शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

जलसंपदा मंत्र्यांच्या मतदारसंघातील गावात महिलांचा हंडा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 19:12 IST

तीन वर्षानंतर अखेर सुटला संयम : नेरी ग्रामपंचायत कार्यालयाला ठोकले कुलूप

ठळक मुद्देदोन ठिकाणची पाणी योजना तरी गाव तहानलेलेचसंतप्त महिलांनी सरपंचांना बोलविले कार्यालयातजलसंपदा मंत्र्यांच्या मतदारसंघातील गाव तीन वर्षांपासून तहानलेले

आॅनलाईन लोकमतनेरी, ता.जामनेर, दि.२ : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदार संघातील नेरी गावातील नागरिक तब्बल तीन वर्षांपासून पाणी टंचाईचा सामना करीत आहेत. महिन्यातून केवळ दोन दिवस पाणीपुरवठा होत असल्याने मंगळवारी महिलांच्या संयमाचा बांध सुटला आणि संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. याठिकाणी उत्तर देण्यासाठी सरपंच किंवा ग्रामसेवक नसल्याने संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले.गेल्या अनेक दिवसांपासून नेरी गावात तीव्र पाणी टंचाई भासत आहे. महिन्याभरात केवळ दोन वेळा पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्या कल्पना कुमावत यांच्या नेतृत्वाखाली संतप्त महिलांनी गावातून हंडा मोर्चा काढत थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठले. मात्र या ठिकाणी ग्रामविकास अधिकारी पुलकेशी केदार, सरपंच व इतर पदाधिकारी उपस्थित नसल्याने मोर्चेकरी महिलांच्या संतापात भर पडली. त्यामुळे त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला थेट कुलूप ठोकले. संध्याकाळपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप कायम होते.जलसंपदा मंत्र्यांच्या मतदारसंघातील गावसुमारे १० हजार लोकसंख्या असलेले नेरी हे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदार संघातील गाव आहे. १३ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीत भाजपाचे १२ सदस्य तर एकमेव राष्ट्रवादीच्या महिला सदस्या आहेत. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांच्या पॅनलचे ग्रामपंचायतीत बहुमत आहे. मात्र तरीदेखील गेल्या तीन वर्षांपासून या गावातील नागरिक पाणीटंचाईचा सामना करीत आहेत.सरपंचांना बोलविले कार्यालयातग्रामपंचायत कार्यालयात मोर्चेकरी महिला दाखल झाल्याची माहिती पदाधिकाºयांना फोनवर देण्यात आली. तेव्हा सरपंच याचे पती रवींद्र पाचपोळ व उपसरपंच यांचे पती जितेंद्र पाटील यांनी संतप्त महिलांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र सरपंच व उपसरपंच यांना कार्यालयात बोलवा असा पवित्रा या महिलांनी घेतल्याने अखेर प्रभारी सरपंच उज्वला पाटील या कार्यालयात दाखल झाल्या. त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त महिलांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावून चाबी सोबत ठेवून घेतली.दोन ठिकाणची पाणी योजना तरी गाव तहानलेलेगावासाठी वाघुर धरण व चिंचखेडा शिवारातील एका खाजगी शेतातील विहिरीतून पाणी योजना सुरु आहे. मात्र योग्य नियोजनाअभावी गावकरी तहानलेलेच आहे. वाघुर धरणातील आठ गाव पाणी पुरवठा योजना ही वीज बिलामुळे अडचणीत आली आहे. चिंचखेडा शिवारातून एका खाजगी शेतातील विहिरीतून पर्यायी पाणी योजना चालू आहे. मात्र ती देखील वेगवेगळ्या कारणांनी वादग्रस्त ठरत आहे. या विहिरीतील पाणी पिण्यायोग्य नाही. मात्र वापरण्यासाठी या पाण्याचा वापर होऊ शकतो.

 खाजगी शेतातील विहिरीतून होणाºया पाणी पुरवठ्याला वारंवार तांत्रिक अडचणीमुळे विलंब होतो. मात्र याबाबत लवकर कारवाई होवून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल.उज्वला पाटील, प्रभारी सरपंच, नेरी.

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनJalgaonजळगावJamnerजामनेर