शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

कष्टाने फुलविलेल्या शेतीची झाली वाताहत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 22:01 IST

नशिराबाद परिसर : खरीपाची लागली वाट; फळभाज्यांच्या पंचनाम्यांची प्रतीक्षा

प्रसाद धर्माधिकारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनशिराबाद : अवकाळी पावसाने शेतकऱ्याला न घर का ना घाट का अशी स्थिती आणली आहे. शेतकऱ्यांनी कष्टाने फुलवलेल्या शेतीची पावसाच्या तडाख्याने वाताहत झाली आहे.शेतांमध्ये पाणी साचल्याने मिरची, टमाटे पिके सडले आहेत. डाळिंबाची फुले,फळे गळून पडली आहे. खरीप हंगामाची पुरी वाट लागली आहे. फळभाज्यांचे शेतीचे अद्याप पंचनामे झाले नसल्याची ओरड नशिराबादला शेतकºयांनी केली आहे.यंदाच्या पावसाने सर्वांना चांगलेच झोडपले आहे. खरीप हंगामातील ज्वारी कांदा कापूस मका सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.पावसाने फिरविले पाणीपरिसरात अनेक शेतकºयांनी आपल्या फळे,पालेभाज्या फुलविला होत्या. मात्र सततच्या पावसाने त्यावर पुरे पाणी फिरवले. शेतात साचलेल्या पाण्यामुळे उघडीत न मिळाल्याने मिरची झाडावरच परिपूर्ण पणे लाल होऊन सडली. आणि टमाटे तर झाडावरून गळून पडली व त्याच पाण्यामध्ये सडली आहे.शेतकºयाची अवस्था बिकटनगदी पीक विक्रीस जाण्यापूर्वीच अशी बिकट अवस्था झाली. अवकाळी पावसाने डाळिंबाचे बहरलेले फळे-फुले गळून पडली. डोळ्यादेखत पिकांची झालेली नासधूस पाहून शेतकरी रडकुंडीस आला आहे. पिके बहरण्यासाठी खते, निंदणी ,मजुरी हा खर्चही निघाला नाही. कजार्चा डोंगर वाढत आहे. प्रशासनाचे अधिकारी अद्याप पंचनामा करायला आलेली नाही. जीवन जगावं तरी कसं. अशी स्थिती निर्माण झाली आहे.माझी शेतातील टमाटे झाडे करपले असून टमाटा गळून सडला आहे.सुरुवातीला पिके चांगली होती मात्र हवामानामुळे रोगाचा प्रादुर्भाव झाला. कीटकनाशके फवारणी केली.त्यातच अवकाळी पावसाने तर पुरी वाट लावली. हातातोंडाशी आलेला घास हिरावला. मिरचीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले .नुकसान भरपाई मिळावी. शासनाने मदत करावी हीच अपेक्षा. - सोपान भोजू रोटे, शेतकरीअवकाळी पाऊसाने कांदा सडला सोयाबीन ज्वारी चे नुकसान झाले. व्याजाने पैसे घेऊन पेरणी केली होती. पिकेच वाया गेले. कर्ज फेडू कसे. त्यात म्हैस दगावली. यंदा दिवाळी अंधारातच गेली.- उषा मधुकर धनगर, शेतकरी

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव