शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
4
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
5
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
6
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टूक बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
7
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
8
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
9
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
10
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
11
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
12
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
13
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
14
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
15
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
16
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!
17
Viral Video: हत्तीला पाहून सिंह मंडळींची 'हवा टाइट'... झाडाखाली बसले असताना काय घडलं, पाहा
18
थेट मंत्र्यांच्या ताफ्यालाच पाठलाग करून अडवले, वादावादी, कारची तोडफोड करण्याचा प्रयत्न, कारण काय?
19
Powai Hostage: रोहित आर्या प्रकरणातील नवी माहिती, मुलांसोबत ऑडिशनसाठी गेलेले पालक म्हणाले...
20
Abhishek Sharma Record Breaking Fifty : जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं अभिषेक शर्माची विक्रमी खेळी

जळगावकरांच्या अंत:करणात सुरेशदादा जैन यांचे नाव अमृतासारखे - बाबा महाराज सातारकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 12:51 IST

सुरेशदादा जैन यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कीर्तन सोहळ््यात गौरवोद्गार

ठळक मुद्देपावलींनी वेधले लक्ष‘जय जय रामकृष्ण’ ते ‘ज्ञानेश्वर माऊली तुकाराम’ पर्यंत सर्व तल्लीनअडाण्यांचा संप्रदाय समजू नये

