शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे पाकिस्तान करतोय बॉम्बिंग, इकडे भारतानं अफगाणिस्तानला पाठवली मोठी मदद; तालिबान सरकार खुश
2
मनमोहनसिंग सरकारमधील कोळसामंत्री श्रीप्रकाश जायसवाल यांचे निधन, कानपूरमधून तीन वेळा झाले होते खासदार
3
डीके शिवकुमार यांच्या आमदारांशी गाठीभेटी; उद्या सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसोबत ब्रेकफास्ट करणार...
4
११ जहाल नलक्षवाद्यांचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण; हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षल चळवळीला हादरा
5
कांदा निर्यात धडाम...! केंद्राचे धोरण आड आले;  बांगलादेश, सौदी अरब सारख्या देशांनी फिरवली पाठ
6
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
7
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
8
५ राजयोगात १४१ दिवसांनी शनि मार्गी: ९ राशींचे कल्याण, सुख-समृद्धीचे वरदान; सौभाग्य-यश-लाभ!
9
“काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर?
10
Ayush Mhatre Century : षटकार-चौकारांची 'बरसात'; आयुष म्हात्रेचा २०० च्या स्ट्राइक रेटसह शतकी धमका!
11
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
12
SMAT 2025: अर्जुन तेंडुलकरची हवा! पहिल्या स्पेलमध्ये ५ धावांत २ विकेट्स घेत लुटली मैफील
13
सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
14
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
15
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
16
धक्कादायक! अनियंत्रित कार तलावात कोसळली, चालक बेशुद्ध पडला, नाविक देवदूत बनून आला
17
नेपाळने भारताला डिवचले; 100 रुपयांच्या नवीन नोटेवर भारताचा भूभाग आपला दाखवला
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ २ दिवसांत सुटली; लग्नानंतर नवरदेवाचा बाथरुममध्ये संशयास्पद मृत्यू
19
चीनच्या शेजारी देशाने प्रचंड सोने घेतले; एवढे महाग असले तरी..., जगातील सर्वात मोठा खरेदीदार ठरला
20
भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद वाढली, दुसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी ८.२% वाढला
Daily Top 2Weekly Top 5

सुक्या नदीवरील पुलाला पडले छिद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:18 IST

सावदा : खान्देशची जीवनरेखा म्हणून ओळख असलेल्या बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील सावदा येथून जवळच असलेल्या सुक्या नदीवर असलेल्या पुलावर लहान-मोठी ...

सावदा : खान्देशची जीवनरेखा म्हणून ओळख असलेल्या बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील सावदा येथून जवळच असलेल्या सुक्या नदीवर असलेल्या पुलावर लहान-मोठी छिद्रे; तसेच खड्डे पडले आहेत. यामुळे हा पूल अत्यंत धोकादायक बनला असून वाहनधारकांना जीव मुठीत घालून प्रवास करावा लागत आहे. या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेविषयी प्रश्न निर्माण झाला असल्याने सावदा सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या तीन राज्यांना जोडणारा प्रमुख म्हणून या महामार्गाची ओळख आहे. रावेर व बऱ्हाणपूर येथून भुसावळ, जळगाव व पुढे जाण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा महामार्ग आहे. या पुलावरून केळीने व अन्य सामग्रीने भरलेल्या अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात रहदारी आहे. पुलाची अतिशय दुर्दशा झाली आहे. याकडे मात्र वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. पुलाच्या दुरवस्थेमुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पुलावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुरूम टाकण्याचा प्रताप केला जात आहे. केळीने भरलेल्या ट्रक या ठिकाणाहून प्रवास करत असताना लहान-मोठे मुरुमाचे दगड उडत असतात. त्यामुळे प्रवाशांना इजा होण्याची शक्यता आहे. पुलावर पडलेल्या छिद्रांचे रूपांतर मोठ्या भगदाडात झाल्यावर एखादी दुर्घटना घडल्यानंतरच सार्वजनिक बांधकाम विभागाचे डोळे उघडतील का? असा संतप्त सवाल, आता परिसरातील नागरिक विचारू लागले आहेत.

पुलावर गवत व माती

या पुलावर दुतर्फा माती गोळा झाली असून, पावसाळ्यात या मातीवर मोठ्या प्रमाणात गवतही उगले आहे. पुलावर दुतर्फा माती साचल्याने पावसाळ्यातील पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळेच पुलावर मोठ-मोठे खड्डे पडत असतात.

केळीमुळे मोठी वाहतूक

रावेर तालुक्यातील सावदा शहराला केळीमुळे संपूर्ण देशात ओळख असून, तालुक्याच्या पूर्व भागातील व शेजारील मध्य प्रदेश राज्यात केळी निर्यातीसाठी शहरातून नेली जात असते. या पुलावरून केळीची शेकडो अवजड वाहने ये-जा करीत असतात. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी देखील या पुलाची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे.

काही वर्षांपूर्वी महाड तालुक्यातील सावित्री नदीवरील पूल खचल्याने मोठी जीवितहानी झाली होती. या पुलाकडे देखील दुर्लक्ष केल्यास सावित्री नदीवरील पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे, असे बोलले जात आहे.