शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

सुरेशदादा जैन चालवताय वडील भिकमचंद जैन यांचा वारसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 12:29 IST

-विकास पाटील सुरेशदादा यांच्या बालपणापासूनच घरात राजकीय वातावरण होते. राजकारणाच्या माध्यमातून वडिल स्व.भिकमचंद जैन हे जनसेवा करीत होते. जळगावकरांच्या ...

-विकास पाटीलसुरेशदादा यांच्या बालपणापासूनच घरात राजकीय वातावरण होते. राजकारणाच्या माध्यमातून वडिल स्व.भिकमचंद जैन हे जनसेवा करीत होते. जळगावकरांच्या प्रेमापोटी ३० वर्षे ते नगराध्यक्ष होते. लहानपणापासून वडिलांचे कार्य मी अनुभवत होतो. मात्र माझी राजकारणात येण्याची सुरुवातीला इच्छा नव्हती. त्याऐवजी व्यवसाय करावा अशी इच्छा होती. खान्देश मील त्यावेळी सुरु होती. मात्र कुटुंबातील एका सदस्याने राजकारणात आले पाहिजे, असा विचारपुढे आला. मी राजकारणात यावे, अशी कुटुंबीयांची इच्छा होती. त्यानुसार पुढे राजकारणात आलो व त्यामाध्यमातून सेवेचे अखंड कार्य आजही सुरु आहे, सुरेशदादा जैन सांगत होते.१९७७ मध्ये विधानसभेची निवडणूक जाहीर झाली. ही निवडणूक मी लढवावी, अशी इच्छा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा यांनी व्यक्त केली. मात्र त्यावेळी ईश्वरलाल जैन यांना उमेदवारी देण्याचे एकमताने आम्ही ठरविले व ते काँग्रेसतर्फे निवडून आले. त्यानंतर ते काँग्रेसमधून बाहेर पडल्याने ही जागा रिक्त झाली. १९८० मध्ये पुन्हा निवडणूक लागली.१९८० पर्यंत मी पूर्णवेळ व्यवसायात होतो. १९८० ला विधानसभेची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला व राजकारणात आलो. व्यवसायाची धुरा भाऊ रमेशदादा जैन यांच्याकडे सोपविली. १९८० ला आमदार म्हणून निवडून आलो. सुरुवातीला फक्त १५ वर्षे राजकारण करण्याचे ठरविले होते. मात्र प्रत्येक पाच वर्षानंतर झालेल्या निवडणूक लढविण्याचा आग्रह झाला, मतदारांचे प्रेम मिळत गेले व मी जनसेवा सुरु ठेवली. आज ४० वर्षे झाली. जनतेचे प्रेम कायम आहे. ९ वेळा आमदार म्हणून निवडून आलो. वडिलांचा राजकारणाचा वारसा पुढे नेण्याचा मी प्रयत्न केला. त्यात जनतेसह कुटुंबीयांचीही समर्थपणे साथ मिळाली. त्यांचे ऋण मी आयुष्यभर फेडू शकणार नाही. जोपर्यंत आरोग्याची साथ मला मिळेल तोपर्यंत जनसेवेचा हा अखंड यज्ञ सुरुच राहिल, यात माझ्या मनात कोणतीही शंका नाही.पत्नी रत्ना, मुलगा राजेश, शैलेंद्र व मुलगी मिनाक्षी यांची आयुष्याच्या प्रत्येकवडिल स्व.भिकमचंद जैन हे ३० वर्षे जळगावचे नगराध्यक्ष होते. त्यांच्या इच्छेनुसार मी राजकारणात आलो. सुरुवातीला फक्त १५ वर्षे राजकारण करण्याचे ठरविले मात्र जनतेच्या प्रेमापोटी ४० वर्षांपासून राजकारणाच्या माध्यमातून जनतेची सेवा करीत आहे. वडिलांचा हा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.टप्प्यावर साथ मिळाली व आजही ती मिळत आहे. राजेश, शैलेंद्र हे व्यवसाय सांभाळत असून मिनाक्षी या एसडी-सीडच्या माध्यमातून कार्य करीत असून मी आनंदी व समाधानी आहे.माझ्या आयुष्यात ‘लोकमत’चा वाटा मोठा आहे. एक निर्भिड, निस्पृह वृत्तपत्र म्हणून ‘लोकमत’ची ओळख आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न, अडीअडचणी, व्यथा मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य ‘लोकमत’ करीत असतो. ‘लोकमत’ची अशीच भरभराट होवो, या शुभेच्छा.-सुरेशदादा जैन, माजी मंत्री.

टॅग्स :Jalgaonजळगाव