शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

अन् आदिवासी विद्यार्थ्यांची घरवापसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 23:02 IST

सागर दुबे जळगाव : नंदुरबार तसेच धुळे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थीनी जळगाव शहरात शिक्षणासाठी येतात. मात्र, यंदा अनेक ...

ठळक मुद्दे वसतिगृह प्रशासन व यावल प्रकल्प अधिकारी यांचा भोंगळ विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान

सागर दुबे

जळगाव : नंदुरबार तसेच धुळे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थीनी जळगाव शहरात शिक्षणासाठी येतात. मात्र, यंदा अनेक आदिवासी विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रशासन व यावल प्रकल्प अधिकारी यांच्या भोंगळ कारभारामुळे वसतिगृह प्रवेशापासून वंचित रहावे लागले़ यामुळे त्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील प्रवेश रद्द करून अखेर घर परतीचा मार्ग अवलंबला,  अर्ध्यातूनच शिक्षण सोडावे लागल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाल्यामुळे याला जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित होते आहे.

शहरातील खोटेनगर, शिवकॉलनी तसेच टाकरखेडा रस्त्यावर राज्य शासनाचे आदिवासी मुला-मुलींचे वसतिगृह आहे़ टाकरखेडा रस्त्यावरील वसतिगृहात पाचशे विद्यार्थ्यांची क्षमता आहे़ मात्र, त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतेचा अभाव आहे़ दुसरीकडे शिवकॉलनी परिसरातील वसतिगृहात १२० जणांची क्षमता असताना फक्त ८० विद्यार्थ्यांनाच या ठिकाणी प्रवेश दिला जातो. त्यामुळे ४० विद्यार्थ्यांना भाड्याने रहावे लागते़ यावर्षी शासनाकडून वसतिगृह प्रवेश संकेस्थळ सप्टेंबर महिन्यातच बंद करण्यात आले़ अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्जच करता आले नाही. विशेष म्हणजे, ज्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू होती, त्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेतून काढता पाय घेतला. ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी पंडित दिनदयाल स्वयंम योजना आहे, पण दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांना योजनेचे पैसेच न मिळाल्यामुळे अनेकांना भाड्याच्या खोली सुध्दा सोडण्याची वेळ शासनामुळे आली़ एकंदरीत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी एकीकडे शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत असल्याचा गाजावाजा केला जातो. प्रत्यक्षात असे काहीही होताना दिसून येत नाही. 

टॅग्स :JalgaonजळगावEducationशिक्षण