शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

बाधित झाला बरा, नातेवाईक मात्र अडकूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 12:11 IST

संशयितांचा जीव टांगणीला : अहवाल विलंबाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

जळगाव : एक बाधित रुग्ण बरा होऊन घरी पोहचला मात्र, त्याच्या संपर्कातील त्याच्या नातेवाईकांचे अहवालच नसल्याने ते अजूनही क्वारंटाईन सेंटरमध्येच अडकून असल्याचा प्रकार जळगावात समोर आला आहे़ यामुळे प्रलंबित अहवालांचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे़ याबाबत वांरवार तक्रारी व अनेक गंभीर बाबी समोर येऊनही वेळेवर अहवाल मिळत नसल्याने संशयितांचा जीव टांगणीला आहे़जिल्हाभरात अहवाल प्रलंबीत राहत असल्याचा मुद्दा पुन्हा एका प्रामुख्याने समोर आला आहे़ प्रयोगशाळा सुरू होऊनही मर्यादा कमी व संशयितांची संख्या जास्त असल्याने दररोज ४०० पेक्षा अधिक संशयितांचे नमुने दररोज प्रतिक्षेत राहत असून यामुळे संसर्गाचा धोका तर आहेच, मात्र, रुग्णांचे मानसीक खच्चीकरण व त्रास याचा धोका बळावला आहे़अनेक लहान मुलांनाही ताटकळत रुग्णालयात राहावे लागत आहे़ अहवाल वेळेवर मिळावे यासाठी कोविड रुग्णालयात सुक्ष्मजीव शास्त्र विभागाची कोरोना तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे़ मात्र, यातही मर्यादेत अहवाल येत आहेत़शिवाय काही दिवसांपूर्वी धुळे येथे अहवाल पाठविले जात नव्हते, मात्र, दोन दिवसांपूर्वी धुळे येथे काही अहवाल पाठविण्यात आले होते़क्वारंटाईन सेंटर फुल्लएकट्या जवळगाव शहरातून रोज किमान ८० अहवालांची तपासणी होत असताना प्राप्त अहवालांची संख्या अगदीच नगण्य आहे़ अशा स्थितीत अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतीगृहात असलेले क्वारंटाईन सेंटर फुल्ल झाले असून अहवाल येत नसल्याने रुग्ण अधिकच भितीत राहत असल्याचे समोर येत आहे़ यामुळे डॉक्टरांचीही अधिकच डोकेदुखी वाढली आहे़ अशा स्थितीत संपर्कातील व्यक्तिंचे तपासणी अहवाल तरी किमान लवकर यावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे़असेही उदाहरण... बाधित व्यक्तिला १९ रोजी तर त्यांची पत्नी, मुलगा व मित्राचे नातेवाईक असे चौघांना २१ रोजीच क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते़ आठ दिवस संबधित रुग्णाला बरे झाल्याने घरी सोडण्यात आले मात्र, त्यांच्या नातेवाईकांचा तपासणी अहवालच नसल्याने ते गुरूवारी सांयकाळपर्यंत क्वारंटाईनसेंटरमध्येच अडकून होते़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव