शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

किती दिवस रडणार, प्रसंगाशी संघर्ष करा, जळगावात फुलबासन देवी यांचा महिलांना सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 19:05 IST

रोटरी मिडटाऊन व लोकमत सखी मंचतर्फे व्याख्यान व महिलांचा गौरव

ठळक मुद्देजळगावात माहेरी आल्या सारखे वाटतेय...११ महिलांपासून दोन लाख महिलांपर्यंतचा प्रवास

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ११ - आत्मविश्वास सर्वात महत्त्वाचा असून तोच आपल्यात नसल्याने आपण घरापुरत्या मर्यादीत राहतो. आपण हे करू शकत नाही, ते करू शकत नाही, असे म्हणत किती दिवस रडत राहणार? जीवनात संघर्ष करा, आलेल्या प्रसंगाशी लढा, असा मौलिक सल्ला महिला सक्षमीकरणाचे कार्य करणाºया छत्तीसगढ येथील फुलबासन देवी यादव अर्थात दबंग दीदी यांनी महिलांना दिला.रोटरी क्लब आॅफ जळगाव मिडटाऊन व लोकमत सखी मंच यांच्यातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त शनिवार, १० मार्च रोजी कांताई सभागृहात सायंकाळी महिलांचा गौरव व महिला सशक्तीकरण यावर व्याख्यान आयोजित केले होते, त्या वेळी फुलबासन देवी बोलत होत्या. आपल्या तब्बल ५० मिनिटांच्या व्याख्यानात त्यांनी त्यांच्या जीवनातील चढ-उताराचे गंभीर व लढ्याचे दिवस सांगून उपस्थितांना स्तब्ध केले.या वेळी आमदार सुरेश भोळे, चंदूलाल पटेल, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, ज्योती जैन, ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी, रोटरी क्लब आॅफ जळगाव मिडटाऊनच्या अध्यक्षा डॉ. अपर्णा मकासरे, सचिव डॉ. उषा शर्मा उपस्थित होते.‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा यांंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्ज्वालन करण्यात आले. संकेत वारुळकर व दर्शना वर्मा यांनी सादर केलेल्या गणेश वंदनेने कार्यक्रमास सुरुवात झाली.प्रास्ताविक मिलिंद कुलकर्णी व डॉ. अपर्णा मकासरे यांनी केले. सूत्रसंचालन सरिता खाचणे यांनी केले तर डॉ. उषा शर्मा यांनी आभार मानले.प्रेरणा गीताने दिली स्फूर्तीभारत माता की जय व जय महाराष्ट्र म्हणत फुलबासन देवी यांनी व्याख्यानास सुरुवात केली. या वेळी ‘जीवन मे कुछ करना है तो, कुछ पाना है तो मन को मारे मत बैठो...’ हे प्रेरणा गीत सादर करून सर्वांमध्ये स्फूर्ती जागविली. या गीताला उपस्थितांनी टाळ््यांची साथ देत चांगलीच दाद दिली.स्त्री अबला नाहीजीवनात काहीही करण्यासाठी एक ध्येय निश्चित करा. स्त्री ही अबला नाही, मात्र आपले मनच आपल्याला पुढे जाऊ देत नाही. त्यासाठी स्वत:मध्ये आत्मविश्वास जागवा, यश हमखास मिळेल, असा मंत्र फुलबासन देवी यांनी दिला. पैशाला महत्त्व नाही तर कर्माला महत्त्व आहे, त्यामुळे कर्म करीत,असाहीसंदेश त्यांनी दिला.बालपणाच्या कटू आठवणींनी अश्रू अनावरछत्तीसगढमधील रांजणगाव या गावी जन्म झालेल्या फुलबासन देवी यांनी बालपणी घरात सर्व भावंडे दोन ते तीन दिवस भुकेलो राहत होतो. जेवण मागितले तर सकाळी देऊ, सकाळी मागितले तर रात्री देऊ असे परिस्थितीमुळे सांगितले जात होते. त्यामुळे दोन ते तीन दिवस पोटात अन्नाचा कण नसायचा. त्या प्रसंगांनी आई-वडीलही दु:खी होत असे. मदत म्हणून मी सात वर्षांची असल्यापासून हॉटेलवर कपबशी धुण्याचे काम करू लागले. तेथे मला वाटले आपण शाळेत जायला हवे व मला शिक्षणाची प्रेरणा मिळाली. मात्र घरची परिस्थिती नसल्याने वडिलांचा होकार मिळत नव्हता.अन् स्त्री सशक्तीकरणाचा वसा घेतलावयाच्या दहाव्या वर्षीच लग्न झाले, पंधराव्या वर्षी मुलगा झाला. मात्र घरात खायला काही नसल्याने मी मुलासाठी कोणाकडे अन्न मागितले तर लोक दरवाजे लावून घेत व मुलासाठी भीक मागणारी आई आली, असे बोलले जात असे, असे सांगून फुलबासन देवी म्हणाल्या कोणतेही आई-वडील आपल्या मुलांना भुकेले पाहू शकत नाही. मात्र या कटू प्रसंगातून माझ्या आई-वडिलांसह मीदेखील गेले. हे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले व या प्रसंगाने उपस्थितांचाही कंठ दाटून आला. मुलाला खाऊ घालत शकत नसल्याचे बोलले ऐकूण मी त्याच वेळी ठरविले, जे काम माणूस करू शकतो, ते मी करणार व स्त्री सशक्तीकरणाचा वसा घेतला.११ महिलांपासून दोन लाख महिलांपर्यंतचा प्रवासस्त्री सशक्तीकरण, समाज परिवर्तन करण्याच्या कामास सुरुवात केल्यानंतर पतीनेही घरातून काढून दिले. त्या वेळी आम्ही ११ महिलांनी मिळून कामास सुरुवात केली. गावात विरोध होऊ लागला, मात्र डगमगलो नाही. कार्य सुरूच ठेवत गावात स्वच्छता, आरोग्य यासाठी काम केले व गावाचा चेहरा मोहरा बदलला. त्यामुळे गावाला हे पटले. गाव जिंकले, आता समाज जिंकायचा हे ठरवून सायकलने गावोगावचा प्रवास सुरू केला व आज १२ हजार समूह, दोन लाख महिला सोबत जोडल्या गेल्याचे देवी यांनी सांगितले. यामुळे २५० दारूचे दुकाने बंद करण्याचे महत्त्वाचे काम करून शिक्षण, स्वच्छता, आरोग्य, व्यसनमुक्ती,महिलांसाठी रोजगार निर्मिती करण्याचे काम करून महिलांना सशक्त बनवित असल्याचा यज्ञ हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले.उणे-दुणे काढण्यापेक्षा सत्कार्य कराघरात बसून कोणाचे उणे-दुणे काढण्यापेक्षा बाहेर पडा, काही तरी सत्कार्य करा व आयुष्य असे जगा की आपल्यानंतरही आपली ओळख राहिली पाहिजे, असा संदेश फुलबासन देवी यांनी शेवटी दिला.जळगावात माहेरी आल्या सारखे वाटतेय...जळगावात मिळालेले प्रेम पाहता माहेरी आल्या सारखे वाटते, असे सांगून तुम्ही केव्हाही बोलवा, मी यायला तयार आहे, असे आवाहन त्यांनी जळगावकरांना केले.रोटरी क्लब आॅफ जळगाव मिडटाऊनच्या प्रकल्प प्रमुख डॉ. सुमन लोढा यांनी परिचय करून दिला.या वेळी वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाºया कर्तृत्ववान महिला व गटांचा सन्मान करण्यात येणार आहे.सत्कारार्थी (कंसात क्षेत्र)डॉ. बबिता कमलापूरकर (आरोग्य), चेतना खिरवाडकर (व्यवस्थापन), डॉ. महिमा मिश्रा (कला), सुलभा कुलकर्णी (साहित्य), प्रणिता गायकवाड (शैक्षणिक), सरला कोळी (व्यवसाय), सुमन लोखंडे (आरोग्य), कांचन चौधरी (क्रीडा), आम्ही मैत्रिणी ग्रुप ( सामाजिक व आरोग्य), बॉक्स आॅफ हेल्प ग्रुप (सामाजिक).

टॅग्स :Jalgaonजळगाव