शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

घराची आस... सायकलवर १४०० किमी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 12:38 IST

कोरोना इफेक्ट : कल्याण ते अलाहाबाद गाठण्यासाठी रोज ७० ते ८० किमी प्रवास, सायकलवर निघाल्यानंतर वाहने सुरू

आनंद सुरवाडे ।जळगाव : लॉकडाऊनचा मजुरांच्या जीवनावर मोठा विपरित परिणाम झाला आहे़ घरासाठी काहींना हजारो किमीची पायपीट करावी लागते तर घराच्या ओढीने तहान- भूक विसरून या मंडळींनी सायकलीने जीवघेणा प्रवास सुरु केला आहे. याचाच प्रत्यय शुक्रवारी महामार्गावर आला़ कल्याण येथील २९ मजूर अलाहाबाद येथे जाण्यासाठी चक्क सायकलवर निघाले आहेत. तब्बल १४०० किमीचे हे अंतर कापण्याचा निर्धार केला आहे.शुक्रवारी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास हे मजूर मानराजपार्क जवळ एका सावलीत विश्रांतीसाठी बसले होते़ यावेळी ‘लोकमत’ने त्यांच्याश्ी संवाद साधल्यानंतर लॉकडाऊन व त्यानंतर त्यांच्या आयुष्यावर झालेल्या परिणामाचे भयानक वास्तव समोर आले़ यातील बरेच तरूण, प्रौढ हे कल्याण व उल्हासनगर येथे वास्तव्यास आहेत. कोणी शिलाईचे काम करीत होते़ कोणी पाईपाच्या कंपनीत होते़ काहींचे छोटे दुकान होते़ सायकलवरच आपले साहित्य बांधून काहींजवळ पाण्याच्या बाटल्या देऊन त्यांनी घराचा मार्ग धरला आहे़- आम्ही सायकलवरून निघून आलो तेव्हा ट्रक सुरू झाल्या़ त्यामुळे आम्हाला सायकलशिवाय पर्याय नव्हता़ बरेच लोक ट्रकमधून घरी परतत आहे़ ज्यांचे उद्योगावर पोट आहे ते केवळ परततील अन्य बरेच लोक परत इकडे येणार नाहीत, असेही काही मजुरांनी सांगितले़काहींच्या जुन्या काहींच्या नव्या सायकलीघरी जाण्यासाठी दुसरा पर्याय नसल्याने आपल्याजवळ असलेल्या जुन्या सायकली काहींनी काढल्या व थेट ५ मे पासून कल्याणहून अलाहाबादचा मार्ग धरला़ पाच मे पासून निघाल्यानंतर ८ मेच्या दुपारी हे मजूर भर उन्हातही प्रवास करीत होते़ त्यानंतर काही वेळ ते जळगावात थांबले़ अजून आठ दिवस प्रवास करून १४०० किमीचे अंतर पार करणार असल्याचे त्यांनी सांगितले़ रोज किमान ७० ते ८० किमीचा प्रवास ते करीत आहेत. रस्त्यात ठिकठिकाणी भोजन व पाण्याची व्यवस्था होत असल्याचेही त्यांनी सांगितले़ निघण्यापूर्वी खबरदारी म्हणून सर्वांनी आरोग्य तपासणी करुन घेतली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJalgaonजळगाव