शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मोठे मासेच कसे सुटतात ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 19:35 IST

रोज मरे त्याला कोण रडे अशी स्थिती

हितेंद्र काळुंखेजळगाव : जिल्हा परिषदेत पोषण आहार प्रकरण सातत्याने गाजत आहे. मात्र त्याचे सोयरेसुतक कोणालाही आता वाटेनासे होवू लागले आहे. रोज मरे त्याला कोण रडे अशी स्थिती या प्रकरणांची झाली आहे. लहान मुलांच्या आरोग्याचा जेथे प्रश्न आहे, अशा शालेय पोषण आहाराबाबतही तक्रारी आणि घोटाळे दर महिन्याला नव्याने पुढे येत आहेत. मात्र यातून हाती काहीच लागत नाही असेच दिसून येत आहे. काही ठिकाणी पुरवठादारांचा हलगर्जीपणा तर काही ठिकाणी स्थानिक पातळीवर हलगर्जीपणा तर काही वेळेसे भ्रष्टाचार यामुळे मुलांच्या जीवाशी खेळ होत आहे. असे प्रकार नेहमीच घडत आहे. एका प्रकरणास क्लीननिट मिळाली की, दुसरे प्रकरण पुढे येते त्यालाही क्लिनचिट मिळते. असे आता वारंवार होवू लागले आहे. यामुळे तक्रारकर्त्यांचा जोशही आता कमी होवू लागला आहे. तर अधिकाºयांना तक्रारींची सवय होवून बसली. यामुळे अशा तक्रारींकडे आता केवळ सोपस्काराच्या दृष्टीतून पाहिले जात आहे. गेल्या दीड दोन वर्षापूर्वी पोषण आहाराच्या तांदुळाचा विषय गाजला असताना पुन्हा एक दोन प्रकरणं गाजली आणि आता दोन महिन्यांपूर्वीच बुरशीयुक्त शेवयांचे प्रकरण गाजले. यानंतर आसोदा येथे पोषण आहार खाल्ल्याने तिघांना विषबाधा झाल्याची तक्रार गेल्या चार- पाच दिवसात आली होती. यातही काहीच हाती लागले नाही. तर आता काल परवाच भुसावळ तालुक्यातील वांजोळा येथे पोषण आहारत किडे आणि गोम आढळली. या प्रकरणात प्रथमदर्शनी आहार चांगला आहे, असे आढळले तर आहाराची पाकिटे योग्यरित्या ठेवली नाहीत म्हणून अंगणवाडी सेविकेस जबाबदार धरले आहे. याची चौकशी होईल. झालीच तर अंगणवाडी सेविकेवर कारवाई देखील होईल परंतु जेथे मोठे मासे अडकण्याची शक्यता वर्तविली जाते तेथे मात्र नेहमीच ते सहीसलामत सुटतात आणि झालीच कारवाई तर लहान घटकांवर होते, मात्र असेच का घडते? याचाही विचार होणे गरजेचे आहे.
टॅग्स :zpजिल्हा परिषदJalgaonजळगाव