शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
3
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
4
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
5
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
6
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
7
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
8
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
9
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
10
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
11
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
12
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
13
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
14
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
15
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
16
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
17
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
18
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
19
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
20
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...

सुरेशदादा जैन चालवताय वडील भिकमचंद जैन यांचा वारसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 12:29 IST

-विकास पाटील सुरेशदादा यांच्या बालपणापासूनच घरात राजकीय वातावरण होते. राजकारणाच्या माध्यमातून वडिल स्व.भिकमचंद जैन हे जनसेवा करीत होते. जळगावकरांच्या ...

-विकास पाटीलसुरेशदादा यांच्या बालपणापासूनच घरात राजकीय वातावरण होते. राजकारणाच्या माध्यमातून वडिल स्व.भिकमचंद जैन हे जनसेवा करीत होते. जळगावकरांच्या प्रेमापोटी ३० वर्षे ते नगराध्यक्ष होते. लहानपणापासून वडिलांचे कार्य मी अनुभवत होतो. मात्र माझी राजकारणात येण्याची सुरुवातीला इच्छा नव्हती. त्याऐवजी व्यवसाय करावा अशी इच्छा होती. खान्देश मील त्यावेळी सुरु होती. मात्र कुटुंबातील एका सदस्याने राजकारणात आले पाहिजे, असा विचारपुढे आला. मी राजकारणात यावे, अशी कुटुंबीयांची इच्छा होती. त्यानुसार पुढे राजकारणात आलो व त्यामाध्यमातून सेवेचे अखंड कार्य आजही सुरु आहे, सुरेशदादा जैन सांगत होते.१९७७ मध्ये विधानसभेची निवडणूक जाहीर झाली. ही निवडणूक मी लढवावी, अशी इच्छा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा यांनी व्यक्त केली. मात्र त्यावेळी ईश्वरलाल जैन यांना उमेदवारी देण्याचे एकमताने आम्ही ठरविले व ते काँग्रेसतर्फे निवडून आले. त्यानंतर ते काँग्रेसमधून बाहेर पडल्याने ही जागा रिक्त झाली. १९८० मध्ये पुन्हा निवडणूक लागली.१९८० पर्यंत मी पूर्णवेळ व्यवसायात होतो. १९८० ला विधानसभेची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला व राजकारणात आलो. व्यवसायाची धुरा भाऊ रमेशदादा जैन यांच्याकडे सोपविली. १९८० ला आमदार म्हणून निवडून आलो. सुरुवातीला फक्त १५ वर्षे राजकारण करण्याचे ठरविले होते. मात्र प्रत्येक पाच वर्षानंतर झालेल्या निवडणूक लढविण्याचा आग्रह झाला, मतदारांचे प्रेम मिळत गेले व मी जनसेवा सुरु ठेवली. आज ४० वर्षे झाली. जनतेचे प्रेम कायम आहे. ९ वेळा आमदार म्हणून निवडून आलो. वडिलांचा राजकारणाचा वारसा पुढे नेण्याचा मी प्रयत्न केला. त्यात जनतेसह कुटुंबीयांचीही समर्थपणे साथ मिळाली. त्यांचे ऋण मी आयुष्यभर फेडू शकणार नाही. जोपर्यंत आरोग्याची साथ मला मिळेल तोपर्यंत जनसेवेचा हा अखंड यज्ञ सुरुच राहिल, यात माझ्या मनात कोणतीही शंका नाही.पत्नी रत्ना, मुलगा राजेश, शैलेंद्र व मुलगी मिनाक्षी यांची आयुष्याच्या प्रत्येकवडिल स्व.भिकमचंद जैन हे ३० वर्षे जळगावचे नगराध्यक्ष होते. त्यांच्या इच्छेनुसार मी राजकारणात आलो. सुरुवातीला फक्त १५ वर्षे राजकारण करण्याचे ठरविले मात्र जनतेच्या प्रेमापोटी ४० वर्षांपासून राजकारणाच्या माध्यमातून जनतेची सेवा करीत आहे. वडिलांचा हा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.टप्प्यावर साथ मिळाली व आजही ती मिळत आहे. राजेश, शैलेंद्र हे व्यवसाय सांभाळत असून मिनाक्षी या एसडी-सीडच्या माध्यमातून कार्य करीत असून मी आनंदी व समाधानी आहे.माझ्या आयुष्यात ‘लोकमत’चा वाटा मोठा आहे. एक निर्भिड, निस्पृह वृत्तपत्र म्हणून ‘लोकमत’ची ओळख आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न, अडीअडचणी, व्यथा मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य ‘लोकमत’ करीत असतो. ‘लोकमत’ची अशीच भरभराट होवो, या शुभेच्छा.-सुरेशदादा जैन, माजी मंत्री.

टॅग्स :Jalgaonजळगाव