शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

सुक्या नदीवरील पुलाला पडले छिद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:18 IST

सावदा : खान्देशची जीवनरेखा म्हणून ओळख असलेल्या बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील सावदा येथून जवळच असलेल्या सुक्या नदीवर असलेल्या पुलावर लहान-मोठी ...

सावदा : खान्देशची जीवनरेखा म्हणून ओळख असलेल्या बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील सावदा येथून जवळच असलेल्या सुक्या नदीवर असलेल्या पुलावर लहान-मोठी छिद्रे; तसेच खड्डे पडले आहेत. यामुळे हा पूल अत्यंत धोकादायक बनला असून वाहनधारकांना जीव मुठीत घालून प्रवास करावा लागत आहे. या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेविषयी प्रश्न निर्माण झाला असल्याने सावदा सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या तीन राज्यांना जोडणारा प्रमुख म्हणून या महामार्गाची ओळख आहे. रावेर व बऱ्हाणपूर येथून भुसावळ, जळगाव व पुढे जाण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा महामार्ग आहे. या पुलावरून केळीने व अन्य सामग्रीने भरलेल्या अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात रहदारी आहे. पुलाची अतिशय दुर्दशा झाली आहे. याकडे मात्र वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. पुलाच्या दुरवस्थेमुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पुलावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुरूम टाकण्याचा प्रताप केला जात आहे. केळीने भरलेल्या ट्रक या ठिकाणाहून प्रवास करत असताना लहान-मोठे मुरुमाचे दगड उडत असतात. त्यामुळे प्रवाशांना इजा होण्याची शक्यता आहे. पुलावर पडलेल्या छिद्रांचे रूपांतर मोठ्या भगदाडात झाल्यावर एखादी दुर्घटना घडल्यानंतरच सार्वजनिक बांधकाम विभागाचे डोळे उघडतील का? असा संतप्त सवाल, आता परिसरातील नागरिक विचारू लागले आहेत.

पुलावर गवत व माती

या पुलावर दुतर्फा माती गोळा झाली असून, पावसाळ्यात या मातीवर मोठ्या प्रमाणात गवतही उगले आहे. पुलावर दुतर्फा माती साचल्याने पावसाळ्यातील पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळेच पुलावर मोठ-मोठे खड्डे पडत असतात.

केळीमुळे मोठी वाहतूक

रावेर तालुक्यातील सावदा शहराला केळीमुळे संपूर्ण देशात ओळख असून, तालुक्याच्या पूर्व भागातील व शेजारील मध्य प्रदेश राज्यात केळी निर्यातीसाठी शहरातून नेली जात असते. या पुलावरून केळीची शेकडो अवजड वाहने ये-जा करीत असतात. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी देखील या पुलाची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे.

काही वर्षांपूर्वी महाड तालुक्यातील सावित्री नदीवरील पूल खचल्याने मोठी जीवितहानी झाली होती. या पुलाकडे देखील दुर्लक्ष केल्यास सावित्री नदीवरील पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे, असे बोलले जात आहे.