शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
3
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
4
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
5
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
6
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
7
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
8
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
9
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
10
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
11
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
12
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
13
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
14
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
15
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
16
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
17
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
18
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
19
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
20
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?

गिरणाकाठवासीयांचा तोंडचा घास गेला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 21:22 IST

अतिवृष्टी : कोरडवाहू शेतीसह, बागायती क्षेत्राला बसलाय फटका

समाधान निकुंभ ।दापोरा ता. जळगाव : गिरणा काठ दुथडी भरून वाहत असला तरी दुष्काळ हा शेतकऱ्यांच्या पाचवीला पूजलेला आहे. मागील वर्षी आलेला कोरडा दुष्काळ, बोंडअळी, केळीवरील रोगाचा प्रादुर्भाव अश्या अनेक नैसर्गिक संकटाचा सामना करताना दापोरासह परिसरातील धानोरा, मोहाडी, लमांजन, कु ºहाडदे, वाकडी येथील शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले असताना या वर्षी सुरवातीलाच चांगला पाऊस असल्याने अधिक उत्पन्न मिळेल अशी आशा होती.मात्र परतीच्या पावसाने केलेल्या हाहाकारामुळे हातातोंडाशी आलेला घास गेल्याने दापोरा सह परिसरातील शेतकरीवर्ग संकटात सापडला असल्याची भावना लोकमतशी बोलताना व्यक्त केली आहे.सोयाबीन,कापूस,मका,ज्वारी सारखी पिके हातची गेलीपरिसरात सोयाबीन, कापूस, मका, ज्वारी यासारखी पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणात आहे ऐन काढणीला आलेली पिके पंधरा दिवस जरी मिळाली असती तर सर्व हंगाम आटोपला असता मात्र तोडातील घास गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे भरीव मदतीची अपेक्षा शासनाने करावी अशी आशा व्यक्त केली जात आहे.गुराचा चारा कसा उपलब्ध करावाआलेल्या अस्मानी संकटाने मुक्या प्राण्याचा देखील तोडतील घास गेल्याने चारा कसा उपलब्ध करावा हा प्रश्न पशुधनवासीयासमोर येऊन पडला आहे. सध्या असलेला चारा हा भुरशीजन्य झाल्याने गुरे दगावण्याची शक्यता अधिक निर्माण झाली आहे परिसरात मोठ्या प्रमाणात पशुधन असल्याने दुधाळ जनावरे देखील अधिक आहेत यामुळे रब्बी हंगाम कसा येतोय याची आशा असताना चारा कसा उपलब्ध करावा हा प्रश्न कायम आहे.शासकीय योजनाची फक्त घोषणाचशासनाकडून विविध योजनाच्या घोषणा होत असल्या तरी परिसरात अजूनही कर्जमाफी, बोंडआळी अनुदान, दुष्काळी मदत, प्रधानमंत्री सन्मान निधि अश्या योजनांच्या लाभासाठी शेतकरी शासकीय कार्यालय असो, बँका तसेच विका संस्था यांचे उंबरठे झीजवताना दिसत आहे. मात्र तरी देखील वेळीच मदत मिळालेली नाही. आता नुकसान भरपाई तरी वेळेवर मिळण्याची अपेक्षा आहे.परिसरातील सर्वच शेती उद्ध्वस्त झाली आहे माझे शेतातील देखील ज्वारी सह इतर पिके जमीनदोस्त झालीत परतीच्या पावसाने अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार असल्याने संकटाशी सामना करावा लागणार आहे.-भाऊलाल दगडू सापकाळेशेतकरी दापोरापाऊस चांगला झाला असला तरी तोंडातील घास घेऊन गेला आहे प्रशासनाने त्वरित पंचनामे पूर्ण करून कोणताही भेदभाव न करता सर्वच शेतकºयांना पिकानुसार त्वरित नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा आहे.- परशुराम बळीराम काळे ,शेतकरी दापोराकपाशी पिके हिरवी दिसत असली तरी अधिक पावसाने कैºया मोठ्या प्रमाणात सड्लेल्या आहेत नवीन माल देखील गळून पडला असल्याने उत्पन्न सर्वच वाया गेल्याचे परिस्थित आहे त्यामुळे शासनाने कपाशी पिकासाठी सरसकट अधिकची मदत मिळावी अशी अपेक्षा आहे.- ईश्वरदास बाबुराव तांदळे,शेतकरी दापोरा

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव