शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

ठेका बंद असताना वाळू उपसा मात्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:12 IST

कोरोना कमी झाल्याने जिल्हा प्रशासन लक्ष देईल का? : गिरणा पोखरली, आता तापीही पोखरली जातेय लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव ...

कोरोना कमी झाल्याने जिल्हा प्रशासन लक्ष देईल का? : गिरणा पोखरली, आता तापीही पोखरली जातेय

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - जिल्ह्यातील वाळू ठेक्यांची मुदत ९ जून रोजी संपुष्टात आली आहे. मात्र, तरीही गिरणा, तापी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने अवैध वाळू उपस्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. मात्र, आता जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आला असतानादेखील अवैध वाळू उपसा सुरू असल्याने जिल्हा प्रशासन आता तरी या समस्येकडे लक्ष देईल का? असा प्रश्न पर्यावरणप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.

जळगाव तालुक्यातील आव्हाणे, खेडी, वडनगरी, फुपनगरी, धरणगाव तालुक्यातील आव्हाणी, बांभोरी, भोकणी या गावांमधील गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरू आहे. विशेष म्हणजे सर्व उपसा हा भरदिवसा होत असतानाही जळगाव तहसीलदार असो वा धरणगाव तालुक्यातील तहसीलदार कोणीही या अवैध उपस्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. काही पर्यावरण संस्था व गिरणा बचाव कृती समितीकडूनदेखील जिल्हा प्रशासनाला अवैध वाळू उपस्याबाबत अनेकवेळा तक्रारी करून देखील प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही.

जिल्हधिकाऱ्यांचा ॲक्शन प्लॅनवर कार्यवाही नाहीच

सप्टेंबर २०२० मध्ये आव्हाणे येथील शेतकऱ्यांनी जल सत्याग्रह केल्यानंतर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आव्हाणे व परिसरातील वाळू उपसा रोखण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार केला होता. मात्र, हा ॲक्शन प्लॅन नावालाच ठरला आहे. नदीपात्रात जाणारे रस्ते बंद करण्यात आले होते. मात्र, काही दिवसात वाळू माफियांनी रस्ते पुन्हा सुरू केले. आव्हाणे ग्रामपंचायतीला सीसीटीव्ही लावण्याचे आदेश दिले होते. मात्र, सीसीटीव्ही बसविण्यातच आलेले नाहीत. तसेच ठिकठिकाणी महसूल व पोलीस प्रशासनाच्या चौक्या उभारण्यात येणार होत्या. मात्र त्या देखील उभारण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा प्लॅन हा केवळ कागदावरच आहे.

तापी नदीही पोखरण्यास सुरुवात

आतापर्यंत वाळू माफियांकडून गिरणा नदीतूनच उपसा केला जात होता. गिरणा नदीतील वाळूला मोठी मागणी असल्याने याच नदीतून मोठ्या उपसा होत होता. मात्र, आव्हाणे, आव्हाणी या परिसरात आता खडक लागायला सुरुवात झाली आहे. तर अनेक गावांमधून उपस्याला विरोध असतो, त्यामुळे वाळू माफियांनी आपला नजरा तापी नदीकडे वळविल्या असून, विदगाव, कठोरा, किनोद, सावखेडा, भोकर या भागातून मोठ्या प्रमाणात उपसा सुरू झाला आहे. विदगावबाहेरील तापी नदीच्या पुलाखालूनदेखील उपसा वाढल्याने या पुलालादेखील धोका निर्माण झाला आहे.