शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
2
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
3
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
4
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
5
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
6
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
7
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
8
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
9
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
10
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
11
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
12
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
13
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
14
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
15
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
16
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
17
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
18
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
19
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
20
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला

अमळनेर तालुक्यात दीड तास अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 23:44 IST

पाडळसरे-कळमसरेसह बोहरे परिसरात व संपूर्ण अमळनेर तालुक्यात सोमवारी सायंकाळी सहाला पावसाने जोरदार हजेरी लावली.

ठळक मुद्देपाडळसरे कळमसरेसह परिसरात ढगफुटीमारवड सर्कलला एका तासात १०० मि.मी. पावसाची नोंदतहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांनी दिली कळमसरे पाडळसरे येथील ग्रामस्थांची भेट देऊन दिला धीरकळमसरे गावासह तिन्ही गावांचा संपर्क तुटलाअनेक घरांची पडझड, उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

अमळनेर, जि.जळगाव : पाडळसरे-कळमसरेसह बोहरे परिसरात व संपूर्ण अमळनेर तालुक्यात सोमवारी सायंकाळी सहाला पावसाने जोरदार हजेरी लावली. ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले. यात अनेक शेतांचे बांध व जलसंधारणची कामे फुटून शेतीसह पिकांना मोठा फटका बसला असून मोठे नुकसान झाले, तर पाडळसरे-कळमसरेसह बोहरे या तिन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. निम, तांदळी, बोहरे या गावांना जाणाºया रात्रीच्या बसेस मारवड येथे थांबून आहेत. त्यामुळे अनेक महिला व प्रवासी रस्त्यातच ताटकळत बसले असल्याने वाहक व चालकही थांबून आहेत.या घटनेची माहिती अमळनेरच्या तहसीलदार यांना कळमसरे पाडळसरे येथील पत्रकारांनी दिली असता अमळनेर पालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान व तीन बंब घेऊन रवाना झाले. प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार ज्योती देवरे, मारवडचे मंडळ अधिकारी बी.आर.शिंदे, तलाठी गौरव शिरसाठ हे दाखल झाले. घरे कोसळलेल्या कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन करून कळमसरे पाडळसरे येथील ग्रामस्थांची भेट देऊन धीर दिला व प्रशासन आणि यंत्रणा आपल्यासोबत असल्याने घाबरून जाऊ नये. अफवांवर विश्वास ठेवू नये म्हणून जागृत केले. कळमसरे पाडळसरे येथे सात आठ घरे कोसळले. त्यात मात्र जीवित हानी झाली नाही. सखल शेतीत पाणी तुडुंब भरल्याने पिके पाण्याखाली आली आहेत.पाडळसरे, बोहरे, कळमसरेसह परिसरातील गावांच्या संपर्क तुटला आहे. गावातील अनेक घरात पावसाचे पाणी आत शिरले आहे. कळमसरे भिलाटी, दुर्गानगर प्लॉटिंग येथे पावसाचे पाणी घरात शिरले आहे. मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. जवळपास डझनभर घरे ही पावसाच्या पाण्याने पडली आहे. कळमसरे गावाला पावसाच्या पाण्याचा संपूर्ण वेढा असल्याने अमळनेर-शिरपूर बसही कळमसरे-शाहपूर रस्त्यावर उशिरापर्यंत उभी होती. तसेच अमळनेर-निम बस ही पाण्यात अडकली आहे. अचानक जणू काही ढगफुटी झाली की काय, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. या पावसाने संपूर्ण शेती ही पाण्याखाली आली आहे. कपाशी, मका, ज्वारी, बाजरीसह इतर पिकांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ग्रामस्थानी नुकसान भरपाईची मागणी करीत, शेतीच्या पंचनामा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनीे तहसीलदार व प्रांत अधिकाºयांकडे केली आहे.तीन घरे पडलीकळंबे गावात पण पावसाच्या पाण्याने तीन घरे पडली. त्यात गोरख बुधा पारधी, राजकोरबाई कौतिक शिरसाठ व अशोक देवीदास पारधी यांचा समावेश आहे.

टॅग्स :RainपाऊसAmalnerअमळनेर