शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

संकटावर मात करण्या धैर्य दे.. सामर्थ्य दे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 12:44 IST

देव आणि दानवांचा लढा म्हणजे सात्विक आणि राक्षसी वृत्तींचा लढा, त्यानुसार पुराणामधे तश्या अनेक कथा आहेत, अन् त्यातून सुंदर ...

देव आणि दानवांचा लढा म्हणजे सात्विक आणि राक्षसी वृत्तींचा लढा, त्यानुसार पुराणामधे तश्या अनेक कथा आहेत, अन् त्यातून सुंदर संदेश पोहचवला आहे.त्रिपुरासुर नावाचा राक्षस होता. त्याने तीन पुऱ्या वसवल्या. म्हणून त्याचे नाव त्रिपुरासूर. त्याने कपटाने देव लोकांचा अमृतकुंभ चोरून आणला. शत्रूपक्षाचे वैशिष्ठ असलेला अमृतकुंभ आता माझेजवळ आहे, त्रिपुरासुराचा अहंकार अतोनात वाढला. राक्षसी वृत्तीला यश पचवता येत नाही. कारण यशाचा कर्तेपणा ते स्वत:कडेच ठेवतात, उच्च शक्तीकडे सोपवत नाही.देव लोकांच्याकडे खळबळ माजली. अमृतकुंभाच्या सुरक्षेची चौकशी करण्यात आली. पण त्याचा तपास लागेना. देव लोकांकडील अमृतकुंभ आता आपल्याजवळ आहे, माझा कोणीही पराभव करू शकत नाही. शत्रूपक्षाला खिंडीत गाठण्याची हीच वेळ आहे, असे म्हणून त्रिपुरासुराने देवलोकांना युद्धाचे आव्हान दिले. भोलेनाथ महादेवाचे सैन्य आणि त्रिपुरासुराचे सैन्य तुंबळ युद्ध झाले. त्रिपुरासुराचे सगळे सैन्य मारले गेले युद्धात. परंतु अमृताच्या जोरावर सैन्य पुन्हा जिवंत झाले. पुन्हा युद्ध होऊन त्रिपुरासुराचे सैन्य मारले जाणे अमृताच्या जोरावर पुन्हा जिवंत होणे, असे वारंवार घडू लागले.देवांना शंका आली की, राक्षससेना वारंवार जिवंत होत आहे, शत्रुपक्षाकडेच अमृतकुंभ असावा, तपासाअंती कळले की, त्रिपुरासुराने अमृतकुंभ चोरून तो आपल्या गोशाळेत लपवून ठेवला आहे. भगवान विष्णूने गाय आणि ब्रह्मदेवाने वासराचे रुप घेतले. त्रिपुरासुराच्या गोशाळेत प्रवेश केला अन त्या गोमातेने आपल्या श्ािंगाने तो अमृतकुंभ फोडू टाकला.भोलेनाथाने शत्रूपक्षाला युद्धाचे आव्हान दिले. भयंकर युद्ध झाले. अमृतकुंभ नाहिसा झाल्यामुळे त्रिपुरासुराचे सैन्य पुन्हा जिवंत होऊ शकले नाही. त्रिपुरासूर घाबरून सैरावैरा धावू लागला. महादेवाने त्रिपुरासुराला धरले आणि नाश केला, तो दिवस होता कार्तिकी पौर्णिमेचा.त्रिपुरासुराच्या रुपाने आलेले घोर संकट भोलेनाथांच्या पराक्रमाने नाहीसे झाले. सर्वत्र दिव्यांची आरास करण्यात आली. महादेवासमोर कापूर लावला गेला. दीपमाळ सुशोभित करण्यात आली. म्हणून त्रिपुरारी पौर्णिमेस दीपोत्सव साजरा केला जातो. यामुळेच सद्गुरूनाथांना प्रार्थना करावी की, आमच्या जीवनात जर काही संकटे-समस्या आली तर आम्हास धैर्य दे. संकटाला सामोरा जाण्याचे सामर्थ्य दे. आम्ही अखंड रामनामाचे अनुसंधान ठेवू. कारण सद्गुरूंचा निवास नामात आहे.- राया उपासनी, निजामपूरकर

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव