शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

कष्टाने फुलविलेल्या शेतीची झाली वाताहत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 22:01 IST

नशिराबाद परिसर : खरीपाची लागली वाट; फळभाज्यांच्या पंचनाम्यांची प्रतीक्षा

प्रसाद धर्माधिकारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनशिराबाद : अवकाळी पावसाने शेतकऱ्याला न घर का ना घाट का अशी स्थिती आणली आहे. शेतकऱ्यांनी कष्टाने फुलवलेल्या शेतीची पावसाच्या तडाख्याने वाताहत झाली आहे.शेतांमध्ये पाणी साचल्याने मिरची, टमाटे पिके सडले आहेत. डाळिंबाची फुले,फळे गळून पडली आहे. खरीप हंगामाची पुरी वाट लागली आहे. फळभाज्यांचे शेतीचे अद्याप पंचनामे झाले नसल्याची ओरड नशिराबादला शेतकºयांनी केली आहे.यंदाच्या पावसाने सर्वांना चांगलेच झोडपले आहे. खरीप हंगामातील ज्वारी कांदा कापूस मका सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.पावसाने फिरविले पाणीपरिसरात अनेक शेतकºयांनी आपल्या फळे,पालेभाज्या फुलविला होत्या. मात्र सततच्या पावसाने त्यावर पुरे पाणी फिरवले. शेतात साचलेल्या पाण्यामुळे उघडीत न मिळाल्याने मिरची झाडावरच परिपूर्ण पणे लाल होऊन सडली. आणि टमाटे तर झाडावरून गळून पडली व त्याच पाण्यामध्ये सडली आहे.शेतकºयाची अवस्था बिकटनगदी पीक विक्रीस जाण्यापूर्वीच अशी बिकट अवस्था झाली. अवकाळी पावसाने डाळिंबाचे बहरलेले फळे-फुले गळून पडली. डोळ्यादेखत पिकांची झालेली नासधूस पाहून शेतकरी रडकुंडीस आला आहे. पिके बहरण्यासाठी खते, निंदणी ,मजुरी हा खर्चही निघाला नाही. कजार्चा डोंगर वाढत आहे. प्रशासनाचे अधिकारी अद्याप पंचनामा करायला आलेली नाही. जीवन जगावं तरी कसं. अशी स्थिती निर्माण झाली आहे.माझी शेतातील टमाटे झाडे करपले असून टमाटा गळून सडला आहे.सुरुवातीला पिके चांगली होती मात्र हवामानामुळे रोगाचा प्रादुर्भाव झाला. कीटकनाशके फवारणी केली.त्यातच अवकाळी पावसाने तर पुरी वाट लावली. हातातोंडाशी आलेला घास हिरावला. मिरचीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले .नुकसान भरपाई मिळावी. शासनाने मदत करावी हीच अपेक्षा. - सोपान भोजू रोटे, शेतकरीअवकाळी पाऊसाने कांदा सडला सोयाबीन ज्वारी चे नुकसान झाले. व्याजाने पैसे घेऊन पेरणी केली होती. पिकेच वाया गेले. कर्ज फेडू कसे. त्यात म्हैस दगावली. यंदा दिवाळी अंधारातच गेली.- उषा मधुकर धनगर, शेतकरी

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव