शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

शेतीची कामे सोडून पीक कर्जाच्या फरकासाठी पंतप्रधानाकडे कसा जाऊ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 18:22 IST

एरंडोल येथील वैतागलेल्या शेतकऱ्याचा सवाल

एरंडोल, जि.जळगाव : शेती व पीक पाणी सोडून पंतप्रधानाकडे खरंच जाऊ का? माझ्या गैरहजेरीत मला सल्ला देणारा जिल्हा बँकेचा अधिकारी माझी शेती कामे करणार काय, असा मार्र्मिक टोला येथील अन्यायग्रस्त शेतकरी मनोज मंसाराम महाजन यांनी केला आहे.मनोज यांचा काकासह एकत्र परिवार आहे. जवळपास १० ते १२ एकर कोरडवाहू शेती आहे. मला मंजूर कर्जाची रक्कम पाच हजाराने कमी मिळाली, पण २०१८ मध्ये मला व्याजासह पूर्ण पैसे भरावे लागले. ही शासन व प्रशासनाने माझी क्रूर थट्टा केली आहे, अशी व्यथा मनोज महाजन याने व्यक्त केली आहे.महिना-दोन महिन्यात तुमच्या खात्यावर पाच हजार रुपये जमा होतील, असे आश्वासन वेळोवेळी देऊन जिल्हा बँकेने वाटाण्याच्या अक्षदा लावल्या. जवळपास दीड वर्षे लोटले तरी मला न्याय मिळाला नाही म्हणून माझ्या सहनशिलतेची मर्यादा संपली व मी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचे ठरविले. एका बाजुला नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्येच्या अनेक घटना राज्यभरात घडल्या आहेत. आता पीक कर्जासाठी शेतकरी आत्महत्येची पुनरावृत्ती होईल का, शेती सोडून शेतकºयांनी पंतप्रधानांचा दरवाजा ठोठावा का? यासारखे विविध प्रश्न मला भेडसावत आहेत, अशी खंत महाजन याने बोलून दाखवली.मनोज हा मोठा माळी वाड्यात राहत आहे. संपूर्ण परिवाराचे पालन पोषण शेतीवर अवलंबून आहे, अशी माहिती मिळाली.दरम्यान, एरंडोल येथे ८० ते ९० शेतकºयांना किमान पाच हजार व कमाल १५ ते २० हजारापर्यंत कमी रक्कम मंजूर कर्जापेक्षा मिळाली असून त्यांच्यावरील अन्याय केव्हा दूर होईल याची प्रतिक्षा आहे, अशी माहिती महाजन याने दिली.मांजरेच्या गळ्यात घंटा बांधण्यासाठी मी पुढे आलो. बंधू या मला न्याय कधी मिळणार? अन्यथा एखादे दिवशी मी नक्कीच पी.एम.ओ. कार्यालयात दाखल होईल. प्रश्न पैशाचा नसून व्यवहाराचा व न्याय-अन्यायाचा आहे, असेही महाजन यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :FarmerशेतकरीErandolएरंडोल