शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
3
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
11
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
12
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
13
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
14
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
15
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
16
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
17
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
18
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना

अमळनेर तालुक्यात दीड तास अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 23:44 IST

पाडळसरे-कळमसरेसह बोहरे परिसरात व संपूर्ण अमळनेर तालुक्यात सोमवारी सायंकाळी सहाला पावसाने जोरदार हजेरी लावली.

ठळक मुद्देपाडळसरे कळमसरेसह परिसरात ढगफुटीमारवड सर्कलला एका तासात १०० मि.मी. पावसाची नोंदतहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांनी दिली कळमसरे पाडळसरे येथील ग्रामस्थांची भेट देऊन दिला धीरकळमसरे गावासह तिन्ही गावांचा संपर्क तुटलाअनेक घरांची पडझड, उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

अमळनेर, जि.जळगाव : पाडळसरे-कळमसरेसह बोहरे परिसरात व संपूर्ण अमळनेर तालुक्यात सोमवारी सायंकाळी सहाला पावसाने जोरदार हजेरी लावली. ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले. यात अनेक शेतांचे बांध व जलसंधारणची कामे फुटून शेतीसह पिकांना मोठा फटका बसला असून मोठे नुकसान झाले, तर पाडळसरे-कळमसरेसह बोहरे या तिन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. निम, तांदळी, बोहरे या गावांना जाणाºया रात्रीच्या बसेस मारवड येथे थांबून आहेत. त्यामुळे अनेक महिला व प्रवासी रस्त्यातच ताटकळत बसले असल्याने वाहक व चालकही थांबून आहेत.या घटनेची माहिती अमळनेरच्या तहसीलदार यांना कळमसरे पाडळसरे येथील पत्रकारांनी दिली असता अमळनेर पालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान व तीन बंब घेऊन रवाना झाले. प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार ज्योती देवरे, मारवडचे मंडळ अधिकारी बी.आर.शिंदे, तलाठी गौरव शिरसाठ हे दाखल झाले. घरे कोसळलेल्या कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन करून कळमसरे पाडळसरे येथील ग्रामस्थांची भेट देऊन धीर दिला व प्रशासन आणि यंत्रणा आपल्यासोबत असल्याने घाबरून जाऊ नये. अफवांवर विश्वास ठेवू नये म्हणून जागृत केले. कळमसरे पाडळसरे येथे सात आठ घरे कोसळले. त्यात मात्र जीवित हानी झाली नाही. सखल शेतीत पाणी तुडुंब भरल्याने पिके पाण्याखाली आली आहेत.पाडळसरे, बोहरे, कळमसरेसह परिसरातील गावांच्या संपर्क तुटला आहे. गावातील अनेक घरात पावसाचे पाणी आत शिरले आहे. कळमसरे भिलाटी, दुर्गानगर प्लॉटिंग येथे पावसाचे पाणी घरात शिरले आहे. मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. जवळपास डझनभर घरे ही पावसाच्या पाण्याने पडली आहे. कळमसरे गावाला पावसाच्या पाण्याचा संपूर्ण वेढा असल्याने अमळनेर-शिरपूर बसही कळमसरे-शाहपूर रस्त्यावर उशिरापर्यंत उभी होती. तसेच अमळनेर-निम बस ही पाण्यात अडकली आहे. अचानक जणू काही ढगफुटी झाली की काय, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. या पावसाने संपूर्ण शेती ही पाण्याखाली आली आहे. कपाशी, मका, ज्वारी, बाजरीसह इतर पिकांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ग्रामस्थानी नुकसान भरपाईची मागणी करीत, शेतीच्या पंचनामा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनीे तहसीलदार व प्रांत अधिकाºयांकडे केली आहे.तीन घरे पडलीकळंबे गावात पण पावसाच्या पाण्याने तीन घरे पडली. त्यात गोरख बुधा पारधी, राजकोरबाई कौतिक शिरसाठ व अशोक देवीदास पारधी यांचा समावेश आहे.

टॅग्स :RainपाऊसAmalnerअमळनेर