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. ८ - सुरेशदादा जैन यांचा अमृतमहोत्सव हा अमृतच आहे. माणसे येतात अन् जातात मात्र त्यांनी केलेले कार्य अमृत असते, ते कधीही संपत नाही. त्याप्रमाणे जळगावकरांच्या अंत:करणात सुरेशदादांचे नाव अमृतासारखे आहे, असे गौरवोद्गार ख्यातनाम कीर्तनकार ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांनी आज काढले.माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एल. के. फाउंडेशनतर्फे बाबा महाराज सातारकर यांच्या कीर्तन सोहळ्याचा कार्यक्रम ७ ते ११ फेब्रुवारी दरम्यान रोज सायंकाळी ६.३० ते रात्री ८.३० या वेळात शिवतीर्थ मैदानावर आयोजित केला आहे. त्यास बुधवारी संध्याकाळी सुरुवात झाली. त्यावेळी ते बोलत होते.या वेळी माजी मंत्री सुरेशदादा जैन, महापौर ललित कोल्हे, ज्येष्ठ नगरसेवक विजय कोल्हे, माजी महापौर सिंधूताई कोल्हे, ज्योती कोल्हे, मीनल कोल्हे आदी उपस्थित होते.दादांना अमृताची भेटप्रास्ताविक ललित कोल्हे यांनी केले. या वेळी ते म्हणाले की, सुरेशदादा जैन यांचे बोट धरून राजकारणात आलो. त्यामुळे त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांना काय भेट द्यावी, असा विचार केला. ‘अमृताहुनी गोड नाव तुझे देवा’, असे मी ऐकले होते. त्यामुळे दादांना अमृत द्यावे असा विचार केला व या कीर्तन सोहळ््याचे आयोजन केल्याचे ललित कोल्हे यांनी सांगितले. सूत्रसंचालन शंभू पाटील यांनी केले.दादांचे आणि माझे नाते अमृतासारखेजळगावकरांच्या अंतकरणात सुरेशदादांचे नाव अमृतासारखे आहे, तशाच प्रकारचे त्यांचे व माझे नाते असल्याचे बाबा महाराज सातारकर म्हणाले. अनेक माणसे येतात जातात मात्र यात दादांचा आणि माझा केवळ नात्याचा संबंध नाही तर जिव्हाळ््याचा संबंध असल्याचे त्यांनी सांगून वाहत्या पाण्यासह विहिरीचे, नदीचे पाणी आटते, मात्र जिव्हाळ््याचे पाणी आटत नाही, असेही बाबा महाराज म्हणाले.‘नाथ’ विषयावर कीर्तन सोहळाबाबा महाराज सातारकर म्हणाले, खान्देशात दरवर्षी वेगवेगळ््या ठिकाणी माझे कीर्तन होत असते. त्यात वेगवेगळ््या विषयाची परंपरा असल्याचे सांगून त्यांनी ‘नाथ’ या विषयावर हा कीर्तन सोहळा होणार असल्याचे सांगितले. त्यानुसार आज त्यांनी संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासह वारकरी संप्रदायाच्या संतांच्या परंपरेची व त्यांच्या कार्याची गाथा आपल्या मधाळ वाणीतून जळगावकरांसमोर ठेवली.सन्यास, ब्रह्मचर्य टाकून निर्माण झालेला वारकरी संप्रदायकोठेही निंदा करण्यापेक्षा जुळवून घ्यायला काय हरकत आहे, असा सवाल उपस्थित करीत बाबा महाराज सातारकर यांनी संसाराविषयी विश्लेषण केले. कोणालाही निंदा करू द्या मात्र भूक लागली की संसार आठवतोच. लग्न झाले नसले तरी बाईच्या हातूनच भीक्षा घ्यावी लागते, मग घरच्या बाईच्या हातचे काय वाईट आहे, असेही ते म्हणाले. सन्यास, ब्रह्मचर्य टाकून निर्माण झालेला वारकरी संप्रदाय असून संसारात राहून नाथ बाबांनी हा संप्रदाय उभा केल्याचे ते म्हणाले.... मात्र धर्माचे रक्षण करत नाहीआपल्या धर्माचे रक्षण करा, असे सर्व जण म्हणतात मात्र तसे होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नावात काय आहे, त्यापेक्षा त्यातून काय प्रकट होते हे महत्त्वाचे आहे, असे सांगून त्यांनी कोण काय सांगतो, ते ऐका. कीर्तनाची चिकित्सा केली जाते, मात्र चिकित्सा न करता ते प्रेमाने ऐका, असा सल्ला त्यांनी दिला. कीर्तन करणाºयाचे नाव महत्त्वाचे नाही तर त्यातून काय प्रकट होते,हेपाहिलेजाते,असेसांगूनत्यांनीयामुळेचज्ञानोबा, तुकोबा हेआमचाश्वासअसल्याचेसांगितले.तरुण महापौरांकडून कीर्तनाच्या आयोजनाबद्दल बाबामहाराज सातारकर यांनी कौतुक केले. सुरेशदादांना दादांना उदंड आयुष्य लाभो, ते शंभरी गाठो व तो साजरा करण्यासाठी मी येवो, अशा सदिच्छाही बाबा महाराज सातारकर यांनी दिल्या.अडाण्यांचा संप्रदाय समजू नयेवारकरी संप्रदाय हा शेतकरी, अडाण्यांचा संप्रदाय आहे, असे कोणी समजू नये, असे बाबा महाराज सातारकर यांनी सांगत हा संप्रदाय असून कोणी निर्माण केलेला पंथ नसल्याचे स्पष्ट केले. ज्ञानोबांनी पाया रचला असे म्हटले जाते, मुळात ज्ञानच पाया असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले. टाळ वाजविण्यास टाळ कुटणे म्हणत असाल तर यावरूनच तुमची मराठी समजून येते असे सांगत त्यांनी ही हीन प्रवृत्ती असल्याचे परखड मत मांडले.‘जय जय रामकृष्ण’ ते ‘ज्ञानेश्वर माऊली तुकाराम’ पर्यंत सर्व तल्लीनरामकृष्ण हरीने सुरुवात व ज्ञानोबा तुकारामने शेवट अशी कीर्तनाची परंपरा जपणाºया बाबा महाराज सातारकर यांनी ‘जय जय रामकृष्ण हरी....’ या कीर्तनाने सुरुवात केली. त्यानंतर ‘सुंदर ते ध्यान...’, ‘धन्यादी दिन संत दर्शनाचा...‘ हे कीर्तन सादर करून ‘ज्ञानेश्वर माऊली तुकाराम...’ या कीर्तनाने शेवट केला. सलग दोन तास या मधाळ कीर्तनात शहरवासीय तल्लीन झाले होते. कीर्तनाच्या वाद्यासोबत उपस्थितही टाळ््या वाजवून कीर्तनाचा आनंद घेत होते. शेवटी कोल्हे कुटुंबीयांच्याहस्ते पांडुरंगाची आरती झाली. या वेळी ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी उपस्थित होते.पावलींनी वेधले लक्षबाबा महाराज सातारकर यांच्या कीर्तनासोबत व्यासपीठावर टाळधारी तरुण व बालकीर्तनकार साथ देत होते. या वेळी त्यांच्या पावलीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. येणाºया प्रत्येकाचे बुक्का लावून स्वागत करण्यात येत होते.उपस्थितांनी व्हिडीओ कॉलद्वारे बाबांच्या कीर्तनाचे आप्तस्वकीयांना दर्शन घडविले.

टॅग्स :Jalgaonजळगाव