शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

संकटावर मात करण्या धैर्य दे.. सामर्थ्य दे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 12:44 IST

देव आणि दानवांचा लढा म्हणजे सात्विक आणि राक्षसी वृत्तींचा लढा, त्यानुसार पुराणामधे तश्या अनेक कथा आहेत, अन् त्यातून सुंदर ...

देव आणि दानवांचा लढा म्हणजे सात्विक आणि राक्षसी वृत्तींचा लढा, त्यानुसार पुराणामधे तश्या अनेक कथा आहेत, अन् त्यातून सुंदर संदेश पोहचवला आहे.त्रिपुरासुर नावाचा राक्षस होता. त्याने तीन पुऱ्या वसवल्या. म्हणून त्याचे नाव त्रिपुरासूर. त्याने कपटाने देव लोकांचा अमृतकुंभ चोरून आणला. शत्रूपक्षाचे वैशिष्ठ असलेला अमृतकुंभ आता माझेजवळ आहे, त्रिपुरासुराचा अहंकार अतोनात वाढला. राक्षसी वृत्तीला यश पचवता येत नाही. कारण यशाचा कर्तेपणा ते स्वत:कडेच ठेवतात, उच्च शक्तीकडे सोपवत नाही.देव लोकांच्याकडे खळबळ माजली. अमृतकुंभाच्या सुरक्षेची चौकशी करण्यात आली. पण त्याचा तपास लागेना. देव लोकांकडील अमृतकुंभ आता आपल्याजवळ आहे, माझा कोणीही पराभव करू शकत नाही. शत्रूपक्षाला खिंडीत गाठण्याची हीच वेळ आहे, असे म्हणून त्रिपुरासुराने देवलोकांना युद्धाचे आव्हान दिले. भोलेनाथ महादेवाचे सैन्य आणि त्रिपुरासुराचे सैन्य तुंबळ युद्ध झाले. त्रिपुरासुराचे सगळे सैन्य मारले गेले युद्धात. परंतु अमृताच्या जोरावर सैन्य पुन्हा जिवंत झाले. पुन्हा युद्ध होऊन त्रिपुरासुराचे सैन्य मारले जाणे अमृताच्या जोरावर पुन्हा जिवंत होणे, असे वारंवार घडू लागले.देवांना शंका आली की, राक्षससेना वारंवार जिवंत होत आहे, शत्रुपक्षाकडेच अमृतकुंभ असावा, तपासाअंती कळले की, त्रिपुरासुराने अमृतकुंभ चोरून तो आपल्या गोशाळेत लपवून ठेवला आहे. भगवान विष्णूने गाय आणि ब्रह्मदेवाने वासराचे रुप घेतले. त्रिपुरासुराच्या गोशाळेत प्रवेश केला अन त्या गोमातेने आपल्या श्ािंगाने तो अमृतकुंभ फोडू टाकला.भोलेनाथाने शत्रूपक्षाला युद्धाचे आव्हान दिले. भयंकर युद्ध झाले. अमृतकुंभ नाहिसा झाल्यामुळे त्रिपुरासुराचे सैन्य पुन्हा जिवंत होऊ शकले नाही. त्रिपुरासूर घाबरून सैरावैरा धावू लागला. महादेवाने त्रिपुरासुराला धरले आणि नाश केला, तो दिवस होता कार्तिकी पौर्णिमेचा.त्रिपुरासुराच्या रुपाने आलेले घोर संकट भोलेनाथांच्या पराक्रमाने नाहीसे झाले. सर्वत्र दिव्यांची आरास करण्यात आली. महादेवासमोर कापूर लावला गेला. दीपमाळ सुशोभित करण्यात आली. म्हणून त्रिपुरारी पौर्णिमेस दीपोत्सव साजरा केला जातो. यामुळेच सद्गुरूनाथांना प्रार्थना करावी की, आमच्या जीवनात जर काही संकटे-समस्या आली तर आम्हास धैर्य दे. संकटाला सामोरा जाण्याचे सामर्थ्य दे. आम्ही अखंड रामनामाचे अनुसंधान ठेवू. कारण सद्गुरूंचा निवास नामात आहे.- राया उपासनी, निजामपूरकर

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव