्या कार्यक्रमांची मेजवाणी घेऊन येत असतो. त्यानुसार यंदाचा वर्धापन दिन पावसाळी वातावरणात पाऊस धारांसह ‘हास्य धारा’ घेऊन आला होता. या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे आपल्या विडंबन काव्याने जळगावकर रसिकांना रामदास फुटाणे यांनी सूत्रसंचालन करून आपल्या खुमासदार आणि मिश्किल शैलीने कार्यक्रमात रंगत आणली.या कार्यक्रमात सादर होणाऱ्या प्रत्येक काव्यपंक्तींना हंशा आणि टाळ्यांचा पाऊस पडत होता. हास्य-विनोद अनुभवण्याची संधी ‘हास्य धारा’च्या माध्यमातून व.वा.वाचनालयाने जळगावकर रसिकांना उपलब्ध करून दिली होती. ही खरे म्हणजे आम्हा रसिकांसाठी पर्वणीच होती.यासोबतच दीर्घकाव्य संग्रहकार तसेच नाट्यलेखक, कवी अनिल दीक्षित (पुणे) यांनी नोटाबंदीवर सैराट चित्रपटातील झिंगाट गाण्याच्या चालीवर कविता सादर केली.ललित लेखक, कवी साहेबराव ठाणे (अहमदनगर) यांनी शेती, माती आणि ग्रामीण जीवनावरील कविता सादर करून खेड्यातले वास्तव मांडले. ज्यांच्या कविता दूरचित्रवाणीवरून राज्यभरात पोहचलेल्या असे कवी भरत दौडकर (शिक्रापूर) यांनी जमिनीच्या गुंठेवारीवरील कविता सादर केली. चित्रपट गीतकार, गझलकार, ‘जळणाराल्या विस्तव कळतो... बघणाºयाला नाही, जगणाºयाला जीवन कळते... पळणाºयाला नाही’ ही मार्मिक कविता कवी नितीन देशमुख (चांदूरबाजार) आणि कवी नारायण पुरी (तुळजापूर) या नामवंत कवींनी ‘प्रेमाचा जांगडगुत्ता’ ही विनोदी कविता सादर करून रसिकांची दाद मिळविली. अशा नामवंत कवींच्या कविता ऐकण्याचा हा आनंददायी सोहळा जळगावकर रसिकांना अनुभवता आला. नव्हे तर तो सोहळा रसिकांच्या कायम स्मृतीत राहणार आहे.-अशफाक पिंजारी, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव