शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
4
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
5
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
6
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
9
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
10
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
11
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
12
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
13
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
14
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
15
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
16
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
17
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
18
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
19
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
20
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

मोठे मासेच कसे सुटतात ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 19:35 IST

रोज मरे त्याला कोण रडे अशी स्थिती

हितेंद्र काळुंखेजळगाव : जिल्हा परिषदेत पोषण आहार प्रकरण सातत्याने गाजत आहे. मात्र त्याचे सोयरेसुतक कोणालाही आता वाटेनासे होवू लागले आहे. रोज मरे त्याला कोण रडे अशी स्थिती या प्रकरणांची झाली आहे. लहान मुलांच्या आरोग्याचा जेथे प्रश्न आहे, अशा शालेय पोषण आहाराबाबतही तक्रारी आणि घोटाळे दर महिन्याला नव्याने पुढे येत आहेत. मात्र यातून हाती काहीच लागत नाही असेच दिसून येत आहे. काही ठिकाणी पुरवठादारांचा हलगर्जीपणा तर काही ठिकाणी स्थानिक पातळीवर हलगर्जीपणा तर काही वेळेसे भ्रष्टाचार यामुळे मुलांच्या जीवाशी खेळ होत आहे. असे प्रकार नेहमीच घडत आहे. एका प्रकरणास क्लीननिट मिळाली की, दुसरे प्रकरण पुढे येते त्यालाही क्लिनचिट मिळते. असे आता वारंवार होवू लागले आहे. यामुळे तक्रारकर्त्यांचा जोशही आता कमी होवू लागला आहे. तर अधिकाºयांना तक्रारींची सवय होवून बसली. यामुळे अशा तक्रारींकडे आता केवळ सोपस्काराच्या दृष्टीतून पाहिले जात आहे. गेल्या दीड दोन वर्षापूर्वी पोषण आहाराच्या तांदुळाचा विषय गाजला असताना पुन्हा एक दोन प्रकरणं गाजली आणि आता दोन महिन्यांपूर्वीच बुरशीयुक्त शेवयांचे प्रकरण गाजले. यानंतर आसोदा येथे पोषण आहार खाल्ल्याने तिघांना विषबाधा झाल्याची तक्रार गेल्या चार- पाच दिवसात आली होती. यातही काहीच हाती लागले नाही. तर आता काल परवाच भुसावळ तालुक्यातील वांजोळा येथे पोषण आहारत किडे आणि गोम आढळली. या प्रकरणात प्रथमदर्शनी आहार चांगला आहे, असे आढळले तर आहाराची पाकिटे योग्यरित्या ठेवली नाहीत म्हणून अंगणवाडी सेविकेस जबाबदार धरले आहे. याची चौकशी होईल. झालीच तर अंगणवाडी सेविकेवर कारवाई देखील होईल परंतु जेथे मोठे मासे अडकण्याची शक्यता वर्तविली जाते तेथे मात्र नेहमीच ते सहीसलामत सुटतात आणि झालीच कारवाई तर लहान घटकांवर होते, मात्र असेच का घडते? याचाही विचार होणे गरजेचे आहे.
टॅग्स :zpजिल्हा परिषदJalgaonजळगाव