शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कष्टाने फुलविलेल्या शेतीची झाली वाताहत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 22:01 IST

नशिराबाद परिसर : खरीपाची लागली वाट; फळभाज्यांच्या पंचनाम्यांची प्रतीक्षा

प्रसाद धर्माधिकारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनशिराबाद : अवकाळी पावसाने शेतकऱ्याला न घर का ना घाट का अशी स्थिती आणली आहे. शेतकऱ्यांनी कष्टाने फुलवलेल्या शेतीची पावसाच्या तडाख्याने वाताहत झाली आहे.शेतांमध्ये पाणी साचल्याने मिरची, टमाटे पिके सडले आहेत. डाळिंबाची फुले,फळे गळून पडली आहे. खरीप हंगामाची पुरी वाट लागली आहे. फळभाज्यांचे शेतीचे अद्याप पंचनामे झाले नसल्याची ओरड नशिराबादला शेतकºयांनी केली आहे.यंदाच्या पावसाने सर्वांना चांगलेच झोडपले आहे. खरीप हंगामातील ज्वारी कांदा कापूस मका सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.पावसाने फिरविले पाणीपरिसरात अनेक शेतकºयांनी आपल्या फळे,पालेभाज्या फुलविला होत्या. मात्र सततच्या पावसाने त्यावर पुरे पाणी फिरवले. शेतात साचलेल्या पाण्यामुळे उघडीत न मिळाल्याने मिरची झाडावरच परिपूर्ण पणे लाल होऊन सडली. आणि टमाटे तर झाडावरून गळून पडली व त्याच पाण्यामध्ये सडली आहे.शेतकºयाची अवस्था बिकटनगदी पीक विक्रीस जाण्यापूर्वीच अशी बिकट अवस्था झाली. अवकाळी पावसाने डाळिंबाचे बहरलेले फळे-फुले गळून पडली. डोळ्यादेखत पिकांची झालेली नासधूस पाहून शेतकरी रडकुंडीस आला आहे. पिके बहरण्यासाठी खते, निंदणी ,मजुरी हा खर्चही निघाला नाही. कजार्चा डोंगर वाढत आहे. प्रशासनाचे अधिकारी अद्याप पंचनामा करायला आलेली नाही. जीवन जगावं तरी कसं. अशी स्थिती निर्माण झाली आहे.माझी शेतातील टमाटे झाडे करपले असून टमाटा गळून सडला आहे.सुरुवातीला पिके चांगली होती मात्र हवामानामुळे रोगाचा प्रादुर्भाव झाला. कीटकनाशके फवारणी केली.त्यातच अवकाळी पावसाने तर पुरी वाट लावली. हातातोंडाशी आलेला घास हिरावला. मिरचीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले .नुकसान भरपाई मिळावी. शासनाने मदत करावी हीच अपेक्षा. - सोपान भोजू रोटे, शेतकरीअवकाळी पाऊसाने कांदा सडला सोयाबीन ज्वारी चे नुकसान झाले. व्याजाने पैसे घेऊन पेरणी केली होती. पिकेच वाया गेले. कर्ज फेडू कसे. त्यात म्हैस दगावली. यंदा दिवाळी अंधारातच गेली.- उषा मधुकर धनगर, शेतकरी

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव