शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

घराची आस... सायकलवर १४०० किमी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 12:38 IST

कोरोना इफेक्ट : कल्याण ते अलाहाबाद गाठण्यासाठी रोज ७० ते ८० किमी प्रवास, सायकलवर निघाल्यानंतर वाहने सुरू

आनंद सुरवाडे ।जळगाव : लॉकडाऊनचा मजुरांच्या जीवनावर मोठा विपरित परिणाम झाला आहे़ घरासाठी काहींना हजारो किमीची पायपीट करावी लागते तर घराच्या ओढीने तहान- भूक विसरून या मंडळींनी सायकलीने जीवघेणा प्रवास सुरु केला आहे. याचाच प्रत्यय शुक्रवारी महामार्गावर आला़ कल्याण येथील २९ मजूर अलाहाबाद येथे जाण्यासाठी चक्क सायकलवर निघाले आहेत. तब्बल १४०० किमीचे हे अंतर कापण्याचा निर्धार केला आहे.शुक्रवारी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास हे मजूर मानराजपार्क जवळ एका सावलीत विश्रांतीसाठी बसले होते़ यावेळी ‘लोकमत’ने त्यांच्याश्ी संवाद साधल्यानंतर लॉकडाऊन व त्यानंतर त्यांच्या आयुष्यावर झालेल्या परिणामाचे भयानक वास्तव समोर आले़ यातील बरेच तरूण, प्रौढ हे कल्याण व उल्हासनगर येथे वास्तव्यास आहेत. कोणी शिलाईचे काम करीत होते़ कोणी पाईपाच्या कंपनीत होते़ काहींचे छोटे दुकान होते़ सायकलवरच आपले साहित्य बांधून काहींजवळ पाण्याच्या बाटल्या देऊन त्यांनी घराचा मार्ग धरला आहे़- आम्ही सायकलवरून निघून आलो तेव्हा ट्रक सुरू झाल्या़ त्यामुळे आम्हाला सायकलशिवाय पर्याय नव्हता़ बरेच लोक ट्रकमधून घरी परतत आहे़ ज्यांचे उद्योगावर पोट आहे ते केवळ परततील अन्य बरेच लोक परत इकडे येणार नाहीत, असेही काही मजुरांनी सांगितले़काहींच्या जुन्या काहींच्या नव्या सायकलीघरी जाण्यासाठी दुसरा पर्याय नसल्याने आपल्याजवळ असलेल्या जुन्या सायकली काहींनी काढल्या व थेट ५ मे पासून कल्याणहून अलाहाबादचा मार्ग धरला़ पाच मे पासून निघाल्यानंतर ८ मेच्या दुपारी हे मजूर भर उन्हातही प्रवास करीत होते़ त्यानंतर काही वेळ ते जळगावात थांबले़ अजून आठ दिवस प्रवास करून १४०० किमीचे अंतर पार करणार असल्याचे त्यांनी सांगितले़ रोज किमान ७० ते ८० किमीचा प्रवास ते करीत आहेत. रस्त्यात ठिकठिकाणी भोजन व पाण्याची व्यवस्था होत असल्याचेही त्यांनी सांगितले़ निघण्यापूर्वी खबरदारी म्हणून सर्वांनी आरोग्य तपासणी करुन घेतली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJalgaonजळगाव